Sunday, 17 February 2019

Run Jokers Run in Prahar to How's the JOSH in URI !!!





शाळेत असतांना प्रहार नावाचा नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आला होता. माला आठवते  की निलायम टॉकीज़ ला तो पाहिला होता. NDA  वेड अणि Armed Forces  मध्ये जायची इच्छा खुप लहानपणी पासून होती. अजूनही आहे. अर्थात तेव्हा कळले की तिथे जायची पात्रता माझा मध्ये नाही. Forces  मध्ये प्रवेश मिळवायला Mental, physical and emotional  fitness खूप गरजेचा आहे. प्रहार पाहिला आणि तेव्हा सुद्धा Bus मधल्या अतिरेक्यांना मारल्या वर जय हिंद आणि भारत माता की जय च्या आरोळ्या ठोकल्या. १९९१ ला चित्रपट आला. २०१९ ला उरी पाहिला गेलो आणि अंगात संचारल्या सारखे परत शेवटी त्याच आरोळ्या ठोकल्या. छान वाटलं ओरडून. शेजारी करण आणि तन्वी बसले होते. त्यांना कदाचित वाटले असेल की बाबा असे काय करतोय. असे काय वागतोय. खरं सांगू ना तर त्यांना मी सांगू शकत नाही की मी इतकच करू शकतो. आरोळ्या ठोकण्याशिवाय आणि फेसबुक वर जाऊन काही तरी लिहिण्याशिवाय अथवा इथे blog  वर विचार मांडण्याशिवाय ..... प्रयत्न कमी पडले, मी नाही clear करू शकलो  S S B. नाही तर मला पण ठोकायला मिळाले असते या पाकिस्थानी अतिरेक्यांना. खूप त्रास होतो आणि रक्त खवळते. आजही. आजही तेव्हडेच तसेच त्याच कारणांनी ....त्याच आपल्या बांधवांच्या मृत्यूमुळे .... त्यांच्या बलिदानामुळे ....
१९९१ - २०१८ काय फरक पडला आहे. माझ्या भावना जर त्याच असतील तर काय फरक पडला आहे. मी विचार करत होतो. एक सकारात्मक विचार, ज्याला शांतपणा, सद्सद्विवेक बुद्धी, सहनशीलता वगरे ठेऊन केला जातो आणि दुसरा शंभो विचार.

१९९१ प्रहार time  पासून ते आत्ता २०१९ उरी time भारतात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. Development च्या दृष्टींनी आपण १०० वर्ष पुढे आलो आहे. भारताची १०० वर्ष. एकीकडे अवकाशात सॅटेलाइट पाठवणारे ISRO, पासून ते जगात नाव कमावणारे Infosys, TATA सारखे बलाढ्य समूह. जगात Google आणि Microsoft चालवणारे पण आज आपलीच माणसे आहेत. जगावर प्रभाव टाकत गेले किती तरी वर्ष भारत सर्व अतिरेकी हल्ले सहन करत आला आहे. आपला देश हा सहनशील आहे. युद्ध झाले  तर development मार खाईल. आणि नागरिक मारले जातील. जिवीत हानी होईल. त्यामुळे एकीकडे सौरक्षण आणि एकीकडे आधुनिकरण असे प्रयत्न चालू आहेत. गम्मत म्हणजे त्यावेळी बोफोर्स चे घोटाळे होते आणि आज Rafale चे घोटाळे समोर आणण्याचा प्रयत्न. भारत हा प्रगतीपथावर आहे त्यामुळे युद्ध नको. आत्ता सहन करा. आपलं काय जातंय. कोणी तरी Director / Producer already स्पॉट वर जाऊन फोटो काढून चित्र रंगवून नवीन dialogues लिहायला सुरु केले असतील. पुढं चित्रपट लवकरच येईल तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात......

१९९१ प्रहार time  पासून ते आत्ता २०१९ उरी time भारतात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत......Bombay  Attack, Parliament, Gujarat, Pune, हैदराबाद, कुठले शहर जिथे हे झाले नाही..... जम्मू काश्मीर खोऱ्यात तर दररोज चालू आहे. कधी अतिरेकी मारतात तर कधी दहशदवादी, कधी उल्फा तर कधी नक्षलवादी..... काही नाही तर गल्ली बोळातले या दळभद्री आणि खरकट्या राज्यकर्त्यांनी पाळलेले गुंड. ते इथे राहून हल्ले करतात, सामान्य माणसावर हे अतिरेकी आत्मघातकी हल्ले करतात. डोकी शून्य असलेली. मरतात कोण तर आपलीच माणसं. मग मनात विचार येतात. ताज च्या हल्यात पोलिसांनी अतिरेक्यांना मारून टाकले. त्यांच्या चिथड्या केल्या. म्हणजे त्यांना हे सर्व शक्य आहे. मग त्यांना इथेच राहणाऱ्या दररोज दिसणाऱ्या गुंडांना मारणं का शक्य नाही. हे का विचार हे पण सांगतो. आज आपण इतके सहनशील झालो आहोत की शहरातल्या गुंडांना काही करू शकत नाही. हे तर मोठे अतिरेकी आहेत. त्यांच्या कडे सर्व शास्त्र आहेत. ते षंढ पण आहेत कारण लपून हल्ले करतात. मग या गांडुळांचे खत म्हणून वापर करण्याशिवाय काय करावे. Wednesday सारखे चित्रपट येतात आणि अजून काही तरी  सांगून जातात. सहन किती करायचे आणि कधी पर्यन्त करायचे. इथे जात पात धर्म काही नाही. इथे फक्त वाईट आणि चांगले हे दोनच. महाराजांचा आदर्श ठेवणारे आपण, का नाही या गनिमांना, एकत्र येऊन मारत. का नाही क्रांती होत परत. का नाही देश एकत्र येऊन या सर्वांचा या प्रवृत्तीचा नाश करत. Indian  Armed   Forces are more than capable to crush the bastards. Then why not. फक्त जवानांनीच आहुती द्यायची आणि त्यांनीच बलिदान द्यायचे असे का ? नागरिक या नात्यानी देश सौरक्षणाची आपली काही जवाबदारी नाही काय ? US  चे अनुकरण करतो आपण.....बऱ्याच बाबतीत. मग तिथे १८ वर्ष झाला मुलगा की त्याला एक वर्ष देशासाठी द्यावे लागते वेळ आली की. एक हल्ला झाला WTC वर आणि त्या नंतर कोणीही डोळे वर करून पाहू शकले नाहीत. मग आपण इतके वर्ष का सहन करत आहोत. 

या हल्ल्यातून एकच एक गोष्ट समोर येते की हे परत परत होणार. मुळापासून उखडले नाही तर हे परत होणार. या हल्यात हे पण नक्की आहे की हा एक माणूस नुसता या मागे नाही. कारण त्यांना इतके डोकंच नाहीये. कोणीतरी मदत करत आहे. सर्व हालचालींवर डोळा आहे. आणि त्यामुळेच हे घडू शकले. "या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो" - घंटा निषेध. आता हे निषेध वगरे सर्व बस झाले. आता उध्वस्त करायची वेळ आली आहे. काश्मीर आमचं आहे आणि ते आमचच राहणार आहे. तुम्हाला आता शाल श्रीफळ देऊन घरी पाठवणार.... शालीचा रंग लाल आणि श्रीफळाचा काळा..... 

थांबवले पाहिजे. मी तयार आहे. बलिदान द्यायला, देशासाठी मारायला......... जय हिंद !!! 



























No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...