गुडी पाडवा - या वर्षी याचे महत्व जरा जास्तच आहे.
म्हणतात की ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय सुरुवात , सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. थोडक्यात नवी सुरुवात म्हणायला हरकत नाही. पण ही कश्याची सुरुवात म्हणायची, हे कोडे काळच सांगेल. तरी आपण प्रयत्न करूया, विचार करूया, काही उलगडते का पाहूया. मनात कोडी खूप आहेत, पण त्याच कोड्यात काही उत्तरं पण आहेत. ती शोधायचा प्रयत्न करूयात. या ब्लॉग मध्ये जे काही आहे ते माझे विचार आहेत आणि त्यामुळे कोणाला दुखलं तर मी आत्ताच क्षमा मागतो.
गुडी पाडवा म्हणजे बाबा चा वाढदिवस. दर वर्षी या दिवशी माझे काका आणि आत्या घरी जेवायला येतात. या वर्षी पण ठरले होते, पण अर्थातच ते घडले नाही. एका प्रथेचा शेवट झाला. सकाळी गुडी उभारतांना मनात विचारांचा कल्लोळ चालू होता. जगावर आलेले हे एक संकट, कोरोना चे, आणि त्यांनी मिटलेले अनेकांचे डोळे, केलेला विनाश आणि मनुष्य प्राण्याला दाखवून दिलेली निसर्गाची शक्ती, यांनी तरी माणसाचे डोळे उघडणार आहेत का ?
इंग्रजांनी हिंदू मुस्लिम distancing करून काही वर्ष का होईना राज्य केले. आजचे राज्यकर्ते तेच करतात, माणसांच्यात जाती धर्माचा आधार घेऊन फूट पडतात.... आणि काय मत मिळवतात. आणि काय पैसे ओढतात. पुढे काय. निसर्गाच्या समोर सर्व एकच. तो पाहत नाही की हा हिंदू आहे का अजून कोणी. जाती धर्माच्या या भांडणांतून आज या प्रथेचा शेवट करून नवीन सुरुवात करायची का ?
सकाळी गच्चीवर गेलो होतो. काल पाऊस झाला. वातावरण थंड होते. आणि आभाळ स्वच्छ. US मध्ये असतांना दूर दूर वर छान दिसत असेल. प्रदूषण कमी असल्यानी असेल. पण आज पुण्यात पण तोच अनुभव आला. एक आठवडा झाला असेल, वाहने रस्त्यावर नसल्यात जमा आहेत. पुणे स्वच्छ झाले आहे. यातून काही तरी शिकून आपण शहाणे होऊ का ? या गुडी पाडव्याला सर्व जण ठरवून आठवड्यातून २ दिवस वाहन न वापरण्याची गुडी उभारू का ?
कामाच्या निमित्ताने, गेले काही वर्ष माझे गावोगावी फिरणे चालू आहे. त्यात ट्रेकिंग मुळे बऱ्याच अशा गावांचा परिचय झाला आहे, जिथे बस किंवा इतर वाहने जाऊच शकत नाहीत. तिथे आपलीच माणसे अगदी बेसिक मध्ये राहतात. तिथल्या प्रथा पाळतात आणि दोन घास खाऊन सुखी जीवन जगतात. आता हे आपल्याला, सर्वांना शक्य नाहीये हे पण तितकच खरं. पण त्यांच्या सारखे जगायला गावातच जावे लागते असे नाही. इथे पण तसे जगू शकतो. तसे म्हणजे नक्की कसे ? Basics मध्ये म्हणजे कसे. जितके पुरते किंवा जितक्याची आवश्यकता आहे तितकेच. मग ते पाणी असो वा पेट्रोल, वीज असो वा अजून काही. आज संकट आलं तर सर्वांना सर्व जमले. मग तसेच छान काटकसरीत राहू शकतो का आपण. निसर्गाचे जतन करू शकतो का आपण ? या वर्षी तीच ती गुडी उभारूया. अर्थात हे संकट टळले की माणूस धर्म आपण पाळणारच, नाश चालू करणारच... तरी एक अशा, या पाडव्याला.
काही लोकांना आपण खूप गृहीत धरतो. सहज घरी अन्न येते, सहज दूध, सहज औषधं आणि सहज मेडिकल सेवा. हीच सहज कामं करणारी आपली माणसे आज दिवस रात्र एक करून रुगणांना वाचवत आहेत. बॉर्डर वरचे जसे तशीच ही एक युद्ध भूमी बनली आहे. मामा, नर्सेस, अनाथ आश्रम सांभाळणारे, वृद्धांची काळजी घेणारे, पोलीस, रस्ते नीटनेटके ठेवणारे, कचरा उचलणारे, आपल्या जीवाची न पर्वा करता सतत काम करत आहेत. आज या लोकांच्या कष्टाचे, धैर्याचे कौतुक म्हणून आपण गुडी उभारूया. माझे या सर्व सैनिकांना शतशः प्रणाम.
आपल्या हयातीत असे हे Lockdown पहिल्यांदाच झाले आहे. आणि मला वाटते ही विनाशाची सुरुवात आहे. हे आता होत राहणार जोवर माणूस निसर्गाला त्रास देणे बंद करत नाही तोवर. हा आजचा पाडवा विनाशाची सुरुवात तर करणारा नाही ना हीच भीती आहे. आता भीती आली की परत देव आला की परत कोणता देव की परत धर्म आला ... ..... ..... ....
नव नवीन पक्षी दिसायला लागले आहेत अचानक. खरे पक्षी......
म्हणतात की ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय सुरुवात , सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. थोडक्यात नवी सुरुवात म्हणायला हरकत नाही. पण ही कश्याची सुरुवात म्हणायची, हे कोडे काळच सांगेल. तरी आपण प्रयत्न करूया, विचार करूया, काही उलगडते का पाहूया. मनात कोडी खूप आहेत, पण त्याच कोड्यात काही उत्तरं पण आहेत. ती शोधायचा प्रयत्न करूयात. या ब्लॉग मध्ये जे काही आहे ते माझे विचार आहेत आणि त्यामुळे कोणाला दुखलं तर मी आत्ताच क्षमा मागतो.
गुडी पाडवा म्हणजे बाबा चा वाढदिवस. दर वर्षी या दिवशी माझे काका आणि आत्या घरी जेवायला येतात. या वर्षी पण ठरले होते, पण अर्थातच ते घडले नाही. एका प्रथेचा शेवट झाला. सकाळी गुडी उभारतांना मनात विचारांचा कल्लोळ चालू होता. जगावर आलेले हे एक संकट, कोरोना चे, आणि त्यांनी मिटलेले अनेकांचे डोळे, केलेला विनाश आणि मनुष्य प्राण्याला दाखवून दिलेली निसर्गाची शक्ती, यांनी तरी माणसाचे डोळे उघडणार आहेत का ?
इंग्रजांनी हिंदू मुस्लिम distancing करून काही वर्ष का होईना राज्य केले. आजचे राज्यकर्ते तेच करतात, माणसांच्यात जाती धर्माचा आधार घेऊन फूट पडतात.... आणि काय मत मिळवतात. आणि काय पैसे ओढतात. पुढे काय. निसर्गाच्या समोर सर्व एकच. तो पाहत नाही की हा हिंदू आहे का अजून कोणी. जाती धर्माच्या या भांडणांतून आज या प्रथेचा शेवट करून नवीन सुरुवात करायची का ?
सकाळी गच्चीवर गेलो होतो. काल पाऊस झाला. वातावरण थंड होते. आणि आभाळ स्वच्छ. US मध्ये असतांना दूर दूर वर छान दिसत असेल. प्रदूषण कमी असल्यानी असेल. पण आज पुण्यात पण तोच अनुभव आला. एक आठवडा झाला असेल, वाहने रस्त्यावर नसल्यात जमा आहेत. पुणे स्वच्छ झाले आहे. यातून काही तरी शिकून आपण शहाणे होऊ का ? या गुडी पाडव्याला सर्व जण ठरवून आठवड्यातून २ दिवस वाहन न वापरण्याची गुडी उभारू का ?
कामाच्या निमित्ताने, गेले काही वर्ष माझे गावोगावी फिरणे चालू आहे. त्यात ट्रेकिंग मुळे बऱ्याच अशा गावांचा परिचय झाला आहे, जिथे बस किंवा इतर वाहने जाऊच शकत नाहीत. तिथे आपलीच माणसे अगदी बेसिक मध्ये राहतात. तिथल्या प्रथा पाळतात आणि दोन घास खाऊन सुखी जीवन जगतात. आता हे आपल्याला, सर्वांना शक्य नाहीये हे पण तितकच खरं. पण त्यांच्या सारखे जगायला गावातच जावे लागते असे नाही. इथे पण तसे जगू शकतो. तसे म्हणजे नक्की कसे ? Basics मध्ये म्हणजे कसे. जितके पुरते किंवा जितक्याची आवश्यकता आहे तितकेच. मग ते पाणी असो वा पेट्रोल, वीज असो वा अजून काही. आज संकट आलं तर सर्वांना सर्व जमले. मग तसेच छान काटकसरीत राहू शकतो का आपण. निसर्गाचे जतन करू शकतो का आपण ? या वर्षी तीच ती गुडी उभारूया. अर्थात हे संकट टळले की माणूस धर्म आपण पाळणारच, नाश चालू करणारच... तरी एक अशा, या पाडव्याला.
काही लोकांना आपण खूप गृहीत धरतो. सहज घरी अन्न येते, सहज दूध, सहज औषधं आणि सहज मेडिकल सेवा. हीच सहज कामं करणारी आपली माणसे आज दिवस रात्र एक करून रुगणांना वाचवत आहेत. बॉर्डर वरचे जसे तशीच ही एक युद्ध भूमी बनली आहे. मामा, नर्सेस, अनाथ आश्रम सांभाळणारे, वृद्धांची काळजी घेणारे, पोलीस, रस्ते नीटनेटके ठेवणारे, कचरा उचलणारे, आपल्या जीवाची न पर्वा करता सतत काम करत आहेत. आज या लोकांच्या कष्टाचे, धैर्याचे कौतुक म्हणून आपण गुडी उभारूया. माझे या सर्व सैनिकांना शतशः प्रणाम.
आपल्या हयातीत असे हे Lockdown पहिल्यांदाच झाले आहे. आणि मला वाटते ही विनाशाची सुरुवात आहे. हे आता होत राहणार जोवर माणूस निसर्गाला त्रास देणे बंद करत नाही तोवर. हा आजचा पाडवा विनाशाची सुरुवात तर करणारा नाही ना हीच भीती आहे. आता भीती आली की परत देव आला की परत कोणता देव की परत धर्म आला ... ..... ..... ....
नव नवीन पक्षी दिसायला लागले आहेत अचानक. खरे पक्षी......