कोळकेवाडी किल्ला/डोंगर
विसापूर किल्ला झाल्या नंतर काही दिवसात माझा पाय दुखावला. त्यामुळे त्यातून बाहेर पडायला ३ महिने गेले. सकाळ संध्याकाळ आपली टेकडी चालू आणि वाटले की ट्रेक परत जमेल मला. अशाच वेळी किरण खळदकर यांनी ट्रेककरी ग्रुप वर एका किल्ला / डोगर करायची इच्छा वर्तवली आणि मी लगेच तयार झालो.
एप्रिल चा महिना. आंबे यायला सुरुवात झाली होती. तसाच लग्नांचा काळ. पण दर वर्षी सारखे चित्र या वर्षी नव्हते. माझ्या घराच्या आजूबाजूला साधारण ५ ते ६ नवीन इमारती, साधारण १० - १५ माजली चे काम सुरु आहे. धुराळा आणि आवाज नको नको होई पर्यन्त. कुठेही जा रिडेव्हलोपमेंट चे वारे नसून वादळ उठले आहे. ४ माजली च्या ठिकाणी १० - १२ माजली इमारती. Concrete चे जंगल. अर्थात याची सुरुवात २० वर्षांपूर्वीच. परिणाम - तापमान ४३.५ पुण्याच्या काही भागात. ४० वगरे सर्रास. हे चित्र न सहन होणारे होते. संध्याकाळी आणि सकाळी तरी हवेत काहीसा गारवा असायचा तो पण आता नाहीसा झाला. अशाच एका भयंकर दिवशी आम्ही संध्याकाली ७ च्या सुमारास कोयना नगर भागात जायला गाड्या काढल्या. ७ जण जमले होते आणि किरण कोकाटे च्या वर्कशॉप पाशी जमायचे ठरले. वेळेवर सर्व जण पोहोचलो आणि इथून निघालो. घाट ओलांडला आणि कळले की अजून तीन जण येत आहेत. गप्पा मारत तिथेच काही वेळ थांबलो आणि ७ चे १० झालो. दोन गाड्या मध्ये बसून आम्ही उंब्रज च्या दिशेनी गाडी वळवली. रात्रीची पोटपुजा करून मल्हारपेठ, अडुळ, पाटण, हेळवाक, अलोरे कारत कोळकेवाडी जवळ पोचलो. सचिन जोशी नी आमची तिथे एका मंदिराच्या भक्तनिवासात राहायची सोया केली होती. उकडून जीव गेला होता. कोण कुठे तर कोण कुठे साधारण २ च्या सुमारास सुखावलो.
PC किरण खळदकर
सकाळी बरोबर ५३० ला उठून आवरून ६३० का १० लोकांनी डोंगराच्या दिशेनी गाड्या वळवल्या. आधी देवळात गेलो, दर्शन घेतले, पाणी भरले आणि वाटाड्याची माहिती घेतली. किरण खळदकर उर्फ खल्या हा ट्रेक लीड करत होता. या ग्रुप चे खूप छान आहे ते म्हणजे नियोजन मस्त असते. माहिती खूप आणि ओळखी खूप. ही मंडळी भरपूर ट्रेकिंग केलीली आहेत आणि त्यामुळे काही तरी नवीन शिकायला मिळते.
वर जातांना मला काहीच त्रास झाला नाही याचे मला पण कौतुक वाटले. पण जसे आम्ही परत निघालो तसा मला पहिला छातीत कॅरॅम्प (Cramp) आला. मनात विचार आला की हा एव्हडा च असेल तर ठीक. तिथपासून मला अशक्यच कॅरॅप्स यायला सुरु झाले. ड्रायविंग, रात्रीची झोप न होणे, ४३ deg यांनी अल्ट्रा डिहायड्रेशन होण्यास सुरुवात झाली होती. याचा माझा पहिलाच अनुभव. पाणी पीत मी खाली उतरत होतो. थोडीशी चक्कर आणि झोप डोळ्यावर, यांच्याशी कुस्ती खेळत सावकाश मी खाली निघालो होतो. मित्र मंडळ सर्व परींनी मला मदत करत होते. दर काही वेळानी थांबत थांबत मी पुढे जात होतो. पायातून अक्षरशः वाफा येत होत्या. पिण्याचे पाणी साधारण चहा पितो ना, इतके गरम झाले होते. म्हणजे T बॅग्स असत्या तर चहा झाला असता. माझी अवस्था वाईट झाली होती. किरण माझा बरोबर थांबला आणि शेवटी आम्ही खाली पोचलो. एका आंब्याच्या झाडाखाली बाकी सर्व लोकं गप्पा मारत विश्रांती घेत आमची वाट पाहत होते. गणेश नी पाणी आणले आणि मी पिऊन तिथे झोपलो. जाग अली तेव्हा आजूबाजूला कोणी नव्हते. ढेरे होते फक्त. उठून उभे राहायचा प्रयत्न केला आणि आयुष्यात इतक्या वेदना नसतील झाल्या इतके अंगभर कॅरॅप्स आले. बॉम्ब मारत मी भूषण ला मदत करायाला सांगितली. काही सुचत नव्हते. घामाघूम झालो होतो. माझा आवाज ऐकून गाडी आणायला गेलेले लोक परत धावले. मला फुल्ल एक पाकीट परत पाणी आणि इलेकट्रोल दिले. मामा नी त्यांच्या चपला दिल्या आणि मला मदत करत गाडी पाशी आणले. पाणी आणि खांदा असे दोन्ही मिळाले. गाडीत हळूच बसलो आणि कोकाटे की गाडी चालवायला सुरु केले. गाडीत बसलो आणि पाहिले तर ४५ deg दाखवत होते. काही वेळातच मी परत नॉर्मल ला आलो. वाटेत आंब्याची अनेक झाडं होती. त्यातल्याच एका झाडाच्या कैऱ्या तोडल्या. अर्धवट गाभुळलेले आंबे ओरपले. लहान मुलांसारखे सैरावैरा कैऱ्या उचलत अर्धा तास नक्कीच गेला असेल.
गाडीत वेगवेगळ्या गप्पा झाल्या. कोण काय काय करतात कळले. इतर ट्रेक च्या आणि अर्थात राजकारण यावर चर्चा झाल्या. काही इतिहास झाला. एकंदरीत खूप मजा आली.
मला dehydration मुळे खूप त्रास झाला. आता हा त्रास कसा कमी होईल या साठी प्रयत्न आणि अजून स्टॅमिना बिल्डिंग चालू करायचा निर्धार. परत ४५deg मध्ये गेलो की हा त्रास आयुष्यात नाही होणार याची काळजी, प्रयत्न आणि प्रॅक्टिस चालू.
No comments:
Post a Comment