मधुमकरंद गड
रस्ते मोकळे, टोल नाके रिकामे, पाचगणी आणि महाबळेश्वर येथे जणू काही नाकाबंदी आहे, असे वातावरण. पहाटे ५. ३० ची वेळ असेल जेव्हा आम्ही पुणे सोडले. चड्डी च्या घरी मी पिंटू आणि भूषण पोचलो आणि २ महिन्यांच्या गॅप नंतर परत पुढच्या ट्रेक ला निघालो. करोना virus नी जगाला शांत केले होते. पुण्य नगरीत जिथे रस्ता क्रॉस करणे आता कठीण झाले आहे, जिथे श्वास घेणे मुश्किल झाले आहे, तिथे पण हा येऊन पोचला होता. शाळा कॉलेज मॉल आणि इतर बरेच काही सर्व बंद ठेवण्याचा आदेश आला होता. धंदे ठप्प पडले होते आणि शेअर बाजार कोसळले होते. अशाच एका शनिवारी, आम्ही मधुमकरंद गडावर जायचे ठरवले. माची पर्यन्त जीप जाऊ शकते असे कळले त्यामुळे THAR घेऊन आम्ही निघालो. खंबाटकीच्या अलीकडे उजवीकडे कामत च्या समोर नेहमीच्या हॉटेल मध्ये गरम गरम चहा पोहे खाऊन महाबळेश्वर पोलादपूर मार्गाच्या दिशेनी गाडी नेली. पुण्यापासून साधारण १५० कि मी असणारा हा किल्ला, तसा लपलेला म्हणायला हरकत नाही. पोलादपूर चा वळणदार घाट उतरत आणि मागे बसलेल्या बिडी आणि पिंटू च्या शिव्या ऐकत आम्ही पार नावाच्या पाटी पाशी पोचलो. THAR मध्ये मागे बसणे म्हणजे एक शिक्षा आहे. मी आणि चड्डी पुढे सुखी होतो आणि त्यांची मजा घेत होतो. बिडी चे "तुझी बॅट आहे त्यामुळे batting तूच करणार" वगैरे मागून ऐकू येत होते.
पार फाट्यावर डावी कडे वळून रस्ता चतुर्बेट नावाच्या गावाशी पोचतो. हेच ते पायथ्याचे गाव. तिथून एक खडबडीत रस्ता घोणसपूर नावाच्या वस्तीवर जातो. हे माचीवरच्या गाव. तिथे १० - १५ घरांची वस्ती आहे. खाली एक सुंदर मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर असे म्हणतात.
गाडी तिथे लावून आम्ही गडावर निघालो. वाट मळलेली आहे, चढण आहे पण २० मि च्या आत तुम्ही मकरंदगडावर पोचता. पडलेला गडाचा दरवाजा लेगच दिसून येतो.
गडावर जायच्या आधी एक वाट उजवीकडे जाते. त्या वाटेनी गेलात तर खांब टाक्याजवळ पोचता. असे म्हणातात की तिथे गुहा आहेत. खांब आहेत त्यामुळे कदाचित आत बरेच काही असेल असा अंदाज आहे.
परतीच्या वाटेवरच उजवीकडे गडावर जायच्या पाहिऱ्या आहेत. सावकाश जावे कारण या तुटलेल्या आहेत. ५ मिनिटात गड माथ्यावर असलेल्या महादेव मंदिरापाशी जाऊन पोचता. बाहेर असलेला नंदी आणि आत सुदर शंकराची पिंड, जी बऱ्यापैकी मोठ्या गाभाऱ्यात आहे. तिथे बाहेरच्या बाजूला १० जण राहू शकतील अशी सोय आहे.
मंदिरा समोर एक चौथरा आहे आणि काही अवशेष. तिथे एक समाधी तत्सम काही तरी आढळून येते.
मंदिराच्या मागच्या बाजूला बाकी काही नाही. तसा डोंगरमाथा छोटा आहे. या गडाचा उपयोग Watch tower म्हणून करत असावेत. आम्ही चौघेजण मंदिरासमोरच्या झाडाखाली बसून धपाटे, चटणी, मिरची चेपली आणि खाली उतरायला सुरुवात केली. जायच्या वाटेवर एक दगड आहे, भोक पडलेला. Nature's creation .
गडावरून खाली उरतलो आणि प्रतापगड नावाच्या ठिकाणी जायचे ठरले. त्याला ठिकाण, रिसॉर्ट, हिल स्टेशन असेच म्हणणे योग्य आहे. तो काही गड उरला नाही. भवानी मातेचे मंदिर आणि तिथे ठेवलेल्या हंबीरराव मोहित्यांची तलवार, ज्यानी ६०० हुन अधिक गनिमांना चिरले, पाहण्यासाठी तरी प्रतापगड वर नक्कीच जावे. बाकी काय गोलगप्पे आणि सामोसे, आणि कारंजातून येणारे मलाई छाज ( आपल्या भाषेत ताक) वगैरे हवे ते मिळतेच. जमेल तेव्हड्या लवकर तिथून पळ काढून आम्ही चौघे भोर च्या दिशेनी निघालो. एक अप्रतिम ट्रेक झाला. फार दमणून नाही झाली, पण ऊन असल्यानी जरा त्रास झालाच. बिडी चे कंबरडे मागे बसून मोडले आणि वेळेवर पिंटू ला पुढे बसवल्यामुळे माझी गाडी वाचली. नाही तर साफ करायला खूप कष्ट पडले असते. मांढरदेवी घाटातून भोर ला उतरून आम्ही राजघर ला Northridge मध्ये जाऊन सुखावलो. सूर्यास्त पाहत पडलो.
No comments:
Post a Comment