Thursday, 20 February 2025

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम - ॐ नमः शिवाय

गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आवाक्याच्या बाहेर गेला आहे. इतका मोठा की या शब्दामुळे जगातून लोकांनी भाग घेतला आहे. Online  भाग. प्रयागराज हे स्थान जगात माहिती झाले आहे. गर्दी पासून दर्दी पर्यन्त, ढोंगी पासून भोगी पर्यन्त, श्रीमंत, गरीब, नामवंतांपासून ते निनावी माणसांपर्यन्त, सरकारी अधिकाऱ्यांपासून ते चपराशी पर्यन्त, योगी नागा आणि इतर तमाम साधक आणि पुज्यनीय संतांपासून ते खुद्द महादेवा पर्यन्त या ब्रह्मांडातील सर्वात मोठा सनातनी परंपरेचा महासंगम, हिंदू एकतेचे प्रतीक, हिंदू संस्कृतीचे दिव्या दर्शन अनुभवायला पोचले आहेत. महाकुंभ ला. गर्व से काहो हम हिंदू है. न या सारखे आधी कधी झाले न या सारखे परत काही होईल - या पृथीवर. 

आयुष्यात ज्या काही आठवणीत राहणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत त्या मध्ये बरेचशा आठवणी या मित्रांबरोबर आहेत. प्रवास असो वा नुसती गर्दी, बरेच वेळा काही नवीन बघायला किंवा अनुभवायला मिळाले आहे. अशाच एका संध्याकाळी PYC सारख्या उकच्भ्रू ठिकाणी आमची मेम्बरशिप नसतांना, आम्ही बसलो असतांना इतर चर्चा चालू असतांना महा कुंभ या चर्चेला वाचा फुटली आणि सर्व जण सरसावले. आपापली मते ठोकून तिथे किती गर्दी आहे आणि कसे ट्रॅफिक मध्ये लोकं अडकली आहेत पासून ते हा उत्सव किती भारी आहे आणि आपण कसे नल्ले आहोत की जात नाही आहोत याची चर्चा झाली. मग ' गंगेत जाऊन पाप मिटत असते तर अजून काय हवे होते' ' उगाच गर्दी करायची आणि जीवाची ओढाताण करून कशाला जायचे आहे ' ' आपण पापच केले नाही तर कशाला जायचे ' वगैरे चर्चा झाल्या. भिडे म्हणाला नाना तू काही ठरवले नाहीस त्याचमुळे एक गाडी निघणार आहे बुधवारी. ५ जण झाले आहेत. गांगल म्हणाला सोनाली ला पण यायचे आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा टेबल वर यथेच्छ पीत असतांना बोललेल्या ट्रिप चा प्लॅन खरंच घडला. नाही तर हिमालय पासून कन्याकुमारी पासून ते इतर देशात ले सर्व प्लॅन शेवटी प्यासा ला जाऊन कमी पडलेल्या quarter मध्ये बुडाल्याचे अनेक किस्से आहेत. असो. 

गांगल म्हणाला मी पण येतो आणि एकाच्या दोन गाड्या झाल्या. असे करत करत माझे पण जायचे नक्की झाले आणि १० जण प्रवासाला निघालो. 

पुणे ते प्रयागराज साधारण १५०० कि मी चे अंतर आहे. नाशिक कडून किंवा संभाजीनगर कडून समृद्धी वर निघायचे आणि नागपूर जबलपूर कटनी रिवा करत प्रयागराज ला पोचायचे. साधारण ५ च्या सुमारास आम्ही पुण्यातून निघालो आणि नाशिक ला मिसळ आणि इतर खादाडी करून समृद्धी महामार्गावर पोचलो. ५५० च्या आजूबाजूचे अंतर साधारण ५ तासात आम्ही कापले. भारतात असे काही होईल याची कल्पना नव्हती. बरेच वर्ष अमेरिकेत राहिलो आहे आणि २५ वर्षांपूर्वी जे तिथे अनुभवले ते २५ वर्षांनी का होईना इथे अनुभवायला मिळाले हाच तो काय तो आनंद. भारत मे देर है अंधेर नाही. अमेरिकेत सर्वच रस्ते असे आहेत ती गोष्ट सोडा. पण मजा अली आणि आम्ही नागपूर ला पोचलो. गाडी बदल, ड्राइवर बदल चालू होते. चहा आणि सँडविच, चिवडा आणि वेगवेगळे लाडू, तिखट पुऱ्या, ठेपले, लोणचे आणि पेपर डिश, चमचे आणि १० लोकांच्या १०+ बॅग, पाण्याच्या बाटल्या आणि १० लोक असे दोन गाड्यात, गादीत कापूस जसे कोंबतात, तसे कोंबून गाणी ऐकत गप्पा मारत भेंड्या खेळत जबलपूर चा पल्ला गाठला. इथे एका हॉटेल तत्सम कार्यालयात आमची चांगली सोया झाली. 

अनिकेत बापट हा भिडे चा आत्ते भाऊ. HDFC मध्ये मोठ्या हुद्दयावर आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी मदत करून हे हॉटेल कार्यालय आम्हाला मिळाले. १० लोकांच्या १० तर्हा. पण लक्ष एक. पोचायचे प्रयाग ला. पोचे पर्यन्त ९ वाजले. गप्पा आणि आवरा आवारी करून आणि बाकी कार्यक्रम उरकून जरा उशीर झाला होता. गप्पां मध्ये उद्या कसे जायचे कितीला निघायचे वगैरे चर्चा चालू होत्या आणि एक एक माउली कल्टी मारत खाली जाऊन जेवत होती आणि झोपायला जात होती. शेवटी आम्ही रात्रीचे जबलपूर च्या रस्त्यांवरून  जेवण हुडकत निघालो. लोक पण इथले चांगले आहेत. नीट बोलतात, रस्ता नीट सांगतात, छान हिंदी बोलतात - त्यांना आपले मराठी हिंदी कळायला वेळ लागतो पण रात्रीच्या वेळात सर्व साधारण भाषा जगात कुठं पण गेलात तरी एकच असते. त्यामुळे समोरच्याला काय म्हणायचे आहे ते चटकन समजते. उत्तम तेलकट आणि चविष्ठ जेवण जेऊन आम्ही परत आलो आणि झोपलो. 

दुसऱ्या दिवशी चेकऊट करून आम्ही प्रयाग च्या दिशेनी निघालो. गर्दी होती त्यात काही वाद नाही. पण शंभो च्या कृपेने आम्हाला काही म्हणजे काही गर्दी किंवा ट्राफिक जॅम लागला नाही. २५० कि मी ट्रॅफिक जॅम होता हे मात्र खूप लोकांनी सांगितले. आम्ही निवांत प्रयागराज मध्ये घुसलो कारण गावाच्या दुसऱ्या टोकाला आमचे दुसरे कार्यालय कम हॉटेल होते. 

प्रयागराज - पूर्वी इलाहाबाद. इथे शिरताच पहिले काय जाणवते ते म्हणजे यांची अशक्य गॉड हिंदी भाषा, त्यांचे स्वर, शब्द, उचार आणि अदब. जय राम जी की म्हणतात आणि आपल्याला जिंकून टाकतात. टपरी वर चहा आणि शेजारी असलेल्या मारुती चे दर्शन घेऊन आम्ही प्रयाग मध्ये शिरलो. गेले काही दिवस ट्रॅफिक जॅम आणि कोट्यवधी लोक असलेल्या जागी तरी रस्ते मात्र स्वच्छ. लखलखीत दिवे आणि गर्दी या मधून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो. आणि गंगे च्या पुलावर आलो. 

भव्यता काय असते हे समुद्र बघूं कळते. दिव्यता काही असते हे हिमालय बघून समजते. पण हे जे काही माणसांनी सध्या केले आहे त्याला शब्द नाहीत. हजारो अक्रेस वर पसरलेले तंबू पुलाच्या डावी आणि उजवीकडे डोळे पोचतील  तितके लांब प्रकाशात झळकत होते. गंगेच्या दोन्ही बाजूला भाविकांची राहायची सोया होती. मी चक्क गाडी थांबवली आणि हे नक्की काय आहे ते बघायला उतरलो. पुलाच्या कडेला गाडी लावून आम्ही पाहत होतो तेव्हड्यात तिथे जवान आला. हातात AK असेल. आम्हाला म्हणाला ' लेलो जिताने चाहे फोटो लेलो, पर जल्दी निकल पडो' आम्ही फोटो घेऊन जय हिंद करून तिथून निघालो. पुढची गाडी कार्यालयात पोचली होती. वाटेत हजारो भाविक गोर गरीब, लहान मोठे सर्व हिंदू बांधव न कटकट करता इकडे तिकडे हिंडतांना दिसत होते. अहो हा अनुभवच काही और होय !!!  

कुंभ म्हणजे नक्की काय आहे ? भावना आणि नितांत श्रद्धा याचा एक अनोखा संगम आहे असे मला वाटते. इथे मला माननीय श्री योगी आदित्यनाथजी यांचा उल्लख केला नाही तर त्यात काही अर्थ नाही. करोडो लोकांची नीट नेटकी व्यवस्था आणि व्यवस्थापन करणे हे चंद्रावर यान पाठवण्या इतकेच कठीण आहे. तिथे यान गेले किंवा नाही फक्त पैसे जातील.. इथं करोडो लोकांच्या भावना आणि जीव ठेचले जातील. अहो ५०% हुन अधिक देशांची लोक संख्या इतकी नाही तितके लोक इथे येऊन गेले आहेत. जात आहेत. खरं सांगू का देव म्हणजे काय असते ते इथे येऊन पाहावे. या वेड्या श्रद्धेला काही मोल नाही. अनमोल आहे हे सर्व. शब्दच अपुरे तर काय करू. 

Sector ५ का कुठे तरी आम्ही पोचलो आणि तिथे एका कार्यालयात खोल्या मिळाल्या तिथे राहिलो. तिथेच जेवण मिळाले आणि आम्ही शांत पणे झोपी गेलो. सकाळी लवकर उठून आवरून चहा पिऊन सर्व १० लोकं तयार झाली. आम्ही मुलांनी भिडे नी आणलेली भगवी बंडी आणि भगवी लुंगी चढवली आणि तयार झालो. दोन तीन रिक्षा बोलावल्या आणि संगमाकडे निघालो. काही अंतरावर रिक्षा सोडल्या आणि चालत चालत १० ते १५ मिनिटात गंगे च्या तीरावर पोचलो. तुम्हाला अनुभव आहे का हो कोकणाचा - की नाही का आपण डोंगर आणि घाट उतरून गावातल्या रस्त्यानी, आजूबाजूला ताडामाडाची झाडे, लाल माती आणि कोकणातील वाड्या, आणि अचानक एका वळावरून पाहतो तो अथांग समुद्र. त्या गल्लीतून चालत बाहेर पडलो आणि समोर अथांग गंगामाते चे दर्शन एकीकडे आणि सनातनी धर्म जपणारे त्याचा अभिमान बाळगणारे माझे बंधू भगिनींचा समुद्र दुसरी कडे अनुभवास मिळाला. बाप्पा ला परत सोडायला जातांना न गर्दीचा  त्रास होतो न अजून कसला. डोक्यात फक्त बाप्पा असतो. इथे तसेच काही से झाले. थोडी फार चुकामुक झाली पण सर्वांनी डुबकी मारली. 

संगम कुठला, नक्की कुठे डुबकी मारायची, नक्की जागा कुठली - म्हणजे डुबकी चुकीच्या ठिकाणी आणि पाप तसेच हो. जागा चुकली असे नको ना. म्हणून लोकांची गडबड चालू होती. मी आणि माझा बरोबरचे काही समोर पाणी दिसले आणि चार लोक आनंदानी डुबकी मारत होती तिथे गेलो आणि मस्त थंडगार पाण्यात बुडी मारली. इतके गार पाणी की शरीर बधिर झाले काही वेळ. पण थोड्या वेळानी OK झालो. उगवत्या सूर्याला नमस्कार केला गंगामैया ला नमस्कार केला. आणि काय, आलो बाहेर. गंगेत घोडे नहायले !!! आजूबाजूला हजारो लोक काही न काही प्रथा / देव पूजा / कर्म कांड / तंत्र मंत्र करत धार्मिकतेनी तिथे स्नान करत होते. हरिद्वार सारखे इथे बाजार भुंडंगे नव्हते - हे करतो पैसे द्या आणि ते करतो पैसे द्या. कोणीच पैसे मागत नव्हते. घाटावर स्त्री वर्गाची कपडे बदलायची व्यवस्थित सोय केली होती. बोटी होत्या rescue  साठी. लोकं पाण्यात जे काही टाकत होते हार तुरे ते काढत काही माणसे सदैव तत्पर होती. घाटावर शेकडो कार्यकर्ते रस्ते साफ करत होते. शेकडो पोलीस लोकांची भावना न दुखावता पण थोडेसे घट्ट आवाजात सर्व खेळ सांभाळत होते. मधूनच घाटावर VIP  च्या गाड्या खूप आवाज करत यायच्या आणि कुठल्याशा संगमाच्या दिशेनी जायच्या. त्यांची पापं साफ करायला सामान्य संगम कसा चालेल. त्यामुळे 'VIP पापं' धुण्यासाठी साठी सेपरेट संगमाची व्यवस्था केली गेली आहे. वरून पाहिलात तर गंगा तिथे काळी झालेली दिसेल असं आपले मझा मनात आले. विधायक पासून ते मॅजिस्ट्रेट पर्यन्त तिथे गर्दी करत होते. अहो आम्ही गेलो तेव्हा तिथे आपले श्री देवेंद्र फडणवीस साहेब पण आले होते डुबकी मारायला विथ फॅमिली असे ऐकले खरे. अर्थात त्यांचा पण संगम स्पेसिअल होताच. आम्ही आवरले आणि मी तिथून पळ काढला. पूल ओलांडून कॅम्प्स village मध्ये शिरलो. तीन चार तास खूप हिंडलो. दाढी वाढलेली, कुरळे केस मोकळे आणि भगवी वस्त्रे पाहून येत जात लोकं मला नमस्कार करत होती. मनातल्या मनात, मी अतिसामान्य असतांनाही, मिळालेले प्रेम आणि सम्मान मी आनंदानी घेत होतो आणि परत देत होतो. ते नाही पूर्वीच्या महाभारतात टीव्ही  वर नितेश भारद्वाज नी कृष्णाचे पात्र केले आहे, नंतर कृष्ण म्हणजे तोच असा समज झाला होता. माझं तसेच झाले होते. स्वतःबद्दल. त्यामुळे काही काळ का होईना भारी वाटले. मनात येऊन गेले की हा धंदा म्हणूनच चालतो. ना पाळतायेणारे तत्वज्ञान, उगाच अति क्लिष्ट भाषेत भयंकर complicate करून लोकांच्या समोर ठेवले की झाला बाबा. 

भोळी भाबडी लोकं पाया पडायला लागली तेव्हा मात्र मी ओशाळून गेलो. मी त्यांच्या परत पाय पडायचो आणि तिथून निघायचो. भगव्या वस्त्राची ताकद, त्याचे पावित्र्य, त्याबद्दल च्या भावना याचा संपूर्ण साक्षात्कार इथे झाला. एका कोपऱ्यात एक साधू महाराज दिसले. एकटेच बसले होते. त्यांची परवानगी घेऊन मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. आधी नमस्कार केला आणि मग बसलो. ते ऋषिकेश च्या पुढे कोणत्या तरी गावातून आले होते आणि परतीचा प्रवास चालू  होणार आहे असे मला म्हणाले. आमच्या १५ मिनिटे छान गप्पा झाल्या. त्या माझा पाशी योग्य. परत नमस्कार करून मी त्यांची रजा घेतली. या तिराहून त्या तीरावर जाण्यासाठी अनेक पूल केले आहेत. सर्व पूल हे Oneway आहेत. त्यामुळे येत जात काही त्रास नाही. घाटावर  ठीक ठिकाणी जेवायची सोया आहे. तिथेच एका ठिकाणी जाड पुरी आणि भाजी खाऊन मी परत चालायला लागलो.  आमच्यातील काही मंडळी मोठ मोठे पाण्याचे डबे घेऊन गंगेला त्यात मवावयाचा प्रयत्न करत इकडे तिकडे त्याचे ओझे वाहत होते. एका ठिकाणी दमून एका तंबू मध्ये शिरलो. हनुमान भक्त महंत तिथे विराजमान होते. त्यांचे दर्शन घेतले. खूप छान आणि प्रसन्न वाटले. काही काळ तिथे विसावा घेतला. राहुल आणि सोनाली ला अजून एक कॅन गंगा हवी आहे असे सांगून ती आणायला पसार झाले. मी आणि भिडे तिथेच निवांत बसलो. इतर लोक हॉटेल च्या दिशेनी निघून गेले. 

काही क्षण शांततेत मी बसलो होतो. मनात एक न अनेक विचार चालू होते. आठवणी येणे जाणे चालू होते. बाबा ला हे सर्व फार आवडले असते. वेगवेगळे साधू, तपस्वी, संत आणि अघोरी याचे दर्शन घडले. हे कोण असतील ? त्यांचे आई बाबा त्यांना शोधत असतील का ? हे कुठून आले आणि परत कुठे जाणार ? जायचे यायचे जेवायचे खायचे पैसे कोण देत असेल ? त्यांच्या कडे असतील तर ते कसे ? नक्की उपासना म्हणजे काय करतात. आम्हाला जसे क्रियायोगाची दीक्षा मिळाली, त्यांना कोणती दीक्षा मिळाली असेल ? त्यांच्या साधनेचे मूळ काय ? त्यांना त्याचा काय परिणाम दिसतो आहे आणि कसा ? हाच तो मार्ग हे यांना माहिती होते का ? का ते पण शोधात आहेत ? असे अनेक प्रश्न मनात घर करून होते. दुसऱ्या टोकाचा विचार हा पण मनात आला की हा सर्व एक प्रकार चा स्वार्थ नाही का ? फक्त स्वतः चा विचार करणे. मला मोक्ष कसा मिळेल आणि मला हे कसे मिळेल आणि मला ते कसे जमेल. साधना करतांना जनहिताचे, देशहिताचे काही विचार असतील का ? असो. इथे आलो तेव्हा हे नक्की कळले की या सर्व प्रश्नाची उत्तरे ही इथेच अशा ठिकाणी मिळणार हे नक्की. शोधायला आणि सापडावयाला तशी ताकद यावी लागेल आणि त्यासाठी सुद्धा तशी तपश्चर्या करावी लागेल. 

त्या तंबूतून आम्ही निघालो आणि परत हॉटेल ला पोहचलो. ज्या साठी केला होता अट्टाहास !!! परत आलो आणि सामान उचलून गाडीत भरून आम्ही वाराणसी कडे निघालो. बाहेर पडताना खूप जास्त ट्रॅफिक लागला आणि वाराणसी ला पोचेपर्यन्त १० वाजले. सोनाली ज्या हॉटेल मध्ये मागील वर्षी राहिली होती तिथेच आम्ही राहिलो. 

पहाटे २ ला उठून अंघोळ करून मी आणि लिमये साहेब रांगेत उभे राहिलो, काशी विश्वनाथ देवाचे दर्शन घ्यायला. दोघे ३.५ तास रांगेत उभे होतो. आमच्या बरोबर अनेक लोकं म्हणजे हजारो, त्याच रांगेत उभे होते.  लहान मोठे, म्हातारे, लहान लहान मुलांना घेऊन आलेले, काही तरुण - असे विविध जातीचे हिंदू एका रांगेत शांत उभे होते. जसे जसे जवळ आलो देवळाच्या तसे तसे आम्हाला कळले की इथे पण पाप धुण्याची स्पेसिअल रांग आहे. पैसे द्या आणि दर्शन लवकर घ्या. काही अडचण नाही. पण १० VIP पापी मागे निदान १०० सामान्य पापी सोडायला काही हरकत नव्हती. पण असे काही होत नव्हते. एकंदरीत सर्व बघता आम्हाला इथे काही थांबावेसे वाटले नाही. देवळा पाशी पोचलो आणि मी आणि लिमये साहेबांनी ठरवले की नाही जायचे पुढे. काही तसे वाटले पण नाही. रांगेतून बाहेर आलो आणि लांबवर दिसणाऱ्या कळसाला नमस्कार ठोकून तिथून बाहेर पडलो. मातीच्या भांड्यातून गरम गरम चहा घेतला आणि सुमारे ७ ला हॉटेल मध्ये येऊन झोपलो. 

बनारस / वाराणसी बघायला किमान ४ दिवस हवेत. इथली हवाच काही और आहे. अशक्यच कर्कश्शय हॉर्न वाजवणे सोडले तर अहो इथे माणसे पण खूप चांगली आहेत. इथे एका पेट्रोल पम्पावर पेट्रोल टाकायला गेलो असतांना गाडीचा नंबर बघून अहो चक्क तिथल्या माणसांनी विचारले ' साहब चाय पानी कुछ लोगे ? एके पुणेकराला तात्काळ छातीत कळ यावी असे उद्गार हे. अहो इथे बरेच ठिकाणी ' पहिले खाओ और फिर पैसे देना. आप क्या हमारा नसिब  लेके भागोगे क्या ? असे अशक्य गोड़ शब्द कानावर पडत होते. नाही तर लक्षुमी रोड चे जनसेवा - साला सामोसा घेऊन चटणी मागितली तर म्हणाला आधी एक रुपया द्या. तिथे एक संस्कृतीचे महेर घर आणि इथे पुणे एक संस्कृती आणि विद्येचे महेर घर. हे होते असे म्हणायला काही हरकत नाही वाटत आता. वाईट वाटते पण काही इलाज नाही. 

आमचा अचानक दहा जणाचा प्लॅन झाला काय आणि आम्ही निघालो काय. ३२०० किमी दोन गाड्या आणि एक पंगचर नाही की एक ओरखडा नाही. कोणाला तब्येतीचा त्रास नाही. ट्रॅफिक जॅम नाही. जिथे तिथे हरी येऊन मार्ग दाखवत होता. ब्रह्म अजून काय मग असेल ? 

कुंभ - असे या ब्रह्मांडात कधी झाले नाही आणि परत कधी होणे नाही. परत एकदा आदरणीय मोदीजी आणि योगीजीं बरोबर सर्व कार्यकर्त्याचे मनापासून आभार. गेला नसाल अजून तरी वेळ गेली नाही. आज नाही तर उद्या नाही तर जमेल तेव्ह जाऊन या. जय शंभो गंगे हरहर !!!

 

Sunday, 3 November 2024

हिमालय - रुद्रनाथ - अंतरीचा आणि प्रकृतीचा मौन संवाद


हिमालय - रुद्रनाथ - अंतरीचा आणि प्रकृतीचा मौन संवाद 

सहा महिने ज्याची वाट पाहत होतो त्याचा विषय अचानक रुपाली मध्ये, शेवटी निघाला आणि या वर्षी चे हे व्रत मार्गी लागेल याचा आनंद मला झाला. Unplanned Himalayas हा एक उपक्रम काही वर्षांपासून राबवला आहे. याचा थोडक्यात अर्थ म्हणजे काही न ठरवता निघायचे 'त्याच्या' दिशेनी आणि जे काही पदरात पडेल त्याचे मनमोकळे पणाने सुख आणि अनुभव घ्यायचा. जे मिळेल ते खायचे आणि जिथे छान वाटेल तिथे राहायचे. १९ साली मी निगडे आणि पप्या अशाच एका प्रवासावर निघालो होतो. पहिला दिवस या मध्ये खूपच कठीण असतो आणि स्वतःला बजावत राहावे लागते की पुढे काय याचा विचार नको. इथे कोणीही वाट पाहत नाहीये अन कोणालाही तुझे काय याची पडली नाहीये. ना काही बुकिंग च्या वेळा गाठायचा आहेत ना कुठल्या गाड्या. तेव्हा आम्ही असेच भटकत भटकत केदारनाथ ला पोचलो होतो. REELs प्रकार तेव्हा कमी असल्यानी तिथे गर्दी आणि घाण  जरा कमी होती. आम्ही बाप्पा चे  विसर्जन करून पितृ पंधरवड्यात जातो.  भाविक लोक तेव्हा देवळात जात नाही असे म्हणण्यात. त्यामुळे का होईना आम्ही मोजके लोक तेव्हा तिथे पोचलो. मग तुंगनाथ आणि कल्पेश्वर झाले. त्रियुगी नारायण झाले आणि अशी अनेक ठिकाणे न माहिती असलेली झाली. तेव्हा तिथे कळाले, मला वाटतं औलीला असेल, की पंच केदार असे काही तरी असते आणि उरलेले दोन म्हणजे रुद्रनाथ आणि मदमहेश्वर असे आहेत . परत पुण्याला आलो आणि ठरले की हे पूर्ण करायचे. 

माझा डोकयात इतर काही होते पण बाकी मंडळी या ना त्या कारणांनी यायला होकार देत नव्हती. एकेदिवशी दुपारी आम्ही कॉफी पीत असतांना, का कोणास ठाऊक अचानक निगडे म्हणाला की रंग्या रुद्रनाथ आणि मदमहेश्वर ला येतोस का. मी एक क्षण विचार न करता होकार दिला आणि माझा पुढचा प्रश्न फेकला. कधी ? चर्चा करून ठरले की २० Sept, विसर्जन झाल्यावर सकाळची flight पकडायची. पुढचे पुढे बघूया. विमानाची टिकेट्स  आणि ट्रेक ठरला. पप्याला विचारण्यात आले आणि त्यांनी पण तिकीट काढले. या सर्व घटनेत भे भे म्हणजे माझा शाळेतील मित्र, त्यांनी ८ वी मध्ये असतांना पहिला आणि शेवटचा ट्रेक केला - लोहगड विसापूर, यायला होकार दिला आणि ३ चे ४  झाले. निशिकांत पुराणिक अजून एक NRI मित्र जो नीगडे चा घट्ट, तो पण येतो म्हणाला आणि आम्ही ५ जाणं तयारीला सुरुवात केली. 

ठरल्या ठरल्या पहिले काम म्हणजे सिंहगड. तिथे जाऊन डोके न टेकता पुणेरी हिमालयात ट्रेक ला गेला तर तो फाऊल नाही तर गुन्हा धरला जातो. त्यामुळे मी आणि निगडे आमच्या सर्वांच्या वतीने डोके टेकून आलो. ट्रेक ची तयारी Or anticipation हा एक सर्वोत्तम भाग असतो. त्यामध्ये अशक्य मजा येते. चर्चा आणि वाद नाही झाले तर त्यात काय मजा. आणि ठरावा ठरावी साठी भेटी गाठी. अहो दिवाळी मध्ये पूर्वी जसे नवीन कपडे व इतर असायचे तसेच आमचा ट्रेक आला की असते. दुकानं फिरायची आणि ट्रेक ला लागणारी सामग्री गोळा करायची. आम्हाला ही दिवाळीच होय. म्हणजे आमच्या कडे म्हणतात की दिवाळीत कुल्ले उघडे पडले तरी चालेल पण ट्रेक ला नवीन हवे सर्व. तसेच काही झाले आणि सॅक माळ्यावरून उतरवली. 

पुण्याचा पाऊस या वर्षी काही थांबत नव्हता. या यावर्षी इलेकशन्स जवळ आल्यामुळे सर्वच मंडळ श्रीमंतीचा आस्वाद घेत भिंती लावून बाप्पा चे आणि सर्व भक्तांचे कान फोडत होते. 'Oxyrich' असा मनाचा नवीन गणपती पुण्यात स्थापन झाल्याच्या बातम्या इकडे तिकडे पसरत होत्या. त्यामुळे कार्यकर्ते तत्सम सर्वांची दिवाळी या वर्षी गणपतीमध्येच साजरी झाली असे म्हणायला हरकत नाही. असो. बाप्पा जातांना या वर्षी पण बाबाची आठवण आणि तो जाणार म्हणून डोळ्यात दोन थेम्ब पाणी आल्यावाचून राहिले नाही. 

दोन वेगळ्या Flights मध्ये बसून आम्ही दिल्ली ला पोचलो. टर्मिनल १ ला काही जाणं तर टर्मिनल ३ ला काही. इकडून तिकडे पोचलो आणि पुढे काय याची चर्चा केली. पप्यानी आणलेली चकली संपवली आणि मेट्रो च्या दिशेनी निघालो. खूपच जड झाली होती सॅक आणि माझे १०० आणि हे १५ चे ओझे कसे काय पाठीवर ओढता येईल याचा विचार मनात येऊन गेला. म्हणले बघू पुढचे पुढे. तिकीट काढायला उभे राहिलो आणि देणार्यानी विचारले की कुठे निघालात. त्यांनी चार सल्ले दिले आणि कळले की तो त्याच भागातला आहे. त्यामुळे आणि फक्त त्यामुळेच  निदान आम्ही त्याचे बोलणे ऐकून तरी घेतले. पुणेरी ना आम्ही. दोन वेळा मोट्रो बदलून आम्ही काश्मिरी गेट ला पोचलो. इथे रस्त्याच्या कडेला छोले कुलचे, पराठे आणि मॅग्गी असे खाऊन लोकल बस मध्ये चढलो. ही बस होती ऋषिकेश ची. आज रात्री तिथे मुक्काम करून दुसऱ्यादिवशी सकाळी आम्ही सगर नावाच्या गावी जाणार होतो असे ठरले. 

साधारण ७ च्या सुमारास आम्ही ऋषिकेश नावाच्या भयंकर ठिकाणी पोचलो. ६ वर्षांनी तिथे पाऊल ठेवले आणि बघितलेले ते आणि आताचे हे यामध्ये ५ वर्षांपूर्वीचा चांदणी चौक आणि आत्ताचा इतका फरक झाला आहे. एका सामान्य हॉटेल मध्ये राहून तिथे 'राजस्थानी' थाळी मिळते तिथे गेलो आणि पोटभर चेपले. रात्री परत चालत येतांना बरेच रस्ते दमून झोपले होते. शांत गल्ल्या आणि अंधारे बोळ मागे टाकत आम्ही परत हॉटेल मध्ये आलो. १२०० ला खोली आणि त्यात ३ असे गणित साधारण परवडत होते. खा खा खाऊन बिल सुमारे ७०० रुपये आलेले पाहून मला तर गहिवरून आले. पुण्यात ५ जणांना ७०० रुपया मध्ये फक्त एक भाजी मिळू शकेल हॉटेल मध्ये. सकाली ५. ३० ला निघायचे ठरले आणि त्याप्रमणे मी आणि निशिकांत तयार होऊन बसलो. 

काही लोकांना 'वेळ' हा विषय अत्यंत फालतू वाटत असल्यानी बोलावलेल्या गाडीवाल्याचा पुतळा झाला होता. मला एकंदरीत कळले की पुढे काही खरे नाही. हे असेच होत राहिले तर ट्रेक मध्ये खूपच मजा येणार आहे. माझी होणारी चिडचिड लपवत मी निवांत जाऊन बसलो. साधारण ७ वगरे च्या सुमारास वाद उरकून आम्ही तिथून निघालो. ऋषिकेश मध्ये आणि या भागात रात्री ठरवतांना एक आकडा बोलतात आणि निघतांना एक. आम्ही याला सरावलेले आहोत. त्यामुळे त्यांनी ६ चे ७ केल्या केल्या टपावर टाकलेल्या सॅक आम्ही उतरवायला सुरुवात केली. न काही बोलता इतर फोन फिरवले आणि अभिनय करून पुढे निघालो. नवे लोक आता पुढे काय या गंभीर अविर्भावांनी सर्व पाहत होते. नंतर अर्थातच त्याच वाहन मध्ये बसून आम्ही सगर ला पोचलो. 

सगर हे गोपेश्वर हुन ५ ते ७ km दूर असलेले एक छान गाव आहे. तिथून एक रस्ता रुद्रनाथ कडे जातो. ऋषिकेश हुन जातांना देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग गोपेश्वर करत सगर ला पोचलो. एका लहानशा हॉटेल मध्ये जाऊन विश्रांती घेतली. मी तर लगेच काही तास झोपून गेलो. उठलो तेव्हा बाहेर अंधार पडला होता. पप्या सोडून बाकी लोक पाय मोकळे करायच्या दृष्टींनी पसार झाले होते. आम्ही दोघे शेजारच्या गच्चीवर समोर दिसणाऱ्या ऊंच उंच डोगरांकडे पाहत मानसिक आनंद घेत होतो. हिमालयाच्या जवळ आल्याची जाणीव होत होती. तिथेच दोन घास खालले आणि सकाळची तयारी करून आम्ही झोपी गेलो. 

हिमालयातील सर्व ट्रेक हे सकाळी लवकर सुरु करणे हे गरजेचे असते हे अनुभवरून कळते. साधारण २ नंतर वातावरणात काहीही बदल होऊ शकतात. घातक बदल. हे काही लोकांना अमान्य असल्यानी तिथे पण निघायला उशीर झाला. ६ चे ६.४५ झाला. या ४५ मिनिटांचे महत्व नंतर कळले आणि दुसऱ्या दिवशी पासून वेळ काटेकोर पणे पाळणे सुरु झाले. 

रुद्रनाथ - पंचकेदार मधले सर्वात अवघड स्थान. काही म्हणण्यात ४० तर काही ४४ KM चा जाऊन येऊन ट्रेक आहे. माझा अंदाजानी कुठेतरी ४० +km नक्कीच आहे. हर हर महादेव म्हणत आम्ही आमचा ट्रेक चालू केला. मळलेली व्यवस्तीत वाट आहे. त्यामुळे चुकायची तशी काही सोय नाही. इतर लोक पण खूप असतात त्यामुळे जातांना विविध प्रांतातील जनता भेटत होती. 

रुद्रनाथ - हे आपल्या हिंदूंसाठी एक पवित्र स्थान मानले जाते. हिमालयात गेलो की अनेक प्रकारच्या आणि विलोभनीय गोष्टी ऐकायला मिळतात. रुद्रनाथ मंदिराची उत्पत्ती महाभारताशी संबंधित आहे. असे मानले जाते की महाभारताच्या युद्धानंतर पांडव आपल्या कर्मांपासून मुक्त होण्यासाठी शंभोचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत होते. महादेव त्यांना दर्शन देण्यास टाळाटाळ करीत होते आणि विविध स्वरूप धारण करीत होते. या वेळी, शंभो नी रुद्र रूप धारण करून होते. पांडवांनी त्यांच्या दर्शनासाठी तपश्चर्या केली आणि अखेर येथे शिवाचे आशीर्वाद मिळाले. असा म्हणतात की सर्व पंचकेदार जिथे बांधले आहेत तितेच शंभो ने धारण केलेल्या रूपाचे भाग आहेत. 

शंभोचे calling असते असे म्हणतात. त्यांनी बोलावले तर तो दर्शन देतो आणि नाही तर आम्ही आमच्या डोळांनी पहिले आहे की लोक परत जात होते, पोचू शकले नाही म्हणून. कारण काही असो. CALLING हा पण एक विश्वास आहे. एक भावना आहे आणि श्रद्धा आहे. ज्यांना मानायची त्यांनी माना आणि ज्यांना नाही त्यांनी नको. तिथे गेलो की मी विश्वात हरवतो. पहिले पाऊल ठेवले की मी Surrender होतो. आणि नुसते बोलायला नाही तर कृतीत पण. सर्वात अवघड गोष्ट असते म्हणजे १००% संपर्पण. संपूर्ण विश्वास. या जगात आई सोडली तर हिमालय ही दुसरी जननी जिथे मोकळे वाटते. काही दडपण नाही. काही किंतु नाही आणि कुठलीच भीती नाही. एकदा कुशीत गेलं की झालं. जिथे तुमचे विचार, भावना आणि कृती या तिन्ही एकरूप होतात. 

प्रवास सोपा नाही. आधी घनदाट जंगलातून वाट आहे. काही चढ अंगावर येणारे आहेत. पण खरं सांगू का, हा ट्रेक सर्वांना करण्यासारखा आहे. खूप चालायचे आहे पण कधी पोचतो हे कळतच नाही. उरतांना मात्र आपण, किती वर गेलो होतो, याची जाणीव होते. गुढग्यांना. जातांना धबधबे लागत होते. पाणी भरणे आणि पिणे चालू होते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चालत होते. आपल्याच ZONE मध्ये शांत होते. विचार करायला आणि इतर, काही नाही करायला, वेळच असा कुठे मिळतो. त्यामुळे काही काळ अड्जस्ट होण्यात जातो. एकदा का रिदम मिळाला मग काय ती मजा असते ते सांगून नाही कळणार. जातांना सर्व बाजूला विविध प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. पक्षी अशक्य किलबिल करत होते. त्यांच्या बरोबर आलेले बंगाली लोक बोलायचे थांबत नव्हते. का माहिती नाही पण इथे मराठी आणि बंगाली लोक भरपूर सापडतात. फारच बोलके असतात मात्र हे  ...... पुंग भूगियाल नामक ठिकाणी पोचलो आणि तिथे खायचे ठरवले. अहो विचार करा - चार बाजूला उंच डोंगर, झाडी आणि इथे गरम पराठे आणि चहा ओरपत आम्ही ऊन खात पडलो होतो. हे असा काही नसतंच. इथेच पडावे असे  सर्वांच्या मनात येऊन गेले पण जास्त सुस्त होण्याआधी तिथून आम्ही निघालो. इथून मात्रं वाट जी आहे ती पूर्ण चढ आहे. आज १२ - १४ km  चा टप्पा गाठायचा ठरला होता. लुटी नावाच्या ठिकाणी राहायची सोया आहे असे वाचनात आलेले भे भे नी सांगितले. हा  माणूस ट्रेक चा पूर्ण अभ्यास करून आला होता. त्याच्या साठी हा पहिलाच अनुभव. पुढे काय काय झाले ते कळेलच. छोट्या वाटा, येणारे जाणारे लोकं आणि खेचरं, असे आम्ही सर्व एकत्र होतो. मला पुढे काय याचा विचार करायची सवय नाही. आणि त्याची माहिती पण मी कधी घेण्याची तसदी घेत नाही. आयुष्यात याचे परिणाम मी खूप भागले आहेत. पण स्वभाव, आणि मला वाटतं की सर्वच जर का माहिती असेल आणि पाहिले असेल तर त्याचे काही कुतूहल उरात नाही. Picture  चा शेवट माहिती असेल तर बघण्यात मजा उरत नाही. नाही तर तो आवडता चित्रपट असावा, परत परत बघण्यासारखा. लुटी च्या आधी काही km  ला आम्ही विसावा घेत थांबलो. ४ वाजले असतील तिथे. आकाशात ढगांची दाटी आणि दूर वर पाऊस पडत असल्याची चाहूल लागत होती. वर चढायच्या आधी तिथे registration करावे लागते आणि फॉरेस्ट ची लोकं नाव नोंदणी आणि मोघम चेकिंग करतात. तिथल्याच एका माणसानी आमची वर राहायची सोय केली होती. विजांचा लांब वर आवाज येऊ लागताच आम्ही एकमेकांना घाई करायला सुरु केले. भेभे चा काही पत्ता नव्हता. हत्तीची चाल त्यात लाख विचार - अशामुळे तो मजा करत स्वतःबरोबरच रमला असायचा. साधारण अर्धातास गेला आणि मग हा उगवला. त्याला चहा पाजून ढकलत पुढे नेले. कधी पप्या तर कधी निगडे तर कधी मी असे त्याच्या बरोबर येत होतो. लुटी ला पोचलो आणि तिथे सौरभ नावाच्या इसमाच्या तंबूमध्ये आमची सोय झाली. साधारण १० एक मोठे तंबू आणि १५ एक छोटे तंबू अशी वस्ती मांडली होती. त्या वस्तीत शिरताच डावीकडे काही काकू आणि मावश्या गप्पा मारतांना ऐकू आल्या. १६ लोकांची गॅंग - तसे वयस्कर - मुंबई हुन आले होते. खेचरांवर बसून. त्यांचा तंबू मस्त आटोपशीर होता आणि सोय पण तशी बारी होती. समोरच्या बाजूला दोन टॉयलेट होती. एक लडीज आणि दुसरे सर्वांना. एकच काय ते सुख म्हणजे इथे पाण्याला कमी नाही. जिथे तिथे Pipe खेचलेले दिसतात - वरून कुठूनतरी डोंगरातून  येतात आणि आयुष्यभर पाणी काही थांबत नाही. 

आम्ही चहा मागवला आणि मॅगी. बाहेरील एका बाकड्यावर बसून चहा आणि गप्पा चालू झाल्या तोच पाऊसाचे टपोरे थेम्ब आदळू लागले. चटकन उठलो आणि वाकून अंधाऱ्या तंबूत शिरलो. ८ जणांची सोय होती. सॅक कोपऱ्यात ठेऊन थोडेसे आडवे झालो. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. आणि  जणू बादलीने पाणी ओतावे असा पाऊस वाढला. आम्हाला येऊन फक्त १५ min झाली असतील. अशक्य मुसळधार पाऊस चालू झाला. खालून, वर येणारे, चिंब भिजलेले दिसत होते. वस्ती रिकामी झाली होती. बाहेर फक्त खेचरं दिसत होती. आम्ही तो पाऊस शांत पणे बघत होतो. तास दीड तास ओसरला आणि परत सर्व आभाळ साफ झाले. बाकी चौघे जण आपापल्या जागा धरून निपचित पडले होते. पाऊस संपला पाहून मी बाहेर पडलो. उजवीकडे गेलो आणि त्याच त्या मावश्यांच्या तंबूतून श्लोक ऐकू आले. रामरक्षा ऐकू आली आणि मी गपचूप तंबूच्या बाहेर उभे राहून त्यांच्या बरोबर म्हणत गेलो. तंबूचे कापडी दार वाऱ्यांनी मधून मधून हालत होते. ते एका बाजूला गेले की आत असलेल्या मिणमिणत्या समई चा प्रकाश क्षण भर बाहेर पडायचा. त्या काका काकूंचे एकत्र पठण इतके सुरात होते की 'मंत्रमुग्ध होणे ' कशाला म्हणतात हे मला आज कळले. शेवटी शिव स्तोत्र झाले. ओम शांती शांती शांतिः म्हणून शांतता पसरली. मी तिथून निघालो आणि परत आमच्या तंबूत आलो. जेवणाची वाट पाहत कधी डोळा लागला कळले नाही. काही वेळानी 'खाना तयार है' अशी आरोळी अली आणि आम्ही जेवायला बसलो. तीच ती सब्जी आणि भात. पराठे आणि लोणचे. इथले लोणचे मला फार आवडते. त्याची चव आणि यात असलेल्या भाज्या काही वेगळ्याच असतात. गाजर आणि लिंबू ओळखू येते. पानिपत ला पंचरंगा नावाचे लोणचे मिळते. कुठल्याही पंजाबी किंवा North Indian धाब्यावर गेलात ते नक्की मागा. त्यांच्या कडे ते असतेच. इथे पुण्यात पण. पोट भर जेवलो आणि झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी भे भे वेळेत जागा झाला आणि आवरून तयार झाला. चहा आणि पराठे चेपले आणि आम्ही परत ट्रेक ला सुरुवात केली. आजचा १० km चा पल्ला खूप चढण आणि नंतर उतार असा काही तरी होता. बुटांच्या नाड्या आवळून आम्ही पाच जण निघालो. थोड्या गप्पा एकदा एकाशी तर एकदा दुसऱ्याशी मारत मारत आम्ही चालत राहिलो. पहिला टप्पा पनार बुगीयाल होता. सुरवातीचा काही काळ जागे होण्यात जातो. पण एकदा का पाय settle झाले की मग पुढचा प्रवास मात्र खूपच छान जातो. 

जशी altitude वाढत जाते तसे तसे श्वास घेणे जाणवते. म्हणजेच काय प्रत्येक आणि प्रत्येक श्वास घेतांना आणि सोडतांना त्यावर लक्ष केंद्रित होते. खूप भारी अनुभव आहे. मनात काही विचार नाही. फक्त चालत राहायचे. हेच ते काय मेडिटेशन वगरे. खरं सांगू तर कधी कधी भीती वाटते या स्थिती मध्ये, कदाचित येणाऱ्या अनुभवांची असेल किंवा न कळणाऱ्या जाणिवांची असेल. त्यात देव धर्म बुवाबाजी आणि फालतुगिरी काही नसते. भीती वाटते की आपण आपल्यालाच इतके निरखून कसे पाहू शकतो. आणि जर का काही वेगळे कळले तर. मी असा मी तसा वाटणारे सर्व तुटणे काय आहे याचा पण साक्षात्कार होतो. असो. पण एक मात्र खरं आहे की एकाग्र चित्त काय आहे आणि असते ते तिथे समजायला वेळ लागत नाही. ती स्तिथी जर का सर्वत्र अनुभवायला मिळाली तर ?

पनार ला पोचलो आणि पहिल्यांदा डोळ्यासमोर हिमालयाचे दर्शन झाले. Green Meadows अथांग आणि त्याच्या बॅकग्राऊड ला पर्वत रांगा. याच्या साठी यायचे. अथांग समुद्र पहिला की, उंच उंच हिमालय पहिले की, एखाद्या अमावास्येच्या रात्री निरभ्र आकाशात रस्त्यावर आडवे पडून प्रम्हांड आणि त्या असंख्य चांदण्या पहिल्या की फक्त भरून येतं, मनात एकच विचार येतो की बाप्पा तुझा आभारी आहे की मला हे अनुभव मिळू दिलेस. तुमचे माहिती नाही, पण मला तर उडावेसे वाटते अशा वेळी. फोटो झाले आणि थोडासा अराम करून पुढचा पल्ला गाठायला आम्ही निघालो. इथून पित्रधार पर्यन्त अशक्य अंगावर येणारे चढण आहे. पाणी कुठेही नाही. त्यामुळे पाणी जपून वापरत आम्ही पुढे निघालो. निसर्ग at  its best आहे. इतके भारी वाटते की काही विचारू नका. 

रस्ता कठीण असल्यानी निवांत चालत होतो. तीन टेकड्या लांबवर भगवा झेंडा फडकतांना दिसला आणि हुशः झाले. कारण लोकांनी सांगितले होते की पित्रधार नंतर ४ km उतार आहे. आम्ही इथे काही थांबलो नाही. पटापट पुढे उतरायला सुरुवात केली. येणारे जाणारे हर हर महादेव च्या आरोळ्या ठोकत होतेच. त्या मावश्या आणि काका गॅंग कधीच पुढे निघून गेले होते. आम्ही २ km गेलो असू पित्रधार पासून आणि ते सर्व दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर होते. आमचा तिथे राहण्याचा बेत नक्की झाला होता. दूर दोन डोंगरांच्या मध्ये लांब वर मंदिराचे दर्शन झाले. डोळ्यातून पाणी आल्याशिवाय काही राहिले नाही. निगडे आणि निशिकांत तिथे बसले होते. निगडे नी उठून मला घट्ट मिठी मारली. दोघांचेही डोळे पाणावले होते. खूप ट्रेक एकत्र केले आहेत आणि खूप वेळा एकमेकांना सांभाळले आहे. तो मी आणि पप्या - अशी त्रिशूल गॅंग आहे. अर्थात बाकी खूप लोक येत जात असतात. ३० ३० वर्षे झाली आमची मैत्री घट्ट आहे. खूप लोकांनी काड्या केल्या, अजून करतात, पण तसा काही फरक नाही पडला. तो क्षण असतो, आणि त्यावेळी जे वाटत असते ते न सांगता कळते ते फक्त आणि फक्त एका खऱ्या मित्राला. किंवा ज्याला कळते तो तुमचा खरं मित्र असतो. 

देवळापाशी पोचलो आणि वाटेवरच एका तंबू मध्ये आमची सोय झाली. सॅक टाकून चहा मॅग्गी खायला गेलो. इतर तरुणाई पण भाऊ गर्दी करून होती. त्यामुळे जरा आमची पण करमणूक झाली. पोरं तरतरीत झाली. आम्ही गप्पा मारत निवांत झालो होतो. मधून मधून घंटेचा आवाज कानी पडत होता. वातावरणातला गारवा जाणवला लागला होता. मी भे भे ला शोधायला इकडे तिकडे पाहू लागलो तेव्हा तो देवळाच्या दिशेनी चालत जातांना दिसला. त्याचे कौतुक करावे तितके थोडे. खूप स्वतःला push  करून तो इथे पोचला होता. मला म्हणाला रंग्या अरे पहिल्या दोन तासातच मी थकलो होतो. बाकी जे आलो ते कसे काय मला माहिती नाही. Calling म्हणालो ना. ते हेच काही तरी असावे. 

तिथे सर्वसाधारण सर्व मंदिरे एक सारखी असतात. म्हणजे त्यांचे जे काही structure असते ते. मंदिरे इथे का ? पांडव कालीन मंदिरे अजून इथे उभी कशी ? हजारो वर्ष झाली आणि पूजा अर्चा चालू आहे अथक. हे कसे काय. तेव्हा काय असेल ? ज्यांना आपण महाभारतातले मुख्य कलाकार मानतो ते इथे येऊन गेले आहेत. ते इथे राहिले आहेत. काही तरी वेगळाच अनुभव असतो हा सर्व. पूजा आणि आरती संध्याकाळी ६.३० ला असते. आम्ही आवरून कानटोपी घालून देवळा कडे निघालो. उजवी कडे त्रिशूल, नंदादेवी, नंदाघुमटी आणि खूप सारे निनावी पर्वत सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात झळकत होते. मी देवळात जाऊन दर्शन घेतले. अदभूत आहे काही तरी हे. एका कोपऱ्यात जाऊन ध्यान लावून बसलो. आता हे लिहितांना पण डोळे मिटले तर ती जाणीव झाल्या शिवाय राहत नाही. हर हर महादेव. काय होते त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. पण मला वाटते की प्रत्येक माणसाचा अनुभव काही वेगळा असतो. काही लोक अमृत दिले तरी एरंडेल सारखे पितात. त्यांना त्या अनुभवाची पण allergy असते. त्यांना मला कसा काही अनुभव नाही आला सांगण्यात जास्त धन्यता वाटते आणि तोच त्यांचा अनुभव असतो. Surrender / समर्पण या क्षणी जाणवते. अहंकाराचे. मी कोणी नाही, कोणीच नाही. ज्यांना तिथे जाऊन पण याची जाणीव होत नाही ते जाऊदे JJVTTL. काही वेळात गुरुजींनी मला हाक मारली आणि मी जागा झालो. देवालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले. बाहेर गर्दी जमली होती. सर्वांना बसायला सांगितलं आणि काही सूचना दिल्या. सर्वत्र शांतता पसरली. काही दाम्पत्यांमध्ये तरीही कशावरून तरी चर्चा चालूच होती. शेवटी त्या पुजाऱ्याबानी त्यांना हटकले. मी वरच्या पाहिरीवर बसलो होतो. डमरू आणि मोठे नगारे बाहेर निघाले. शंख नाद झाला आणि माझा डावीकडून एक उंच तेजस्वी माणूस भगवे कपडे आणि अंगावर गरम जाकीट घालून प्रगट झाला. पायात वहाणा, धोतर North  इंडियन पद्धतीचे, गळ्यात रुद्राक्ष माळा, डोक्यावर पगडी सारखे काही तरी बांधलेले, ६ फूट किंवा अधिक उंची. हे मुख्य पुजारी. देवळात गेले. परत शंख नाद झाला आणि अचानक घंटा, डमरू आणि नगारे याचा एका तालात आवाज घुमू लागला. अशक्यच म्हणायचे हे जे एकही होते ते.  It was magical, mystic. शिव असल्याची जाणीव. अर्धा तास आरती झाली आणि त्यानंतर मंत्र पुष्पांजली. परत आत गेलो तर भोलेबाबा चा मुखवटा बदललेला दिसला. खूप प्रसन्न वाटले. इथली ताकद काही वेगळीच आहे. आम्ही सर्व भाविक. आस्तिक आणि नास्तिक सर्व तिथे हरवून गेलो होतो. 

बाहेर येऊन चप्पल शोधून परत टेन्ट कडे निघालो. एका टेबल वर आम्ही पाच जण बसलो आणि डाळ आणि भाताने पॉट भरले. डाळ खूप चविष्ठ होती. एकंदरीत दिवस उत्तम पार पडला आणि दर्शन पण मनासारखे झाले. टेन्ट मध्ये जाऊन आपल्या जागा पकडून आम्ही घोरायला लागलो. अधून मधून उंदीर अंगावर उद्या मारत होते आणि मी त्यांना भिरकावून लावत होतो. काही वेळानी झोप लागली आणि नंतर उंदरांनी काय केले हे मला कळले नाही. कोणालाच कळले नाही. सकाळी ५ ३० ला उठलो आणि उजाडायच्या आत सकाळी ची कामे उरकली. इथे काही कसलीही सोय नाही. मनात आले होते की एक दिवस अजून इथेच राहू पण एकंदरीत व्यवस्था बघता ते काही शक्य वाटले नाही. 

आज मात्र २२ किमी चा पल्ला एका दिवसात गाठायचा होता. उतरतांना, माझे वजन जास्त असल्यानी, पायावर खूपच ताण पडतो. सावकाश उतरावे लागते कारण इथे पडलो तर फारसे काही वाचणे वगरे नसते. एक टप्पा आऊट असते. आम्ही परतीच्या प्रवासाला सुरु केले. ४ किमी चा खडा चढ चढून आम्ही परत पित्रधार ला पोचलो. आज भे भे दमला होता. खूप सावकाश येत होता. अर्धा पाऊण तास थांबून भे भे आला. इथून पुढे पुरुजीत त्याच्या बरोबर पुंग भुगयाल पर्यन्त बरोबर आला. ४ ३० वाजले तिथे पोचे पर्यन्त. वाटेत तसे फार काळ कुठे न थांबता आम्ही खाली उतरत होतो. वेळेत पोचणे गरजेचे होते कारण पाऊस आला तर काही खेर नाही. पुंग ला पोचलो आणि इथे पराठे मिळाले. आजूबाजूला बंगाली बाबू गॅंग चिवचिवाट करत होते. निगडे पुरुजीत आणि निशिकांत इथून पुढे निघाले. मी आणि भे भे दोघे गप्पा मारत मारत त्याच्या पेस नी खाली उतरायला लागलो. रस्ता काही संपत नव्हता. अंधार पडायला लागला होता. हळू हळू वर जाणाऱ्यांची आणि वरून खाली येणार्यांची पण गर्दी नाहीशी झाली होती. माकडे म्हणजे बिग size इकडून तिकडून उद्या मारत होती. जंगल जागे व्हायला लागले होते आणि त्यात आम्ही दोघे पाहुणे. जसे पुढे जात होते तसे तसे त्या त्या एरिया मधली झाडे जागी होत होती. रातकिड्याचा आवाज जोरानी चालू व्हायचा आणि आम्ही पुढे गेलो की कमी व्ह्याचा. पाऊस थोडा थोडा चालू झाला होता. लांब वर वीज चमकताना दिसत होती. भे भे ला थोडी घाई केली तर म्हणायचं की तू पुढे जा. जे शक्य नव्हते. नियम आहे. ४ तास आम्ही चालत होते हळू हळू. शेवटचा १ किमी मात्र किर्रर्र अंधार पडला आणि मी माझा मोबाइल च्या प्रकाशात आम्हा दोघांना खाली न्यायला लागलो. एकीकडे आधी रामरक्षा झाली, मग भीमरूपी आणि अथर्वशीर्ष झाले आणि नंतर मात्र मी मोठमोठ्याने गाणी म्हणत होतो. म्हणजे आम्ही मित्रांमध्ये तीन प्रकारची गाणी आहेत - एक ऐकायची म्हणजे ती गाणी आपण म्हणायचं प्रयत्न नाही करायचा - मूळव्याध होऊ शकतो. दुसरी म्हणजे म्हणायची गाणी जी आम्ही म्हणतोच - जी ऐकली कोणी तर बेसूर नाही वाटणार आणि तिसरी म्हणजे आमचे काही मित्र धार्थ सारखे जे गाणी सांगायचे. पेपर वाचल्या सारखे. ते ऐकून पण बरेच वर्ष उलटले आता. तर सांगायचा मुद्दा असा की जंगली प्राणी जवळपास येऊ नये या हेतूंनी असो वा काहीही मी आरडा ओरड करत गाणी म्हणत होतो. भे भे मधूनच हसायचा. या माझा बालपणीच्या मित्रानी ट्रेक मात्र पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी पायाचे तुकडे पडले ते सोडा. 

सुरुवातीच्या कमानीत पोचलो आणि हुश्श झाले. ८ वाजले असावेत. सगर ला ज्या हॉटेल मध्ये राहिलो होतो तिथे परत पोचलो. मस्त अंघोळ केली, कुठल्याश्या तरी rum चवीचे दोन घोट घेत आम्ही सर्व त्या हॉटेल च्या गच्चीत गप्पा मारत बसलो होतो. मी पटकन जाऊन बटाट्याच्या काचऱ्या केल्या. लखलखीत आकाशात आम्ही सर्व फिलॉसॉफिकल तारे तोडत होतो. कोणाला काय अनुभव आला याचे वर्णन करत होतो आणि ऐकत होतो. काही म्हणा आमच्या गप्पांमधून नेहमीच काही ना काही तरी नवीन शिकायला मिळते. निगडे चे योग वर्ग, पुरुजीत ची तत्वे, भेभे चे वाचन आणि त्यातून घेतलेले बोध याचा गोपाळ काला झाला तरी वाद नाही होत. जेवलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशीची वाहतुकीची सोय झाली होती. उखीमठ आणि तिथून रांसी असा प्रवास होता.  

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बोलेरो मध्ये सॅक चढवून तिथून निघालो. एक ट्रेक उत्तम झाला आणि रुद्रनाथ महाराजांचे दर्शन पण सुंदर झाले. बोलेरो मध्ये बसता उतरता सर्वांचे पाय बोलत होते. ६० ते ७० किमी चा प्रवास होता. हा प्रवास चोपता किंवा ज्याला mini  swiss  म्हणतात अशा प्रदेशातून होता. जातांना तुंगनाथ लागले. काही वर्षांपूर्वी आम्ही तुंगनाथ ला गेलो असतांना जेमतेम १०० लोक दिसली वर खाली करतांना. आज पाहिले तर चातृशृंगी ची कशी जत्रा असते तसे काही तरी होते. लोक कुठेही पार्किंग करत होते. कुठेही कचरा टाकत होते. भगवे कपडे आणि गाडी मध्ये दोन फिरंगी पाहुणे हे दृश्य कॉमन होते. खेचरांनी केलेली घाण आणि माणसांनी मांडलेली घाण दोन्ही तिथेच. आम्हा तिघांना मनात येऊन गेले की बरं झाले आपण इथे येऊन गेलो आहोत. Generally speaking मला असा वाटतं की जिथे ट्रेक आहे, आणि जिथे पोचणे कठीण आहे तिथेच गर्दी आणि घाण जरा कमी आहे. एव्हरेस्ट सोडून. 

जाता जाता उजवीकडे मान खाली करून तुंगनाथाला नमस्कार केला आणि पुढे निघालो. बोलेरो चे, आम्हाला रांसी नावाच्या गावी सोडण्याचे ठरले होते. पण या बहाद्दूर नी उखीमठ पर्यन्त गाडी नेली आणि तिथून दुसरी सवारी करा असे म्हणाला. थोडी बाचाबाची झाली पण कळले की दुसरी सवारी चे पैसे काही द्याचे नाहीत. सॅक काढल्या आणि आम्ही दुसऱ्या बोलेरो मध्ये जाऊन बसलो. मागे एक माणूस लटकत होता आणि टपावर  एक माणूस निवांत बसला होता. कदाचित हा जाड भिंगाचा माणूस आमचा पुढच्या वर्षीच्या ट्रेक चा गुइडे असू शकेल. रस्ता भयंकर होता कारण इथून आम्ही डोगरात उंच जाणार होतो. कैलास - या गाडीचा ड्राइवर. या माणसाबद्दल नकीच बोलले पाहिजे. लिहिले पाहिजे. एक तरतरीत आणि फिट साधारण २८ वर्षांचा माणूस अशक्य बोलका आणि अत्यंत मदत करणारा. ३ दिवस त्याच्या विविध गोष्टी ऐकण्यात आणि हिंडण्यात कसे गेले कळलेच नाही. 

गाडीत बसलो आणि मी कैलास ला म्हणालो भाई मटण का कूच जुगाड हो सक्त है ? त्याच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले. तो म्हणाला भाई सब हो जायेगा. इथे या एरिया मध्ये जास्त नॉन veg मिळत नाही. सर्रास तर नाहीच नाही. पण पहाडी भागात अजून आत आत गेलात की बरेच काही होऊ शकते. कैलास नी सांगितले की माझे हॉटेल आहे आणि तुम्ही तिथेच राहू शकता. रांसी ला पोचे पर्यन्त त्यांनी आम्हाला दोन तीन ठिकाणे दाखवली. एका सुंदर धबधब्या च्या बाजूला आम्ही जाऊन निवांत पडलो. सर्व शीण नाहीसा झाला. कोणी एका दगडावर तर कोणी दुसऱ्या. आपापल्या विश्वात हरवून गेले होते. मग तिथून गेलो एका तलावा पाशी. तिथे अर्जुना नी अंघोळ केली असे म्हणतात. अप्रतिम जागा होती. आता हा कैलास नसता तर हे काही झाले नसते हे नक्की. 

रांसी ला पोचलो आणि त्याच्या हॉटेल मध्ये गेलो. ४ खोल्याचे सुंदर टुमदार हॉटेल दरी च्या टोकाला आहे. तिथून थेट समोर हिमशिखरांचे दर्शन आणि दोन्ही बाजूला उंच उंच हिरवेगार पर्वत. अहाहा. दोन खोल्या घेतल्या आणि आम्ही निवांत झालो. रात्रीची मटण ची तयारी झाली होती. आज जेवायला काही तरी वेगळे मिळणार याच्या आनंदात होतो. 

आज आमचा रेस्ट डे असल्यामुळे आम्ही समोर च्या बाकड्यावर बसून चहा ओरपत निवांत गप्पा मारत बसलो होतो. आजूबाजूची चिल्ली पिल्ली खेळायला येत होती आणि पप्या आणि निशिकांत त्यांच्या शी खेळण्यात मग्न झाले होते. तो दिवस संपला. प्लॅनच नाही करायचा त्यामुळे काही वेगळे घडले तर त्याचे सोयर सुतक आम्हाला नव्हते. मी पप्या आणि निगडे बोलता बोलता म्हणालो की इथे परत यायला हवे. मग आपण इथेच ३ दिवस राहू आणि इथली सर्व न माहिती असलेली ठिकाणे झाडून काढू. मदमहेश्वर साठी परत येऊ. ओक ओक ओक. विषय संपला. या मागचे कारण अजून पण काही होते पण ते इथे लिहिणे बरोबर नाही. 

पुढचे तीन दिवस कैलास नी आम्हाला जंगलात, धबधब्यात, धरणात, डोंगरवर आणि FB आणि INSTA वर रील्स मध्ये न सापडणाऱ्या अनेक ठिकाणी हिंडावले. अवर्णनीय निसर्गाचे, तिथल्या Local अन्नाचे आणि इतर बरेच काही नवनवीन अनुभव आम्हाला मिळाले. आजूबाजूला तिथे गांजा म्हणजे Purest Form काय असेल अशी शेती होती सर्व घरांच्या भोवती. डोगरात जाऊन तिथला फ्रेश माल आणि मळून मळून केलेली गोळी म्हणजे शम्भोचा प्रसादच म्हणायचं. या गावामध्ये एक मंदिर आहे देवीचे. गूढ सर्व. एके संध्याकाळी आम्ही चालत त्या मंदिरात गेलो कारण आरती असते. काहीतरी अदभूत अनुभव आहे. हे पण मंदिर पांडव कालीन - गुरुजी तर म्हणाले त्यापण आधी चे आहे. मंदिराच्या आवारात एक स्वयंभू पंचकेदाराचे मंदिर आहे. हे म्हणजे जरा अति होते विश्वास ठेवायला पण. पण आहे हे खरे. ५ केदार जसे आहेत तसे च्या तसे इथे या छोटासा मंदिरात साक्षात दिसले. मदमाहेश्वराचे दर्शन इथे झाले. आरती झाली आणि आम्ही परत हॉटेल कडे यायला निघालो. चालायची सवय झाली होती त्यामुळे लांबच्या रस्त्यानी गप्पा मारत मारत काही किमी चा फेरफटका सहज मारला. 

तीन दिवस राहून आमची जायची वेळ झाली. कैलास ला आश्वासन दिले की आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ, गुगल वर review लिहून तिथून निघालो. सकाळची ६ ची गाडी उखीमठ वरून आम्हाला परत ऋषिकेश ला नेणार होती. 

ऋषिकेश चा अनुभव काही फारसा चांगला नव्हता आणि लिहिण्यासारखे काहीही नाही. 

अजून एक हिमालयातील प्रवास म्हणा ट्रेक म्हणा किंवा अनुभव म्हणा पूर्ण झाला. कैलासालाच आश्वासन देऊन आलो आहे त्यामुळे परत जायची वाट पाहायला सुरुवात झाली आहे. पानपटीया, कालिंदी, मदमहेश्वर, देवारीया ताल, कागभूसंदी असे तिचे आसपास असणारे ट्रेक - कठीण ट्रेक याची माहिती साठवून ठेवली आहे. फक्त प्रॅक्टिस चालू कधी करायची या साठी बसावे लागणार आहे !!!

हर हर महादेव !!!










Tuesday, 30 April 2024

कोळकेवाडी किल्ला/डोंगर

PC किरण खळदकर 

कोळकेवाडी किल्ला/डोंगर

विसापूर किल्ला झाल्या नंतर काही दिवसात माझा पाय  दुखावला. त्यामुळे त्यातून बाहेर पडायला ३ महिने गेले. सकाळ संध्याकाळ आपली टेकडी चालू आणि वाटले की ट्रेक परत जमेल मला. अशाच वेळी किरण खळदकर यांनी ट्रेककरी ग्रुप वर एका किल्ला / डोगर करायची इच्छा वर्तवली आणि मी लगेच तयार झालो. 

एप्रिल चा महिना. आंबे यायला  सुरुवात झाली होती. तसाच लग्नांचा काळ. पण दर वर्षी सारखे चित्र या वर्षी नव्हते. माझ्या घराच्या आजूबाजूला साधारण ५ ते ६ नवीन इमारती, साधारण १० - १५ माजली चे काम सुरु आहे. धुराळा आणि आवाज नको नको होई पर्यन्त. कुठेही जा  रिडेव्हलोपमेंट चे वारे नसून वादळ उठले आहे. ४ माजली च्या ठिकाणी १० - १२ माजली इमारती. Concrete चे जंगल. अर्थात याची सुरुवात २० वर्षांपूर्वीच. परिणाम - तापमान ४३.५ पुण्याच्या काही भागात. ४० वगरे सर्रास. हे चित्र न सहन होणारे होते. संध्याकाळी आणि सकाळी तरी हवेत काहीसा गारवा असायचा तो पण आता नाहीसा झाला. अशाच एका भयंकर दिवशी आम्ही संध्याकाली ७ च्या सुमारास कोयना नगर भागात जायला गाड्या काढल्या. ७ जण जमले होते आणि किरण कोकाटे च्या वर्कशॉप पाशी जमायचे ठरले. वेळेवर सर्व जण पोहोचलो आणि इथून निघालो. घाट ओलांडला आणि कळले की अजून तीन जण येत आहेत. गप्पा मारत तिथेच काही वेळ थांबलो आणि ७ चे १० झालो. दोन गाड्या मध्ये बसून आम्ही उंब्रज च्या दिशेनी गाडी वळवली. रात्रीची पोटपुजा करून मल्हारपेठ, अडुळ, पाटण, हेळवाक, अलोरे कारत कोळकेवाडी जवळ पोचलो. सचिन जोशी नी आमची  तिथे एका मंदिराच्या भक्तनिवासात राहायची सोया केली होती.  उकडून जीव गेला होता. कोण कुठे तर कोण कुठे साधारण २ च्या सुमारास सुखावलो. 

     PC किरण खळदकर 

 सकाळी बरोबर ५३० ला उठून आवरून  ६३० का १० लोकांनी डोंगराच्या दिशेनी गाड्या वळवल्या. आधी देवळात गेलो, दर्शन घेतले, पाणी भरले आणि वाटाड्याची माहिती  घेतली. किरण खळदकर उर्फ खल्या हा ट्रेक लीड करत होता. या ग्रुप चे खूप छान आहे ते म्हणजे नियोजन मस्त असते. माहिती खूप आणि ओळखी खूप. ही मंडळी भरपूर ट्रेकिंग केलीली आहेत आणि त्यामुळे काही तरी नवीन शिकायला मिळते. 


PC किरण खळदकर 


PC किरण खळदकर 


गावात दोन लग्न होती.  त्यामुळे गाव सजून नटून होते. लोक पण धावपळीत होती आणि नेहमीच येणार असलेला वाटाड्या काही आमच्या बरोबर आला नाही. गडाच्या पायथ्याशी एका झक्कास घरात गणेश नावाचा तरुण आला. त्याच्या वडिलांनी कोरा चहा दिला आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतांना कळले की नुकतेच गणेश चे पण लग्न झाले आहे. आजूबाजूला आंबा फणस आणि इतर झाडे असलेले हे घर नदीच्या काठी होते. तिथल्या धरणाच्या बॅकवॉटर ला. चित्रातले. बाहेर तुळस, सारवलेली जमीन, पडवी, तिथेच उजवीकडे असलेली एक खाट आणि डावीकडे मोठी भांडी. मामा चांगले होते. 







८ च्या सुमारास मला वाटते आम्ही निघालो. सूर्यनारायण आपले डोके वर काढायला लागला होता. उगवला होताच पण डोंगरात अजून लपलेला. गप्पा मारत मारत आम्ही सर्व जण वर निघालो. चढण अंगावर येणारे. ३ ते ४  डोगर असेच की थोडे पुढे गेले आणि आला गडमाथा, असे सांगून गणेश नी आम्हाला वर न्यायला सुरु केले. माझा साठी हा ट्रेक वर नेण्या इतकाच भयंकर ठरला. ऊन वाढत चालले होते. काही लोक एक टेकडी चढले आणि मग परत फिरले. उन्हाचा तडाखा काय हे हळू हळू कळायला सुरुवात झाली होती. इलेकट्रोल ORS वगरे ची देवाण घेवाण चालू होती. २ ते २. ५ तासात आम्ही वर पोचलो आणि गुहेमध्ये थोडावेळ निवांत बसलो. तीन टपट्यात तीन ठिकाणी गुहा आहेत. चढण सोपी नाही. घसारा खूप आहे आणि एका बाजूला दारी आहे. डायरेक्ट एक टप्पा आणि आऊट. सावकाश जायचे. काळजी घेत. एका गुहेतून दुसऱ्या गुहेत जाण्यासाठी एक भिंत चढावी लागते. पलीकडे उतरायला साधारण ४" वगरे जागा असेल .- पाय ठेवलायला. मग एक ढांग टाकून पलीकडील गुहेच्या भिंतीवर पोहोचता. खाली खोल दरी आहे. अशा प्रकारे भर रणरणत्या उन्हात तो किल्ला आम्ही सर केला आणि गुहा बघून परतीच्या प्रवासाला निघालो. 


PC किरण खळदकर 




PC किरण खळदकर 

वर जातांना मला काहीच त्रास झाला नाही याचे मला पण कौतुक वाटले. पण जसे आम्ही परत  निघालो तसा  मला पहिला छातीत कॅरॅम्प  (Cramp) आला. मनात विचार आला की हा एव्हडा च असेल तर ठीक. तिथपासून मला अशक्यच कॅरॅप्स यायला सुरु झाले. ड्रायविंग, रात्रीची झोप न होणे, ४३ deg यांनी अल्ट्रा डिहायड्रेशन होण्यास सुरुवात झाली होती. याचा माझा पहिलाच अनुभव. पाणी पीत मी खाली उतरत होतो. थोडीशी चक्कर आणि झोप डोळ्यावर, यांच्याशी कुस्ती खेळत सावकाश मी खाली निघालो होतो. मित्र मंडळ सर्व परींनी मला मदत करत होते. दर काही वेळानी थांबत थांबत मी पुढे जात होतो. पायातून अक्षरशः वाफा येत होत्या. पिण्याचे पाणी साधारण चहा पितो ना, इतके गरम झाले होते. म्हणजे T बॅग्स असत्या तर चहा झाला असता. माझी अवस्था वाईट झाली होती. किरण माझा बरोबर थांबला आणि शेवटी आम्ही खाली पोचलो. एका आंब्याच्या झाडाखाली  बाकी सर्व लोकं गप्पा मारत विश्रांती घेत आमची वाट पाहत होते. गणेश नी पाणी आणले आणि मी पिऊन तिथे झोपलो. जाग अली तेव्हा आजूबाजूला कोणी नव्हते. ढेरे होते फक्त. उठून उभे राहायचा प्रयत्न केला आणि आयुष्यात इतक्या वेदना नसतील झाल्या इतके अंगभर कॅरॅप्स आले. बॉम्ब मारत मी भूषण ला मदत करायाला सांगितली. काही सुचत नव्हते. घामाघूम झालो होतो. माझा आवाज ऐकून गाडी आणायला गेलेले लोक परत धावले. मला फुल्ल एक पाकीट परत पाणी आणि इलेकट्रोल दिले. मामा नी त्यांच्या चपला दिल्या आणि मला मदत करत गाडी पाशी आणले. पाणी आणि खांदा असे दोन्ही मिळाले. गाडीत हळूच बसलो आणि कोकाटे की गाडी चालवायला सुरु केले. गाडीत बसलो आणि पाहिले तर ४५ deg दाखवत होते. काही  वेळातच मी परत नॉर्मल ला आलो. वाटेत आंब्याची अनेक झाडं होती. त्यातल्याच एका झाडाच्या कैऱ्या तोडल्या. अर्धवट गाभुळलेले आंबे ओरपले. लहान मुलांसारखे सैरावैरा कैऱ्या उचलत अर्धा तास नक्कीच गेला असेल. 

गाडीत वेगवेगळ्या गप्पा झाल्या. कोण काय काय करतात कळले. इतर ट्रेक च्या आणि अर्थात राजकारण यावर चर्चा झाल्या. काही इतिहास झाला. एकंदरीत खूप मजा आली. 

मला dehydration मुळे खूप त्रास झाला. आता हा त्रास कसा कमी होईल या साठी प्रयत्न आणि अजून स्टॅमिना बिल्डिंग चालू करायचा निर्धार. परत ४५deg  मध्ये गेलो की हा त्रास आयुष्यात नाही होणार याची काळजी, प्रयत्न आणि प्रॅक्टिस चालू. 




















Wednesday, 1 November 2023

विसापूर - पसरलेला


विसापूर - पसरलेला  

"काका आम्ही धर्मशाळेत राहणार आहोत. ट्रेक वगरे नसून ही एक ट्रिप आहे. अमोद ची काही काळजी करू नका." असे सांगून आम्ही पळ काढला. मी, आशुतोष भडभडे, अतुल वैद्य, कौस्तुभ देशमुख, भूषण घोरपडे आणि अमोद गद्रे. दुपारच्या लोकल नी निघायचे ठरले आणि तसे नियोजन झाले. डबे बांधले, हंटर शू, पिट्टू जुनाबाजार सॅक, कॅरी मॅट - मोठी शिट घेऊन कापून केलेली, चादर, आणि इतर आवश्यक सामग्री घेऊन आम्ही निघालो. एकत्र जमलो आणि एक एकाची वेष भूशा पाहून आज पण हसू येते. अमोद नी कामाची चे बूट, आणि एक ज्याला सुटकेस म्हणतात असे काही तरी घेऊन आल्याचे चांगले आठवते. भूषण फाटकी जीन्स आणि कमरेला कुठला तरी, हातानी पण वाकेल, असा रॅम्बो knife म्हणून घेऊन आला होता. आम्ही निघालो होतो भाजे, लोहगड आणि विसापूर ला. १९८९ मध्ये पहिल्यांदा इथे आलो होतो. त्या लेण्यांमध्ये रात्र काढली होती. जेवलो होतो. शाळातील ते दिवस आणि त्या आठवणी आज पण ताज्या आहेत. गद्रे काकांना मात्र आज तरी हे सांगितले पाहिजे की आम्ही कुठल्याश्या गुहेत राहिलो होतो, तिथे वट्वागुळांनी बाजार मंडल होता, विंचू आणि खेकडे दासमुंग्यां सारखे दिसत होते आणि एक अजगराने काही तरी खाऊन निपचित पडलेले दर्शन दिले होते. एक अजब ट्रेक होता पावसाळ्यातला. तेव्हा रस्ता नव्हता की काही. काल जाऊन आलो आणि सर्व आठवणींना उजाळा मिळाला. त्याच आठवणींच्या शिदोरी वर, वर्ष उलटून गेले एकमेकांना भेटून, तरी मैत्री तशीच. त्या विसापूर च्या तटबंदी इतकीच घट्ट. Miss You Atalya, हा मित्र सुखात आहे देवाकडे..... चला --------

पुण्यात थंडीची चाहूल लागली. पाऊस गेला. कोजागिरी चा चंद्र आला उत्तम प्रकाश पडला वगरे वगरे जे काही ते सुरस भाषेत, सर्व झाले आणि ट्रेक ठरला. खूप दिवसांच्या सुट्टी नंतर जायचे  पण झेपेल असा ट्रेक करू म्हणून विसापूर ठरले. मी पिंटू आणि बिडी तयार झालो. पुढच्या आठवड्यात सर्व मित्रांची एक सहल ठरली आहे ज्याच्या नियोजनाचा, भांडणांचा, कोण काय आणणार आणि कोण कसे आणि किती वाजता निघणार याच्या चर्चे चा सेशन ठरला आणि टेबले भरली. लोक पन्नाशीला आली तरी ट्रिप ठरली की लहान मुलांसारखे भांडतात. अहो प्रत्येकाच्या बुडाखाली गाडी अली तरी कोण काढणार याची चर्चा. आमच्या पोरांनी आम्हाला असे पहिले तर मला वाटते ओळख पण नाही दाखवणार. असो.  रात्री झोपायला थोडा उशिरच झाला. थोडी झाली पण होती. तरी ५ ला उठून पिंटू कडे पोचून आम्ही निघालो. बिडी नी त्याची गाडी काढल्याने आज समस्र मित्र परीवाला भरून आलेले मी माझा डोळ्यांनी पहिले. गहिवरून येते ना, तसेच काहीसे. 

विसापूर ला जायला आता रस्ता आहे.  पूर्वी मळवली स्टेशन वरून आम्ही भाजा ला जायचो आणि मग तिथून किल्ल्यावर. आता  घाट झाल्यामुळे गाडी लोहगड आणि विसापूर  मध्ये पर्यन्त जाते.  थोडक्यात भाजे आणि पाटण असे दोन मार्ग आहेत. आम्ही गायमुख खिंडीतून गडावर गेलो. धबधबा वाट म्हणायला हरकत नाही. 

विसापूर हा किल्ला एका नजरेत मावत नाही. गडाचा विस्तार अशक्य मोठा आहे. वर चढायला खडा चढ. ४० ते ४५ min मध्ये गडाच्या माथ्यावर पोचता येते. गडाच्या पायथ्याशी गाडी लावून आम्ही तिथे असलेल्या एका छोट्या हॉटेल मध्ये शिरले. आत एक काठमांडू नेपाळ चा नेपाळी होता. त्याला माणूस असे न म्हणता आपण सर्रास नेपलीच म्हणतो. त्याच्या हातचे उत्तम पोहे आणि मॅग्गी खाऊन तिथून निघालो. आजूबाजूला रिसॉर्ट्स तत्सम बरेच काही झाले आहे. गर्दी पण छान वाढली आहे. गडाच्या दिशेनं आम्ही निघालो. अगदी पायथ्याशी एक छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्या कडे उत्तम सोय आहे. खाली नाव व फोन नंबर आहेत फोटो मध्ये. तिथून मळलेल्या वाटेनी आम्ही वर चढायला सुरुवात केली. सर्वत्र हिरवेगार होते. घनदाट जंगलातून ही वाट एका धबधबा मार्गाशी संपते. जंगातून जातांना माकडांचे आवाज आणि इतर पक्षांची आरडा ओरड जणू काही कोणी शत्रू आले आहेत, अशा तारेने चालू होती. हे संगीत ऐकत ऐकत आम्ही पहिल्या टाक्याशी पोचलो. 

तिथून खडा चढ आहे. दगडांची वाट आहे जी माथ्यावर जाऊन पोचते. वर पोचल्यावर कळते की काही शे acres चा हा किल्ला आहे. थोडे थांबून पाणी पिऊन आम्ही किल्ला बघायला सुरु केले. भूषण फोटो काढण्यात मग्न होता. पिंटू त्याचा त्याचा चालत होता. एकाच दिशेने आम्ही वेगवेगळे चालत हरवलो होतो. गार वारा आणि कडक ऊन याच्या मध्ये आम्ही निवांत भटकत होतो. 

पहिल्या बुरुजावर जाऊन आम्ही आमची प्रदक्षिणा चालू केली. अनेक टाके, अनेक बुरुज, मारुती, तटबंदी, मोडके वाडे, पडलेल्या वास्तू आणि एक महादेवाचे मंदिर - बघायला ३ तास हुन अधिक गेले असतील. इतिहासात हरवून गेलो आम्ही. गोल चक्कर मारून मंदिराच्या मागे क्षण भर विश्रांती साठी बसलो. तिथे बसलो असतांना एक गावकरी आमच्या पाशी आला. साधारण ५'५" उंची, ढगाळ कपडे, एक बरणी आणि गळ्यात GPAY चा कोड हारासारखा घालून, म्हणाला मस्त लस्सी देतो. घरची आहे. मी त्याला म्हणालो भाऊ लस्सी नाकी, असेल तर ताक द्या. आलोच म्हणाला. तिथून पळ काढता काढता मला विचारले, आहेत ना इथेच. नाही, लस्सी वर लक्ष ठेवा ताक घेऊन आलोच. त्याला माझे नाव श्रीरंग आहे हे माहित नव्हते. :-) धावत जाऊन सुमारे १० मिनिटांनी तो परत एक बरणी घेऊन आला. आम्ही तिघांनी मनसोक्त ताक पियाले. तहान भागवून उरलेला किल्ला  बघायला निघालो. दुसरी वाट म्हणजे पाहिर्यांची वाट. तिथे खाली उतरून मारुतीचे दर्शन घेतले. आत साधारण ५० लोक सहज राहू शकतील अशा गुहा दिसल्या. त्याचे कौतुक करून आम्ही परत गडमाथा गाठला. आता मात्र उन्हाचा तडाखा जाणवत होता. ज्या वाटेनी वर आलो तीच वाट शोधत आम्ही परत खाली उतरायला सुरु केले. वाटेत बरीच लहान मोठी पोरं आमच्या आजूबाजूला होती. आमच्या गप्पा ऐकून त्यातील एक पोर विचकले - 'मोठे झालो की आपण पण अशेच बोलणार की काय' त्याच्या बरोबर चे engineering  ला असलेले बाकी मित्र हसले. अजून पण काही बोलले पण ते मी इथे नाही लिहू शकणार. त्याला म्हणालो बेट्या आमच्या वयाचे झालात की इथेपर्यन्त पोचा म्हणजे झाले. बडबड काही का कराल. हीच पोरं आणि पिंटू यांचा एक खाली उतरतांना किस्सा झाला. 

धबधबा वाट संपली आणि परत आम्ही जंगलात शिरलो. पोरं पुढे गेली होती. आम्ही खाली उतरत असतांना ती परत पळत वर येतांना दिसली. म्हणाली की तीन मोठे हुप्पे आहेत आणि ते आम्हाला खाली काही जाऊ देत नाहीत. मी पुढे गेलो आणि काठी वाजवत माकडा पाशी थबकलो. खरंच मोठी होती आणि भीतीदायक. पिंटू आणि बिडी ला म्हणालो की जवळ राहा आणि घोळक्याने पुढे चला. मी बजरंगबली चे नाव घेतले आणि पाठ दाखवून हळू हळू पुढे गेलो. तेव्हड्यात मागच्या एका मुलावर हुप्प्याची उडी मारली आणि बॅग घेण्याचा प्रयत्न केला. गडबड उडाली आणि एकत्र असलेली सर्व पांगलो. आम्ही पुढे गेलो आणि पिंटू मात्र मागे राहिले. मला आणि बिडी ला याचा अंदाज आला नाही. खाली पोचलो आणि सरबत पितो तर पिंटू चा फोन आला की वर या मला माकडांनी घेरले आहे. धावत परत वर गेलो तेव्हा एका कोपऱ्यात पिंटू, डावीकडे एक आणि उजवीकडे एक माकड आणि तिसरे त्याच्या सॅक मध्ये काय काय आहे याची तपासणी करत काही मिलत आहे का बघत होते. आम्हाला पाहून मात्र त्यांनी पळ काढला आणि पिंटू बचावला. त्याला घेऊन आम्ही खाली उतरलो. हे सर्व चालू असतांना उरलेले engineering पोरं घाबरून जंगलात पसार झाली होती. काहीशा वेळानी परतले. 

सरबत पिऊन आम्ही परत गाडी पाशी आलो. ट्रेक छान झाला. हा किल्ला इतका अशक्यच मोठा आहे, की नीट पाहायचाच असेल तर एक दिवस पण कमी पडेल. किल्ल्यावर बरीच वस्ती असेल असा अंदाज आहे. 

इतिहास 

विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते,
मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता.
४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. http://trekshitiz.com/marathi/Visapur-Trek-V-Alpha.html



































Tuesday, 9 May 2023

खांदेरी



खांदेरी 

ग्रुप वर सचिन चा मेसेज आला की शुक्रवार शनिवार कोणी खांदेरी ला येऊ इच्छित आहे का ? क्षण भर विचार करून आणि काही कामाच्या गोष्टी मार्गाला लावून मी त्याला होकार दिला. हा ग्रुप म्हणजे ट्रेककरी ग्रुप. नावच त्याचे ते. साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी मला या ग्रुप मध्ये प्रवेश मिळाला. सहज नाही हे बरका. परिमाण मोठे आहे. High Altitude ट्रेकिंग मध्ये eight  thousanders ला विशेष आदर असतो. ते आमच्या साठी एक आदर्श असतात. आणि त्यांचे कौतुक असते. ट्रेकिंग मध्ये त्यांनी केला काय आणि मी केला काय आनंद तोच असतो. इथे चढाओढ, राग, द्वेष आणि EGO ला कुठेच जागा नसते. एकमेकांना धरून आणि प्रोत्साहन देऊन पुढे कसे जाता येईल हेच बघायचे असते. आणि शेवटी त्या निसर्गानी जर का कृपा केली तर आपण शिखरावर पोचतो. त्याच्यामुळेच. तर या ग्रुप मध्ये असेच दिग्गज लोक आहेत. लपलेले तारे आमच्या ट्रेकिंग चे. सर्वांना एकत्र केले तर साधारण १००० वर्षांचा अनुभव सहज गोळा होईल. हे सर्व Three Hundreders आहेत असे मी म्हणतो. त्यांना त्याचे काही फार नाही. Three hundreders म्हणजे काय ? यातील बरेच लोकांचे ३०० हुन अधिक किल्ले झाले आहेत. काही लोकांचे काही किल्ले दोन वेळा पण झाले आहेत. 

तुम्हाला माहिती होते का, की आपल्या महाराष्ट्रात ३०० हुन अधिक किल्ले आहेत ? अहो ३५० किल्ले आहेत. नुसते किल्ले हिंडणारी जनता नाही ही. चालते बोलते encyclopedia आहेत. किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधणी, झालेल्या लढाया, असलेली देऊळं आणि त्याचे महत्व. सर्व काही माहिती - त्या मध्ये सर्वात तज्ज्ञ आणि महितगार म्हणजे Dr. सचिन विद्याधर जोशी. डेक्कन कॉलेज - Post  Graduate and  Research Institute, मध्ये Archaeology डिपार्टमेंट मध्ये researcher आहे. अशक्य knowledge नी भरलेला हा माणूस आहे. सचिन नी पुस्तकं पण लिहिली आहेत, दुर्गवैभव, दुर्गा जिज्ञासा, दुर्गवेध. जमले तर नक्की वाचा. याच्या बरोबर ट्रेक ला जायचे म्हणजे एक वेगळेच सुख असते. दगडा दगडाची माहिती असलेला हा माणूस  "पुराव्यांनी शाबीत करिन" सारखा आहे. पण खरंच कुठलेली वाक्य पण संधर्भ न देता बोलत नाही. कधी कधी आमच्या भावनेंना टोचून पण जातो. कारण एकच - त्याचे अजून पुरावे मिळाले नाही - असे त्याचे म्हणणे असते. हेवा वाटतो त्याचा मला, त्याची passion बघून आणि त्याचे dedication पाहून. 

तर त्याच्या ग्रुप वर message आला आणि इथून २ गाड्या निघाल्या. वाघ्या उर्फ ऋषिकेश वाघ another ३०० + माणूस माझा कडे ६ ला पोचला. इथून मी भूषण केतकी आणि दोन ऋषिकेश अलिबाग च्या दिशेनी निघालो. वाटे मध्ये अजिंक्य भावे, राहुल घोलप, शशी, संतोष आणि काका असे पाच जण भेटले आणि आम्ही निघालो. वाटे मध्ये जातांना दोन ऋषिकेश एकाच कंपनी साठी पूर्वी काम करत होते असे कळले. त्यांची ओळख आणि इतर लोकांची ओळख झाली आणि गप्पा रंगायला सुरुवात झाली. या गप्पा रेकॉर्ड केल्या तर एखादा ग्रंथ बनेल. अर्थात त्यातील निरर्थक गोष्टी काढल्या तर त्याचा पण best seller बानू शकेल आज काल च्या self help आणि motivational पुस्तकांच्या दुनियेत. आमच्या साठी हेच ते जे काही आहे ते. Stress घालवण्याचे साधन, आला तर. आमच्या गप्पांचे रस्ते शिवकालीन घोडे मार्गांपाससून ते आत्ताच्या उभारलेल्या खरकट्या रस्त्यान पर्यन्त literally वळत होते. ब्रेकफास्ट झाला वडखळ नाक्या जवळ आणि आम्ही मांडवाच्या दिशेनी गेलो. वाटेत पेणच्या बाप्पाचे दर्शन घेतले. काही वर्षांपूर्वी मी आणि पप्या ( पुरुजीत) पुणे अलिबाग असे सायकल वर आलो होतो. तेव्हा आठवते मला की या मंदिरामध्ये काही काळ विसावले होतो. छोटेसे पण सुंदर मंदिर आहे. अर्थात गणू ची सर्वच मंदिरे भारीच असतात. 









पाडव्याला पोचल्यावर बरेच वेळा अग्निपथ चा dialogue झाला - ' हवा तेज चलती है दिनकर राव, टोपी सांभाळो नाही तो उड जायेगी'. आमच्या साठी बोट वाट पाहत उभी होती. ३ दिवस सुट्टी असल्यानी रस्त्यावर गर्दी होती. 

सर्वांनी आपापल्या सॅक बोटीवर चढवून प्रस्थान केले. लांबवर Bombay High आणि त्याच्या मागे मुंबई ची सुंदर Skyline दृष्टीस पडत होती. स्पीड बोट मध्ये उड्या मारत कसे बसे मोबाइल मधून फोटो काढत आम्ही गोल चक्कर मारून खांदेरी च्या दिशेनी जायला लागलो. खांदेरी समोर आणि त्याच्या डाव्या हाताला उंदेरी असे दोन बेटांवर दोन किल्ले दृष्टीस पडले. लांबवरून दोन गोष्टी चुकू शकत नाही - एक म्हणजे Light House  आणि दुसरे म्हणजे २६/११ नंतर बांधलेले अत्याधुनिक रडार. बोट खांदेरी ला टेकली आणि तिथे इतर कोळी लोकांनी दोर ओढून बोटीला बोट लावली. एका वरून दुसऱ्या बोटीवर उड्या मारत आम्ही खांदेरीवर पाऊल ठेवले. सर्व सामान काढून आम्ही निघालो. सचिन  आणि अजून काही मंडळी आधीच तिथे पोचले होते. त्यात संदीप परांजपे नावाचा एक गृहस्थ भेटला. तो माझा आधीच्या परिचयाचा होता. एकंदरीत आम्ही १४ लोक तिथे पोचलो होतो. 

किल्ल्या वर जातांना उजवीकडे काही ख्रिती कोळी लोक नव्या क्रॉस ची बांधणी करतांना दिसले. इथे तुम्हाला मंदिर, चर्च तत्सम, बुद्ध मूर्ती आणि एक कबर असे सर्व बघायला मिळते. सर्व धर्म समभाव असा हा किल्ला आहे. 

ऊन बरेच होते आणि आम्ही वर Light House  च्या परिसरात सुखावलो. सचिन नी जेवायची सोया केली होती. थोडे निवांत बसून गप्पा झाल्या. त्यानी सांगितले की जेवण उरकून थोडा वेळ विश्रांती घेऊन किल्ला बघायला सुरु करू. खांदेरी एक बेट आहे. २१ बुरुजांनी त्याला सर्व बाजूनी सौरक्षण दिले आहे. किल्ल्याची तटबंदी अजून शाबूत आहे. थोडीशी विश्रांती झाली आणि आम्ही एक दगड बघायला गेलो. त्या दगडावर अजून एका दगडानी मारल्यास धातू वर जसा आवाज येईल तास आवाज येतो. काही तरी नवीन.












आत्ता पर्यन्त पाहिलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात घाण केलेला किल्ला म्हणून याचा नंबर १ आहे. असंख्य दारूच्या बाटल्या आणि इतर घाण यांनी कोपरा ना कोपरा व्यापलेला होता. जिथे दगड दिसेल तिथे लोकांनी आपली नावे लिहिली होती. कदाचित या नावाचे मूर्ख इथे येऊन गेले हे त्यांना लोकांना सांगायचे असावे. बघून खरंच राग येतो आणि हताश होतो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. असो. 

दगड बघून आम्ही sea peer वर गेलो. तिथून किल्ल्याची तटबंदी खूपच भारी दिसत होती. वाऱ्यात गप्पा मारून आम्ही वेताळ बाबा चे दर्शन घेण्यासाठी पोचलो. काय काय अजब प्रथा असतात. इथली म्हणजे सर्व कोळी लोक Swordfish ची sword इथल्या वेताळाला अर्पण करतात. वर्षातून एक उत्सव असतो तेव्हा हा कार्यक्रम होतो. त्यावर लोकांनी आपली नवे लिहून तिथे ठेवल्या होत्या. 

चार पाच टाके आणि सर्व बुरुज बघत आम्ही खांदेरी प्रदक्षिणा मारली. काही बुरुजांवर अजूनही चाकं असलेल्या तोफा आहेत. जबरदस्त आहेत. यांच्या बद्दल तिथेच बसून सचिन नी खूप माहिती दिली. तोफ या बद्दल आपण त्याच्या कडून ऐकूच. 


सर्व किल्ला फिरून आम्ही Light House बघण्यासाठी पोचलो. १८६७ साली एका इटालियन कंपनी नी बांधलेले Light House आहे. अजूनही उभे आहे. अर्थातच तेव्हा लाच, पैसे खाणे, undertable वगरे काही नसल्यानी अजूनही कडक उभे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे Mechanical construction हे इतके अशक्य आहे की काही विचारू नका. ४ th second आणि ६ th second ला दिवा, गोल फिरतांना एका पॉईंट ला दिसतो. त्यावरून हे कुठले Light House आहे हे बोटींना कळते. आम्ही चप्पल बूट काढून light house बघण्यासाठी प्रवेश केला. वर गेल्यावर संपूर्ण किल्ल्याचे दर्शन होते. हे दृश्य आयुष्यात मी पहिल्यांदा पहिले. सर्व बाजूनी लाटा आदळतांना दिसतात. लांब लांब वर क्षितिजावर बोटी तरंगतांना दिसतात. इथून सचिन नी आम्हाला आजूबाजूला असणारे किल्ले दाखवले. उंदेरी, सागरगड, कुणकेश्वर मंदिर आणि काय काय. थोडा वेळ तिथे थांबून दुर्बिणीतून काही दिसते का पाहून आम्ही खाली उतरलो. 

सूर्यास्त जवळ येऊ लागला होता. Navy चे हेलिकॉप्टर उतरायला छोटीशी जागा केली आहे. तिथे सर्व जाऊन बसलो. पिंटू आणि बिडी काही अंतरावर एका बुरुजावर जाऊन टेकले. २० मिनिटे शांतपणे त्या, न टोपीवाल्या दिनकरावांना झोपी जातांना पहिले. अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त. चला दिवस मावळला. 

















दुसरीकडे ते ख्रिस्ती कोळी तो त्यांचा क्रॉस वर चढवून बसवण्यात व्यस्त होते. दिवस भर काम करून त्यांनी तो क्रॉस उभा केला आणि मग जल्लोष चालू झाला. खालच्या एका बांधलेल्या शेड मध्ये काही काळातच गाणी चालू झाली. सध्या ती गाणी Live नव्हती. मला वाटतं  जशी जशी त्यांची बोट हवेत उडायला लागली तशी तशी कोळी मंडळी नाचायला लागली आणि काही काळात Live Band नी जोरदार असा परफॉर्मन्स चालू केला. फुल कोळी गीते. धम्माल चालू होती आणि आम्ही लांबवरून ते सर्व ऐकत गप्पा मारत होतो. सचिन नी या किल्ल्याचा इतिहास सांगितला  आणि बरेच काही अजून उलगडे केले. आपण त्याच्या बरोबर गप्पा मारू तेव्हा तो सांगेलच सर्व. तिथून निघून आम्ही परत मांडव्याला आलो आणि तिथेच मुक्कामी राहिलो. रात्री लोक काही टेन्ट मध्ये तर काही चक्क  लांबलचक पुलावर - Peer वर वाऱ्यात आणि चंद्राच्या लक्ख प्रकाशात कधीच घोरायला लागली होते. 

सकाळी उठून समुद्र काठी बर्फाचा गोळा खाणे झाले. शहाळी आणि ताडगोळे झाले. परत येतांना संदीप आमच्या गाडीत होता. या माणसानी अनेक किल्ले केले आहेतच पण त्याच बरोबर अनेक सुळक्यावर क्लाइंबिंग केले आहे. Rescue mission मध्ये भाग घेतला आहे. येतांना त्याचे किस्से आणि अनुभव ऐकत ४ तास कसे गेले याचे भानच उरले नाही. तसे झाले नसते तर मी तर अशक्य बोर झालो असतो गाडी चालवून. Long Weekend ची गर्दी काही केल्या संपत नव्हती. १ मे ची सुट्टी होती त्यामुळे अलिबाग कडे येणाऱ्या हजारो गाड्यांनी रस्ता भरलेला होता. हटके ट्रेक / ट्रिप झाली होती. 

खांदेरीतून निघालो तेव्हा,आम्ही इथे आलो होतो, याची तिळमात्र खूण न सोडता सुखरूप पुण्य नगरीत परत आलो. 












महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...