गोरखगड
Trekking ला लागलेला ब्रेक सुटला. गोरखगड झाला.
पुण्यात, या उन्हाळ्याने अशक्य त्रास दिला होता. या वर्षी ४१ पार केले आणि पुण्याचे पुणेपण, वातावरणाच्या दृष्टींनी संपले. जिथे पूर्वी कधी Fan लावायला लागायचा नाही तिथे हे असे. मला वाटतं आपल्या हयातीत पुण्याचे नागपूर होणार. फक्त उन्हाळ्याच्या दृष्टींनी. पहिला पाऊस झाला, जरा उशिराच. सकाळ मध्ये बातमी आली
'पुण्याला पावसानी ओले जिब केले वगरे वगरे' वीज गेली, पुणे अंधारात .... मस्त मातीचा सुगंध जो आता येत नाही पण तरी, असे सर्व घडले आणि परत trekking चालू करायची वेळ झाली. मागच्या वर्षी उन्हाळ्याला न जुमानता आम्ही बरेच जवळ चे किल्ले केले. पण या वर्षी शक्य नाही झालं. मी, चड्डी, उप्या, पिंटू पाटील आणि बीडी, सकाळी ५ ला निघायचे ठरवले. सर्व जण वेळेवर आले आणि आम्ही पिंटू कडून ५ .०५ ला निघालो. मध्ये शहापूर ला एका कंपनी मध्ये कामाच्या निमित्तानी गेलो होतो. तिथून येतांना मुरबाड कर्जत मार्ग धरून परत पुण्याला आलो होतो. येतांना डाव्या हाताला गोरख, मछिंद्र आणि सिद्धगड दिसले. त्याच वेळी ठरवलं की येत्या मौसमात हे किल्ले करायचे. तिन्हीही किल्ले भले मोठे आहेत. आम्ही ५ लोक उप्या ची गाडी घेऊन निघालो. कर्जत सोडून पुढच्या चौकात ठाकरे कडे वडा, मिसळ आणि भजी झाली आणि तिथून निघालो. मुरबाड मार्गे देहरी गावाकडे पोचलो. हेच ते पायथ्याचे गाव. इथून रस्ता सोपा आहे, असे म्हणतात. अर्थात सर्व रस्ते वर एकाच ठिकाणी येऊन देवळापाशी मिळतात. घनदाट जंगल असलेला हा प्रदेश, खरंच आपल्याला निसर्गात हरवून टाकतो. जातांना माकडाचे हूपहूप, विविध पक्ष्याचा किलबिलाट आणि मधूनच इतर प्राण्यांचे आवाज, ऐकत ऐकत वेळेचे भान विसरून किल्ल्याच्या दिशेनी निघालो. खाली गोरखनाथ महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून पाऊलवाट आहे. १०० मी पुढे गेलात की उजवीकडची वाट पकडायची. त्यावाटेवर अजून १०० - २०० मी गेलात की लाल रंगाची पाटी दिसेल - किल्ल्याकडे असे लिहिलेली. ती मिळाली तर बरोबर नाही तर चुकलात. आम्हाला माहित नव्हते त्यामुळे चुकलो आणि डावीकडे गेलो. बरेच अंतर कापल्यावर लक्षात आले व आम्ही परत मंदिरात येऊन एका माणसाला विचारून पुढे गेलो. गड रस्ता देवीच्या मंदिरापर्यन्त तसा सोपा म्हणायला हरकत नाही. मळलेली वाट आहे.
'पुण्याला पावसानी ओले जिब केले वगरे वगरे' वीज गेली, पुणे अंधारात .... मस्त मातीचा सुगंध जो आता येत नाही पण तरी, असे सर्व घडले आणि परत trekking चालू करायची वेळ झाली. मागच्या वर्षी उन्हाळ्याला न जुमानता आम्ही बरेच जवळ चे किल्ले केले. पण या वर्षी शक्य नाही झालं. मी, चड्डी, उप्या, पिंटू पाटील आणि बीडी, सकाळी ५ ला निघायचे ठरवले. सर्व जण वेळेवर आले आणि आम्ही पिंटू कडून ५ .०५ ला निघालो. मध्ये शहापूर ला एका कंपनी मध्ये कामाच्या निमित्तानी गेलो होतो. तिथून येतांना मुरबाड कर्जत मार्ग धरून परत पुण्याला आलो होतो. येतांना डाव्या हाताला गोरख, मछिंद्र आणि सिद्धगड दिसले. त्याच वेळी ठरवलं की येत्या मौसमात हे किल्ले करायचे. तिन्हीही किल्ले भले मोठे आहेत. आम्ही ५ लोक उप्या ची गाडी घेऊन निघालो. कर्जत सोडून पुढच्या चौकात ठाकरे कडे वडा, मिसळ आणि भजी झाली आणि तिथून निघालो. मुरबाड मार्गे देहरी गावाकडे पोचलो. हेच ते पायथ्याचे गाव. इथून रस्ता सोपा आहे, असे म्हणतात. अर्थात सर्व रस्ते वर एकाच ठिकाणी येऊन देवळापाशी मिळतात. घनदाट जंगल असलेला हा प्रदेश, खरंच आपल्याला निसर्गात हरवून टाकतो. जातांना माकडाचे हूपहूप, विविध पक्ष्याचा किलबिलाट आणि मधूनच इतर प्राण्यांचे आवाज, ऐकत ऐकत वेळेचे भान विसरून किल्ल्याच्या दिशेनी निघालो. खाली गोरखनाथ महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून पाऊलवाट आहे. १०० मी पुढे गेलात की उजवीकडची वाट पकडायची. त्यावाटेवर अजून १०० - २०० मी गेलात की लाल रंगाची पाटी दिसेल - किल्ल्याकडे असे लिहिलेली. ती मिळाली तर बरोबर नाही तर चुकलात. आम्हाला माहित नव्हते त्यामुळे चुकलो आणि डावीकडे गेलो. बरेच अंतर कापल्यावर लक्षात आले व आम्ही परत मंदिरात येऊन एका माणसाला विचारून पुढे गेलो. गड रस्ता देवीच्या मंदिरापर्यन्त तसा सोपा म्हणायला हरकत नाही. मळलेली वाट आहे.
गेल्या चार पाच महिन्यात आमच्या सर्वांच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या. व्यापारात म्हणा नाही तरी घरी. पिंटू नुकताच US हुन परत आला होता. क्रिकेट World Cup चालू झाले होते आणि रविवारी भारत - पाक match होती. सर्व विविध विषयांवर चर्चा चालू होती. खूप दिवसांनी सर्व असे एकत्र आलो होतो, ट्रेक करता. मग आपापल्या आयुष्यात काय काय चालू आहे आणि नाही हे सांगण्यात ऐकण्यात मस्त वेळ चालला होता. पोचायला नाही म्हणाले तरी ३.५ ते ४ तास लागलेच.
देवीच्या मंदिरापासून मात्र वरचा रस्ता काही वेगळाच आहे. कातळात कोरलेल्या पाहिऱ्या आहेत. चढायला जरी सोप्या वाटत असल्या तरी उतरायला या अजिबात सोप्या नाहीत. खूप निवांत आणि काळजी घेत इथून पुढचा trek करावा.
किल्ल्याचा पसारा फार मोठा नाही आणि त्यामुळे थोडे इकडेतिकडे झाले तर मरण. आम्ही पायथ्याशी पोचलो तेव्हा वरून एक कुटुंब खाली उतरत होते. लहान दोन मुली, त्यांचे वडील, अजून एक माणूस आणि त्याच्या हातात ६ ते ८ महिन्यांचे एक बाळ. यांच्या मागे त्यांच्या सौ येत होत्या. मला यांचे कौतुक करायचे का वेडेपण म्हणून सोडून द्यायचे खरच कळत नाही. उतरतांना भयंकर आहे आणि पाय घसरला तर संपले. बीडी नी त्यांची मदत केली आणि सुखरूप खाली पोचले. देव धर्म, विश्वास का अंध विश्वास जे काही आहे त्याचा सर्वच इथे पुरेपूर अनुभव येतो.
या तुटलेल्या पाहिर्या चढून कातळातील कोरलेला प्रमुख दरवाजा बघतांना आणि आत शिरतांना अंगावर काटा येतो. तिथून किल्याच्या पहिल्या टप्यावर पोचता. डावी उजवी कडे पाण्याच्या टाक्या आहेत. पिंटूला खेचून वर आणावे लागते. तेव्हा मात्र खूप धम्माल येते. त्याचा चेहेरा पाहण्यासारखा असतो. इथे तर काही बघायलाच नाको. आमच्यातील सर्वात fit असलेला पण ज्याला उंचीचा or खोलीचा म्हणा त्रास होतो. पिंटू चा व्हिडिओ निघतो आणि मग त्याच्या तोंडातून शिव्यांचा पाऊस. आम्ही ते सर्व पाहत खूप हसतो, पण तसेच त्याला सुखरूप वर नेतो आणि परत खाली उतरवतो.
पाहिर्यांवरचा शिलालेख
वातावरण उत्तम होते. पाऊस नाही झाला पण ऊन पण नव्हते. मधूनच काही शिंतोडे पडायचे. या ठिकाणी पाऊसात उतरणे म्हणजे मरणाला बोलावणे आहे. शक्यतो तसे काहीच करायचे नाही.
वर अजून दोन टप्पे आहेत . परत काही पाहिऱ्या चढून वर गेलात की दुसऱ्या टप्प्यावर पोहोचता. इथे मात्र बघायला खूप काही आहे. डावीकडे एक शिल्प आहे. काही पाण्याच्या टाक्या आणि एक गुहा उजवीकडे खूप मोठी आणि इथे राहण्याची सोया होऊ शकते. तिथे पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गुहेतून मश्चिंद्रगड इतका सुदर दिसतो की काही विचारू नका.
खोल खोल दऱ्या आणि घनदाट जंगले, अवर्णीय दृश्य होय. मोठी गुहा डावीकडे ठेऊन सरळ पुढे गेलात की डावीकडे अजून पाहिर्या लागतात आणि तोच तो अति भयाण रस्ता. इथून गडमाथ्यावर पोचता येते नाही तर थेट वर. अत्यंत कठीण वाट आहे. खाली पडलात तर थेट दरीत. विषय संपला. मग काय करायचे तर मी आणि भूषण वर निघालो तसेच. चढायला अति कठीण नाहीये पण उतरतांना वाट लागते. आमच्या बरोबर तिथे भेटलेला देवेंद्र नावाचा अजून एक मुलगा बरोबर होता. वर पोचल्यावर जो काही आनंद होता तो खाली उतरतांना क्षणात नाहीसा झाला. वर महादेव मंदिर आहे. इथून ३६० deg मध्ये अशक्य view आहे. समोर मश्चिंद्रगड, सिद्धगड आणि लांबवर जीवधन सुदर दिसतो. वर जाऊन देव दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की सुखरूप खाली उतरव. गम्मत म्हणजे हा असा पहिलाच किल्ला पाहिला ज्या वर बजरंगबली नाही. एकही मूर्ती दिसली नाही. याचे कारण सचिन जोशींना विचारले पाहिजे. मूर्तीरूप नाही पण प्रत्यक्ष साक्षात बरीच वानरसेना होती आणि सर्वांना घाबरवत पण होती. त्यांनाच नमस्कार केला आणि पुढे सरसावलो. उतरतांना तोंड चे पाणी पळणे म्हणजे काय, किंवा तोंडाला कोरड पडणे म्हणजे काय ते कळले. चांगलेच.
हीच ती भयानक वाट
महादेव मंदिर - माथ्यावरचे
अर्थात माझं वजन बघता हे सर्व शक्य होते हाच एक चमत्कार आहे. मी आणि भूषण खाली उतरायला सुरु केले. असो. आज इथे आहे लिहायला हे त्याचे आभार. पण, जर हे नसेल आणि असे अनुभव नाही घेता आले तर मग आयुष्याची मजा काय. एकमेकांना मदत करत करत पुढे जायचे. असे मरण दिसणारे क्षण पुढे आले की आपलं आयुयष्य किती छान आहे याची कल्पना, जाणीव होते. पीन पार्वती ला गेलो असतांना असे काही क्षण येऊन गेले. तेव्हा घसरून पडू नये, म्हणून निगडे नी माझा पाय घट्ट दगडा वर दाबून ठेवला. त्याचा आधार घेऊन मी वर चढलो होतो. नसता तो तर काय झाले असते याची कल्पना न करता पुढे जायचे. Satisfaction is what you get, or that is why, we do things we do, to get some comfort , sense of achievement, and not to show anyone, but for yourself. Trekking the mountains, gives me exactly that. पायाचे muscles अजून दुखत आहेत ते सोडा.
सकाळी जी काही थोडी भजी वडा खालला त्यावर तसे काही खालले नव्हते. घरून सँडविच नेलेले संपले कधीच. खाली आलो आणि मंदिरात हाथ पाय धून गाडीपाशी येऊन eggs चेपली. येतांना कोंडाणे लेण्या करायचा प्लॅन होता पण वेळे अभावी पुढे ढकलला. बब्बी ढाबा - अजून एक अजब गोष्ट घडली आहे. जसे साताऱ्या कडचे किल्ले केले तेव्हा येतांना तारांगण नाही तर Lakeview ला जाऊन चेपायचे, ताम्हिणी किल्ले करत असतांना paradise ला जाऊन जेवायचे तसेच मुंबई कडचे किल्ले करत असतांना बब्बीढाबा मिळाला आहे. सर्व गरम गरम आणि चविष्ट आणि स्वस्त असे जेवण इथे मिळते. खूप जेवण चेपून आम्ही तिथून निघालो. घरी येई पर्यन्त ११ वाजले होते. कांडे पण आला पुण्यातून तिथे त्यामुळे अजून मजा आली. गाडीत बसलो आणि क्षणात डोळे मिटले.
गोरखगड, स्मरणात राहील असा किल्ला. या किल्ल्यावर काही लढाई झाल्याचा उल्लेख आढळलेला नाही. Watch Tower म्हणूनच याचा उपयोग होत असावा. या किल्ल्यावर जरूर जाऊन या. जातांना rope घेऊन जा म्हणजे माथ्यावर सहज जाऊ शकाल, न घाबरता आणि सुरक्षितपणे.