जोर - आर्थर सीट - क्षेत्र - जोर
नंदा देवी हुन परत येऊन सुमारे एक महिना झाला. इथे, म्हणजे पुण्य नगरीत थंडी पडायला लागली होती. हिमालयातील ट्रेकिंग season बंद झाला असला तरी आता सहयाद्री मधला चालू झाला आहे. त्यामुळे गड किल्ल्यांवर गर्दी पण वाढू लागली आहे. सचिन जोशी नावाच्या एका मित्रांनी 'पायलट ट्रेककरी' नावाचा एक ग्रुप केला आहे. त्याच्यावर नुकताच मी पण ऍड झालो. त्यांच्या बरोबर माझा हा तिसरा ट्रेक. Dr जोशी असे म्हणाले पाहिजे. अत्यंत छान ट्रेकर, इतिहास अभ्यासक आणि माहिती चा भांडार. धबधबा वाहतो तशा गोष्टी आणि पुराव्या सकट इतिहास वाहतो. त्याच्या बरोबर ट्रेक करायची मजा वेगळीच. त्याला सहज म्हणालो की तू तर 'हरी तात्या' आहेस. तर चटकन म्हणाला मी अभ्यासक आहे, हरी तात्यांसारखा मी मानसिक त्यात गुंतत नाही.
तर सचिन नी हा एक हटके ट्रेक काढला. जोर - आर्थर सीट - क्षेत्र - जोर.
ग्रुप वर चर्चा चालू झाली आणि १४ लोकं जमले. ३ गाड्या करून, व्यवस्तीत कोण कुणाला घेऊन कुठे भेटून पुढे जायचे, सर्व ठरले. जोर हे गाव साधारण वाई पासून ३४ km वर आहे. प्रथम धोम धरण उजवीकडे ठेऊन आणि नंतर बलकवाडी धरण डावीकडे कडे ठेऊन रस्ता संपेल तोवर जात राहिले की जोर गावी येऊन धडकाल. गेल्या पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस पडून रस्ते वाहून गेलेले दिसले. खालच्या कृष्णेला आलेल्या पुरात नदी लगद राहणाऱ्या गावकऱ्यांना जल समाधी मिळाली होती. वरून दरडी कोसळताना जणू भूकंप होतो आहे असा भास होतो असे बाळासाहेब जाधव जे आमचे वाटाड्या होते त्यांनी सांगितले.
७. १५ ला आम्ही कात्रज हुन निघालो आणि जोर गावी पोचे पर्यन्त सुमारे १० वाजले असतील. तिथे जाधव भेटले आणि सचिन नी दुसऱ्या दिवशी चे नियोजन केले. आधी जाधव यायला तयार नव्हते कारण रस्ते सर्व वाहून गेले होते. त्यामुळे फक्त क्षेत्र ला पोचायचे, आर्थर ला चक्कर मारून परत त्याच वाटे उतरायचे असा प्लॅन होता. पण सर्व ट्रेक करी गॅंग नी लावून धरले आणि जाधव यायला तयार झाले. गावातल्या कुंभळजाई मंदिरात रात्र काढायची ठरली. मंदिराच्या समोरील बाजूस गाड्या लावून आणि तिथेच काही लोकांनी टेन्ट उभे करून जेवणाचे डबे उघडले. मंदिरात बसून सर्वांनी ताव मारला. बटाटा भाजी, डाळ, घेवडा, सँडविच, पराठे आणि दही भात छान चटणी सकट.
११.३० च्या सुमारास बाहेर शेकोटी पेटली आणि सर्व जण गोल करून बसले. गप्पा चालू झाल्या. वाद विवाद पेक्षा जास्त संवाद चालू झाला. रामायण महाभारत पासून ते काल पर्यन्त, गोष्टींचे घड्याळ सैरा वैरा पळत होते. सचिन खूप सुंदर बोलत होता. त्याच्या गोष्टी आणि माहिती ऐकणे म्हणजे या ट्रेक चे एक महत्वाचे आकर्षण होय. त्या काय ते ऐकायला तिथेच यावे लागेल. त्याच्या बरोबर ट्रेक करावे लागतील.
सकाळ सकाळ माझे माहेर पांढरी च्या गजरानी जाग आली. आवरा आवारी करून चहा पिऊन आम्ही सर्व आमच्या पहिल्या टप्प्या च्या दिशेनी निघालो. 'बहिरीची घुमटी'. साधारण ५ km वर चालून आणि अनेक झरे ओलांडून बहिरीची घुमटी च्या पायाशी पोचता. रस्ता वाटाड्या नसेल तर सापडणे अशक्य आहे. जातांना कधी जोशी काकांशी गप्पा तर कधी फाटक काकांशी चर्चा. सचिन आजूबाजूला असेल तर त्याच्या मेमरी स्टिक मधून काय डाउनलोड करता येते आहे ते ऐकायचे. भूषण ढेरे या ट्रेक ला आला होता. पटकन मिसळून पण गेला. आमच्या ग्रुप मध्ये त्यालाच आम्ही हरी तात्या म्हणायचो. कधी हेमंत बरोबर तर कधी साठे बरोबर, कधी राजेश शी अध्यात्मिक चर्चा करत तर कधी अजून कोणाशी काही तरी गप्पा मारत. एकंदरीत सर्व जण 'बहिरीची घुमटी ' ला पोचले. तिथून समोर आर्थर सीट उंच दिसते, पलीकडे चंद्रगड, मंगळगड, रायरेश्वर पठार आणि मोहनगड चे दर्शन होते. उंच उंच डोंगरांच्या अनेक पाठोपाठ रांगा बघतांना भारी वाटते. चेतन नी मारझोरिन चे तर मी घरून असे चटणी सँडविच आणले होते. इथे बसून सर्वांनी सँडविच हाणले, चिवडा खालला आणि आर्थर सीट च्या दिशेनी निघालो.
चहा पिऊन क्षेत्र महाबळेश्वर ला आम्ही सर्व निघालो. काही बोलेरो करून गेले तर काही चालत. कृष्णाई मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तिथल्याच मागच्या वाटेनी आम्ही परत जोर गावात उतरायला सुरुवात केली. १.५ तास लागला असेल, साधारण ४. ३० च्या सुमारास परत आम्ही देवळात पोचलो.
फारच सुंदर असा ट्रेक झाला. महाबळेहस्वर च्या एका बाजूला ही तोबा गर्दी. हजारो लोकांनी केलेला ट्रॅफिक जॅम. जिकडे तिकडे केलेली घाण. आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल, निर्मनुष्य, शांत निसर्ग. पुण्यापासून इतके जवळ पण याचा अनुभव घ्यायला इतकी वर्ष लागली याची खंत....... पण आज तो अनुभव आला याचा परमानंद.