Tuesday, 21 May 2019

११ मारुती - एक आठवण

११ मारुती - जय जय रघुवीर समर्थ 
गड किल्ले हिंडणे जसे चालू होते त्याच बरोबर महाराष्र्टातील त्या काळात आणि राष्ट्रस्थापने  साठी बांधलेल्या काही वास्तू, मंदिरं हिंडण्याचे पण आम्ही ठरवले. मंदिरात नुसता देव नसून त्याला एक इतिहास आहे हे तिथे गेलो की कळते. ह्या सर्व वास्तू काही ना काही विशिष्ठ कारणांसाठी बांधल्या होत्या. तिथल्या जागेचे पण काही तरी महत्व होते. Strategic  locations असे म्हणा. त्यात व्यापार, कारभार, सौरक्षण व इतर बऱ्याच गोष्टीचा विचार झाला असावा. असाच एक प्रवास म्हणजे ११ मारुती. रामदास स्वामींनी स्थापन केलेले हे ११ मारुती. तरुण पिढी मध्ये व्यायामाचे महत्व समजून देण्यासाठी याची स्थापना केली.  तरुण बलवान असेल तर राष्ट्र सौरक्षणाला त्याचा फायदा होईल हे मनात. हे सर्व मारुती सातारा कराड आणि कोल्हापूर परिसरात उभे आहेत. आता थोडीशी आमची गोष्ट. 
बंटी पाटील हा आमच्यातील एक पहेलवान. धष्ट पुष्ठ व्यायाम करणारा आणि सर्वांना हसवणारा हा एक कलाकार म्हणा. त्यांनी अचानक फोन केला व विचारणा केली की रविवारी जायचे आहे तर येशील का. हिंडायला आपण एका  पायावर तयार असतो. आणि खरं सांगायचे तर पप्या व त्याच्या दुसऱ्या ग्रुप कडून ११ मारुतीचे खूप कौतुक ऐकले आहे. म्हणून जायचे होतेच. बंडोपंत, सूर्यनमस्कार आणि जोर, देव आणि देवींचे भक्त, आपले वाहन घेऊन सज्ज झाले होते. बाकी मी पप्या निरंजन तुळपुळे उर्फ अधिकारी व अरविंद असे गाडीत बसून ६.३० ला सकाळी निघालो. जाताना असे ठरले की आधी डावीकडचे मारुती करायचे मग u turn मारून उजवीकडचे करून चाफळ ला आपली मारुती यात्रा संपवायची. धम्माल चालू झाली आणि किस्से बाहेर यायला लागले. ऊन खूप होते. बंटी मागे बसून लोकांना अशक्य हसवत होता. वर्षभराचे हसणे मला वाटते त्याच १२ तासात संपवले असेल. या काही मित्रांची काही वैशिष्ठे या अशा प्रवासातून कळून येतात. त्याचेच पुढे किस्से होतात आणि त्याच त्या कथेवरून हसणे होते. मग केलेल्या प्रवासातील किस्से असो, घराचे असो व दारुचे. sorry दारचे. काय ते इथे लिहू नाही शकणार. असो. तर आम्ही सर्व बजरंगबली भक्त या प्रवासाला निघालो. उंब्रज पासून दर्शन चालू केले. तिथून मसूर आणि मग शहापूर. बाहे मारुती करून u turn मारला आणि वाठार ला आलो. तिथे मनपाडळे आणि पारगाव च्या मारुती चे दर्शन घेतले. येतांना बत्तिसशिराळा करून चाफळ ला पोचलो. आधी शिंगणवाडी आणि माजगाव च्या मारुतीचे दर्शन घेऊन चाफळ च्या सुंदर राम मंदिरात पोचलो. दास मारुती आणि वीर मारुतीचे दर्शन घेऊन संध्याकाळी ६ च्या सुमारास ११ मारुती पूर्ण झाले. 

स्वामींनी साताऱ्या जवळील जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन आपले कार्य सुरू केले. जरंडेश्वरच्या मारुतीरायासमोर उभे राहिल्यावर त्यांना एकदम स्फुरले. 
रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्तीप्रेम वित्पती, दास दक्ष स्वामिपक्ष निजकाज सारथी वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।
आज काळ च्या gym and fitness center च्या जगात असा प्रवास घडला की आपले मूळ कुठे हे लक्षात येते. पूर्वी Law College चे असुदे अथवा शिवाजी मंदिर, व्यायामशाळेत मारुती नाही ही कल्पनाच नव्हती, आणि तसे नसायचेच. मला आठवते अजून पण, दर शनिवारी law college gym मध्ये नारळ आणि साखर प्रसाद असायचा आणि मग टेकडी वर पळत जाऊन त्या मारुतीचे दर्शन घेऊन यायचे. या देवाचे प्रेमच काही वेगळे आहे. व्यायाम हा आपल्या दिनक्रमेचा एक भाग हे बाबांनी लहानपणी पासून शिकवल्यामुळे आज पण एक दिवस सुद्धा व्यायाम बुडत नाही. आता माझ्या कडे बघून असे वाटत नसेल हे खरे आहे. व्यायाम हा देव आहे आणि त्याचे पूजन केले पाहिजे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे हे आज काल च्या पिढीला कितपत माहित आहे मला कळत नाही. रात्र रात्र बोंबलत हिंडणारे आम्ही संध्याकाळी मात्र व्यायामात ओले चिंब झालेलो असायचो. दिवस बदलत चालले आहेत आणि तालमीत जाणे लोकांचे कमी झाले आहे. diet plans वर भर जास्त आहे. आज दीक्षित तर उद्या atkins, मग GM नावाचे काही तरी येते आणि नंतर परत इतर काही तरी. जे खातो तेच विष आहे तर त्यात अजून diet करून काय मिळणार आहे मला कळत नाही. असो. उगाच लोकांच्या भावना दुखावतील. जाता येता च्या गप्पांमध्ये election results  हा एक विषय चाटून गेलाच. पण त्यावर जास्त वाद विवाद झाले नाही कारण भांडायला कोणी नव्हतं. अरविंद फार काही बोलत नाही. फक्त हसतो आणि त्यावेळी त्याचे डोळे नाहीसे होतात. ते पाहून बाकी लोकांना हसायला येत. तो निवांत माणूस आहे. बंड्या चे विषयच वेगळे आहेत त्यात बाकी लोकांना फारसे कळत नाही. म्हणजे अशी माझी कल्पना आहे असे म्हणा. त्याच्या सुरस कथा ऐकायच्या आणि मजा घ्यायची. गप्पा आणि गाणी या मध्ये १२ तास झालेला प्रवास कसा गेला आणि कधी ते काही कळले नाही. ऊन खूप होते. शेवटचे चार मारुती हे चाफळ जवळ आहेत. चाफळ चे राम मंदिर हे बघण्यासारखे आहे. सुंदर आणि स्वछ. राम सीता आणि लक्षुमण - सुंदर उभे आहेत. मन प्रसन्न होतं त्यांच्या कडे बघून.
सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा  हवेत थोडा गारवा जाणवायला लागला. छोट्या टेकडीवर खडीचा मारुती आहे, शिंगणवाडीला, तिथे पोचलो. प्रवास संपायला आला होता. पुढे काय करायचे त्याचे planning चालू झाले होते. येतांना सातारा गाठायचा आणि Lake View नावाच्या हॉटेल मध्ये जेवायचे ठरले. आपले नेहमीचेच हॉटेल. उत्तम जेवण. पोटोबा केला आणि परत गाडीत बसलो. मला वाटते ५०० - ५५० कि मी प्रवास नक्कीच झाला असेल. घरी पोचायला १२. ३० वाजले. ११ मारुती, बजरंगबलीच्या कृपेने नीट, निर्विग्न पार पडले.























































महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...