माहुलीगड १६. ११. १९
पावसाळा संपता संपत नव्हता. नोव्हेंबर आला तरी कुठे जात नव्हता. इतका की पुणेकरांना पुण्यात राहतो का पावसात हे कळेनासे झाले होते. पण गेला एकदाचा आणि आमच्या ट्रेकिंग ला मुहूर्त लागला. गोरखगड झाल्यानंतर ट्रेकिंग ला ब्रेक लागला होता. बीडी नी माहुली नावाचा किल्ला सुचवला आणि तिथे जाण्याचे ठरले. शहापूर जवळ आसनगाव नावाचे ठिकाण आहे. तिथून ३ कि मी वर साधारण हा किल्ला आहे. ठाण्याहून शहापूर कडे जातांना डावीकडे उंच उंच सुळके आणि डोंगर रांगा दिसतात, तेच ते किल्ले - माहुली, भंडारगड आणि पळसगड. सर्व नीट पहावयाचे असेल तर मुक्काम करावा. आम्ही नाही केला त्यामुळे आम्हाला परत जायला लागणार आहे.
मी, बीडी आणि चेतन, पहाटे ५ च्या सुमारास पुण्यातून निघालो. पायथ्याशी पोहोचे पर्यन्त ९. १५ झाले होते. येतांना घाटात थोडे खालले आणि निघालो. हा किल्ला खूप मोठा आहे. उन्हात न झेपणारा आहे. Here weather is too humid. We miscalculated few things. सर्वात महत्वाचे म्हणजे सकाळी लवकर नाही तर संध्याकाळी किल्ला चढला तरी चालेल. वाट मळलेली आहे आणि बरेच ठिकाणी पाट्या आहेत. त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे. दुसरे म्हणजे उन्हात जर का केलात तर पाणी इलेकट्रोल भरपूर नेणे. अर्ध्या किल्ल्या पर्यन्त खूप मस्त जंगल आहे. वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. त्यामुळे पक्षी प्रेमींसाठी हे अभयारण्य म्हणजे स्वर्ग आहे.
बाप्पा मंदिर पायथ्याचे
रु ३० Entry Fee
गप्पा टप्पा करत करत आम्ही १२. १५ ला शिडीपाशी पोचलो. ३ तास लागले. कदाचित आत्तापर्यन्त केलेल्या ट्रेक मध्ये ह्या किल्ल्यांनी सर्वात जास्त त्रास दिला मला.
मनात बरेच विचार चालू होते. माझा एक जवळचा मित्र कॅन्सर शी झुंज लढत होता. कोणीच काही करू शकणार नव्हते हे कळून चुकले होते. आठवड्यातून तीन दिवस तो आणि त्याची बायको आणि आम्ही रुपालीत कॉफी ला भेटत असत. एक पापभिरू आणि निर्व्यसनी सज्जन माणूस. त्याचे नाव रमेश. परतीच्या वाटेवर होतो तेव्हा एक फोन आला की रमेश गेला. त्या दिवशी किल्ल्यावर जात असतांना आमच्या गप्पा, त्याचे हसणे आणि त्याचे सर्व जगाकडे बघायचे दृष्टिकोन, त्यांची छोटी छोटी भांडणं सर्व डोळ्या समोर येत होते. १.५ वर्ष हा माणूस fight करत होता. त्याच्या कडून दोन खूप मोठ्या गोष्टी शिकण्याजोग्या. हार मानायची नाही आणि आयुष्य खूप क्षणिक आहे. नेहमी हसत राहायचे. माझ्या आयुष्यातील माझा एक जवळचा मित्र जाणे आणि मी त्याला पोचवणे हे पहिल्यांदाच घडले. माहुली ही रमेश ची आठवण देऊन जाणार दर वेळी. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो.
बी डी सुटला होता आणि मी आणि चड्डी रांगत रांगत वर पोचत होतो. शिडी दिसली आणि जीव भांड्यात पडला. गड खूप मोठा आहे. डावीकडे भंडारगड, मध्ये माहुलीगड आणि उजवीकडे पळसगड, अशा तीन किल्ल्यांची ही खूप भव्य अशी डोंगर रांग आहे.
एक किल्ल्यावरून दुसऱ्यावर जाता येते. आम्ही पळसगड च्या वाटेनी निघालो. जातांना एक मोठा वृक्ष आणि त्याखालील सावली, असे विलोभनीय दृश्य दिसताचक्षणी मी आडवा झालो आणि चक्क घोरायला लागलो. थंड हवेत इतकी भारी झोप लागली की त्या १५ / २० मी च्या डुलकीनी सर्व शीण नाहीसा झाला. तिथे काही टाके, तलाव, आणि एक खूप सुंदर प्रमुख दरवाजा आहे. पडलेला आहे पण अंदाज बांधता येतो की त्या काळात किती सुदर असेल. तिथेच गुहा आहेत आणि राहता येऊ शकते. वरून पडणाऱ्या पाण्यातून आम्ही रिकाम्या झालेल्या बाटल्या भरल्या. खायला काही नेले नव्हते. काही प्रोटीन बार होते ते संपवले. 'पळसगड कडे' असा बोर्ड वाचला, पण आज शक्य नव्हते. खाली उरायचे होते आणि वेळेत. परत ४ तास प्रवास करून पुण्याला पोचायचे होते. बी डी थोडासा हिरमुसला पण काही इलाज नव्हता.
आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि शिडी पाशी आलो. चड्डीच्या बुटांनी घात केला. त्यामुळे त्याला चालणे कठीण होत होते. उतरतांना कळले की आपण किती चढलो आहे किल्ला ते. उतरतांना संपत नव्हता हा किल्ला. एकंदरीत, season च्या सुरुवातीलाच आमची परीक्षा झाली आणि आम्ही काठावर का होईना पण पास झालो. खाली पोचल्यावर एक लहानश्या हॉटेल मध्ये पिठलं पोळी आणि चहा मिळाला आणि पोटात लागलेली आग थोडीशी विजली. माहुलीला परत जायचे आहे. एक दिवस राहायचे आहे आणि उरलेले दोन किल्ले पाहायचे आहेत. या किल्ल्यावर खूप रक्तपात झाला आहे. एक अजब असा किल्ला आहे, जिंकणे कठीण आहे. इथे महाराजांचे अस्तित्व आहे. इथे जाणे जरुरी आहे.
एक किल्ल्यावरून दुसऱ्यावर जाता येते. आम्ही पळसगड च्या वाटेनी निघालो. जातांना एक मोठा वृक्ष आणि त्याखालील सावली, असे विलोभनीय दृश्य दिसताचक्षणी मी आडवा झालो आणि चक्क घोरायला लागलो. थंड हवेत इतकी भारी झोप लागली की त्या १५ / २० मी च्या डुलकीनी सर्व शीण नाहीसा झाला. तिथे काही टाके, तलाव, आणि एक खूप सुंदर प्रमुख दरवाजा आहे. पडलेला आहे पण अंदाज बांधता येतो की त्या काळात किती सुदर असेल. तिथेच गुहा आहेत आणि राहता येऊ शकते. वरून पडणाऱ्या पाण्यातून आम्ही रिकाम्या झालेल्या बाटल्या भरल्या. खायला काही नेले नव्हते. काही प्रोटीन बार होते ते संपवले. 'पळसगड कडे' असा बोर्ड वाचला, पण आज शक्य नव्हते. खाली उरायचे होते आणि वेळेत. परत ४ तास प्रवास करून पुण्याला पोचायचे होते. बी डी थोडासा हिरमुसला पण काही इलाज नव्हता.
तटबंदी
पाणी होता म्हणून वाचलो
हॉटेल 'CaveInn' सुंदर राहायची सोय
महादरवाजा - भव्य
आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि शिडी पाशी आलो. चड्डीच्या बुटांनी घात केला. त्यामुळे त्याला चालणे कठीण होत होते. उतरतांना कळले की आपण किती चढलो आहे किल्ला ते. उतरतांना संपत नव्हता हा किल्ला. एकंदरीत, season च्या सुरुवातीलाच आमची परीक्षा झाली आणि आम्ही काठावर का होईना पण पास झालो. खाली पोचल्यावर एक लहानश्या हॉटेल मध्ये पिठलं पोळी आणि चहा मिळाला आणि पोटात लागलेली आग थोडीशी विजली. माहुलीला परत जायचे आहे. एक दिवस राहायचे आहे आणि उरलेले दोन किल्ले पाहायचे आहेत. या किल्ल्यावर खूप रक्तपात झाला आहे. एक अजब असा किल्ला आहे, जिंकणे कठीण आहे. इथे महाराजांचे अस्तित्व आहे. इथे जाणे जरुरी आहे.
इतिहास
या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली, हे ज्ञात नाही. पण १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५- ३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर , शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली, पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली.पुढे १६५८ मध्ये ८ जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबदार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा नवा किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराजांच्या असे पर्यंत मोगलांना हा किल्ला जिंकता आला नाही, पण त्यांच्या वधानंतर व्दारकोजी या किल्लेदाराने फितुरीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्यांची चाकरी पत्करली. त्यानंतर प्रयत्न करूनही मराठ्यांना हा किल्ला १७३५ पर्यंत जिंकता आला नाही. गडावर हल्ला चढवून गड घेणे अवघड असल्यामुळे भेदनीतीचा वापर करुन गड ताब्यात घेतला.पुढे दुसर्या बाजीरावाने जून १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला.
No comments:
Post a Comment