सोनगिरी २३. ११. १९
अजून तरी महाराष्ट्राचा पेच सुटला नव्हता. गेला आठवडा दहा दिवस अजून काहीच चालू नव्हतं. सर्व मीडिया ला इतकं खाद्य होता की जगबुडी झाली असती तरी मीडिया आणि पक्ष किती आमदार आहेत गेलेत आलेत येतील जातील राहतील आणि वेगवेगळी गणितं मांडण्यात मग्न. कर्जत ला पोचलो आणि ठाकरे कडे नेहमी प्रमणे थांबलो. ठाकरे म्हणजे चौकातील वडेवाला आणि भजीवाला. उत्तम चवीचे ठिकाण आहे. मी चड्डी आणि बि डी, सकाळी ६. ३० ला निघालो. ठाकरे कडे पोचलो तेव्हा ८. ३० वाजले असतील. बसलो आणि बातमी कळली की सकाळीच CM आणि Deputy CM ची शपथविधी उरकली आहे. काहीच कळायला तयार नाही की ही खेळी कोणाची. अर्थात पवार साहेब हा विषय सर्वांच्या बोलण्यात आलाच. राष्ट्रवादी आणि बाजप एकत्र येऊन सरकार बनले. अफवा काही थांबत नव्हत्या. Jokes चा सुळसुळाट झाला होता. रातोरात काम तमाम. आम्ही खूप हसलो, मिसळ चेपली आणि तिथून निघालो. कोणीही सरकार बनवा आपल्याला तसा काही फरक नाही पडत कारण फरक पाडण्याइतके आपण मोठे नाही. आणि या निवडणुकीनंतर कळले की Democracy मध्ये सर्वात तुच्छ कोण, तर मतदार. असो.
तटबंदी चे अवशेष
टाकी
फारच छोटासा गडमाथा आहे
कर्जत सोडून पुढे आलात की नावली नावाच्या गावापाशी पोचावे. हेच ते पायथ्याचे गाव. पावसाळा नुकताच झाला होता आणि त्यामुळे गवत खूप वाढले होते. वाट नं दिसल्याने आमची मात्र वाट लागली. खरंतर तशी मळलेली वाट आहे पण सापडणे आत्ता तरी अव्हागड आहे. दोन टेकड्या चढून गडाच्या माथ्याजवळ पोचता. तिथून झेंडा दिसतो. इथे पोचलात की वाट सहज नाही सापडत. गडाच्या डाव्याबाजूनी वाट आहे. कातळकड्या च्या डावीकडून जावे. कडा उजवीकडे ठेऊन वाट सरळ एक बेचक्यात जाते. किल्ला आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या टेकडी मधील भागात पोचाल. तिथून जरा जपून वर जावे लागते. रस्ता निसरडा आहे.
किल्ल्यावर तस बघण्यासारखे काही फार नाही. एक दोन टाक्या आहेत आणि काही अवशेष. वर इतकं गवत वाढले आहे आणि इतके किडे होते की काही विचारू नका. मला आणि चेतन ला अनेक गोचीड चावल्या.
वर झेंड्या पाशी पोचली आणि खालून काही मुलांचे आवाज ऐकू आले. ते हरवले होते आणि परत निघाले होते. आम्ही दिसलो त्यामुळे त्यांना पण आनंद झाला. त्यांना मग वाट सापडली आणि ते पण किल्ल्या वर पोचले. साधारण १ ते १. १५ तासात वर जाणे काही अव्हागड नाही. पण आम्ही चुकलो रस्ता त्यामुळे वेळ लागला. ऊन प्रचंड होते. या वेळेला काही खायला बरोबर नेले नव्हते त्यामुळे जरा त्रास झाला. इलेकट्रोल नी वाचवले इतकच.
एकंदरीत गडाकडे बघता हा एक Watch Tower म्हणून वापरात असावे. गडावरून प्रबळगड, राजमाची, धाक, भिवगड असे अनेक किल्ले छान दिसतात. ट्रेकिंग ची आवड असली तर जावे नाही तर इथे विशेष काही नाही. अजून एक नवीन किल्ला झाला इतकच ते सुख.
तिथून निघालो आणि कोंडाणे लेण्या बघायला गेलो. पोचे पर्यन्त ३ वाजले होते आणि जेवण पण मिळाले नाही. त्यामुळे प्लॅन कॅन्सल करून परत पुण्याच्या दिशेनी निघालो.