Tuesday, 9 May 2023

खांदेरी



खांदेरी 

ग्रुप वर सचिन चा मेसेज आला की शुक्रवार शनिवार कोणी खांदेरी ला येऊ इच्छित आहे का ? क्षण भर विचार करून आणि काही कामाच्या गोष्टी मार्गाला लावून मी त्याला होकार दिला. हा ग्रुप म्हणजे ट्रेककरी ग्रुप. नावच त्याचे ते. साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी मला या ग्रुप मध्ये प्रवेश मिळाला. सहज नाही हे बरका. परिमाण मोठे आहे. High Altitude ट्रेकिंग मध्ये eight  thousanders ला विशेष आदर असतो. ते आमच्या साठी एक आदर्श असतात. आणि त्यांचे कौतुक असते. ट्रेकिंग मध्ये त्यांनी केला काय आणि मी केला काय आनंद तोच असतो. इथे चढाओढ, राग, द्वेष आणि EGO ला कुठेच जागा नसते. एकमेकांना धरून आणि प्रोत्साहन देऊन पुढे कसे जाता येईल हेच बघायचे असते. आणि शेवटी त्या निसर्गानी जर का कृपा केली तर आपण शिखरावर पोचतो. त्याच्यामुळेच. तर या ग्रुप मध्ये असेच दिग्गज लोक आहेत. लपलेले तारे आमच्या ट्रेकिंग चे. सर्वांना एकत्र केले तर साधारण १००० वर्षांचा अनुभव सहज गोळा होईल. हे सर्व Three Hundreders आहेत असे मी म्हणतो. त्यांना त्याचे काही फार नाही. Three hundreders म्हणजे काय ? यातील बरेच लोकांचे ३०० हुन अधिक किल्ले झाले आहेत. काही लोकांचे काही किल्ले दोन वेळा पण झाले आहेत. 

तुम्हाला माहिती होते का, की आपल्या महाराष्ट्रात ३०० हुन अधिक किल्ले आहेत ? अहो ३५० किल्ले आहेत. नुसते किल्ले हिंडणारी जनता नाही ही. चालते बोलते encyclopedia आहेत. किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधणी, झालेल्या लढाया, असलेली देऊळं आणि त्याचे महत्व. सर्व काही माहिती - त्या मध्ये सर्वात तज्ज्ञ आणि महितगार म्हणजे Dr. सचिन विद्याधर जोशी. डेक्कन कॉलेज - Post  Graduate and  Research Institute, मध्ये Archaeology डिपार्टमेंट मध्ये researcher आहे. अशक्य knowledge नी भरलेला हा माणूस आहे. सचिन नी पुस्तकं पण लिहिली आहेत, दुर्गवैभव, दुर्गा जिज्ञासा, दुर्गवेध. जमले तर नक्की वाचा. याच्या बरोबर ट्रेक ला जायचे म्हणजे एक वेगळेच सुख असते. दगडा दगडाची माहिती असलेला हा माणूस  "पुराव्यांनी शाबीत करिन" सारखा आहे. पण खरंच कुठलेली वाक्य पण संधर्भ न देता बोलत नाही. कधी कधी आमच्या भावनेंना टोचून पण जातो. कारण एकच - त्याचे अजून पुरावे मिळाले नाही - असे त्याचे म्हणणे असते. हेवा वाटतो त्याचा मला, त्याची passion बघून आणि त्याचे dedication पाहून. 

तर त्याच्या ग्रुप वर message आला आणि इथून २ गाड्या निघाल्या. वाघ्या उर्फ ऋषिकेश वाघ another ३०० + माणूस माझा कडे ६ ला पोचला. इथून मी भूषण केतकी आणि दोन ऋषिकेश अलिबाग च्या दिशेनी निघालो. वाटे मध्ये अजिंक्य भावे, राहुल घोलप, शशी, संतोष आणि काका असे पाच जण भेटले आणि आम्ही निघालो. वाटे मध्ये जातांना दोन ऋषिकेश एकाच कंपनी साठी पूर्वी काम करत होते असे कळले. त्यांची ओळख आणि इतर लोकांची ओळख झाली आणि गप्पा रंगायला सुरुवात झाली. या गप्पा रेकॉर्ड केल्या तर एखादा ग्रंथ बनेल. अर्थात त्यातील निरर्थक गोष्टी काढल्या तर त्याचा पण best seller बानू शकेल आज काल च्या self help आणि motivational पुस्तकांच्या दुनियेत. आमच्या साठी हेच ते जे काही आहे ते. Stress घालवण्याचे साधन, आला तर. आमच्या गप्पांचे रस्ते शिवकालीन घोडे मार्गांपाससून ते आत्ताच्या उभारलेल्या खरकट्या रस्त्यान पर्यन्त literally वळत होते. ब्रेकफास्ट झाला वडखळ नाक्या जवळ आणि आम्ही मांडवाच्या दिशेनी गेलो. वाटेत पेणच्या बाप्पाचे दर्शन घेतले. काही वर्षांपूर्वी मी आणि पप्या ( पुरुजीत) पुणे अलिबाग असे सायकल वर आलो होतो. तेव्हा आठवते मला की या मंदिरामध्ये काही काळ विसावले होतो. छोटेसे पण सुंदर मंदिर आहे. अर्थात गणू ची सर्वच मंदिरे भारीच असतात. 









पाडव्याला पोचल्यावर बरेच वेळा अग्निपथ चा dialogue झाला - ' हवा तेज चलती है दिनकर राव, टोपी सांभाळो नाही तो उड जायेगी'. आमच्या साठी बोट वाट पाहत उभी होती. ३ दिवस सुट्टी असल्यानी रस्त्यावर गर्दी होती. 

सर्वांनी आपापल्या सॅक बोटीवर चढवून प्रस्थान केले. लांबवर Bombay High आणि त्याच्या मागे मुंबई ची सुंदर Skyline दृष्टीस पडत होती. स्पीड बोट मध्ये उड्या मारत कसे बसे मोबाइल मधून फोटो काढत आम्ही गोल चक्कर मारून खांदेरी च्या दिशेनी जायला लागलो. खांदेरी समोर आणि त्याच्या डाव्या हाताला उंदेरी असे दोन बेटांवर दोन किल्ले दृष्टीस पडले. लांबवरून दोन गोष्टी चुकू शकत नाही - एक म्हणजे Light House  आणि दुसरे म्हणजे २६/११ नंतर बांधलेले अत्याधुनिक रडार. बोट खांदेरी ला टेकली आणि तिथे इतर कोळी लोकांनी दोर ओढून बोटीला बोट लावली. एका वरून दुसऱ्या बोटीवर उड्या मारत आम्ही खांदेरीवर पाऊल ठेवले. सर्व सामान काढून आम्ही निघालो. सचिन  आणि अजून काही मंडळी आधीच तिथे पोचले होते. त्यात संदीप परांजपे नावाचा एक गृहस्थ भेटला. तो माझा आधीच्या परिचयाचा होता. एकंदरीत आम्ही १४ लोक तिथे पोचलो होतो. 

किल्ल्या वर जातांना उजवीकडे काही ख्रिती कोळी लोक नव्या क्रॉस ची बांधणी करतांना दिसले. इथे तुम्हाला मंदिर, चर्च तत्सम, बुद्ध मूर्ती आणि एक कबर असे सर्व बघायला मिळते. सर्व धर्म समभाव असा हा किल्ला आहे. 

ऊन बरेच होते आणि आम्ही वर Light House  च्या परिसरात सुखावलो. सचिन नी जेवायची सोया केली होती. थोडे निवांत बसून गप्पा झाल्या. त्यानी सांगितले की जेवण उरकून थोडा वेळ विश्रांती घेऊन किल्ला बघायला सुरु करू. खांदेरी एक बेट आहे. २१ बुरुजांनी त्याला सर्व बाजूनी सौरक्षण दिले आहे. किल्ल्याची तटबंदी अजून शाबूत आहे. थोडीशी विश्रांती झाली आणि आम्ही एक दगड बघायला गेलो. त्या दगडावर अजून एका दगडानी मारल्यास धातू वर जसा आवाज येईल तास आवाज येतो. काही तरी नवीन.












आत्ता पर्यन्त पाहिलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात घाण केलेला किल्ला म्हणून याचा नंबर १ आहे. असंख्य दारूच्या बाटल्या आणि इतर घाण यांनी कोपरा ना कोपरा व्यापलेला होता. जिथे दगड दिसेल तिथे लोकांनी आपली नावे लिहिली होती. कदाचित या नावाचे मूर्ख इथे येऊन गेले हे त्यांना लोकांना सांगायचे असावे. बघून खरंच राग येतो आणि हताश होतो. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. असो. 

दगड बघून आम्ही sea peer वर गेलो. तिथून किल्ल्याची तटबंदी खूपच भारी दिसत होती. वाऱ्यात गप्पा मारून आम्ही वेताळ बाबा चे दर्शन घेण्यासाठी पोचलो. काय काय अजब प्रथा असतात. इथली म्हणजे सर्व कोळी लोक Swordfish ची sword इथल्या वेताळाला अर्पण करतात. वर्षातून एक उत्सव असतो तेव्हा हा कार्यक्रम होतो. त्यावर लोकांनी आपली नवे लिहून तिथे ठेवल्या होत्या. 

चार पाच टाके आणि सर्व बुरुज बघत आम्ही खांदेरी प्रदक्षिणा मारली. काही बुरुजांवर अजूनही चाकं असलेल्या तोफा आहेत. जबरदस्त आहेत. यांच्या बद्दल तिथेच बसून सचिन नी खूप माहिती दिली. तोफ या बद्दल आपण त्याच्या कडून ऐकूच. 


सर्व किल्ला फिरून आम्ही Light House बघण्यासाठी पोचलो. १८६७ साली एका इटालियन कंपनी नी बांधलेले Light House आहे. अजूनही उभे आहे. अर्थातच तेव्हा लाच, पैसे खाणे, undertable वगरे काही नसल्यानी अजूनही कडक उभे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे Mechanical construction हे इतके अशक्य आहे की काही विचारू नका. ४ th second आणि ६ th second ला दिवा, गोल फिरतांना एका पॉईंट ला दिसतो. त्यावरून हे कुठले Light House आहे हे बोटींना कळते. आम्ही चप्पल बूट काढून light house बघण्यासाठी प्रवेश केला. वर गेल्यावर संपूर्ण किल्ल्याचे दर्शन होते. हे दृश्य आयुष्यात मी पहिल्यांदा पहिले. सर्व बाजूनी लाटा आदळतांना दिसतात. लांब लांब वर क्षितिजावर बोटी तरंगतांना दिसतात. इथून सचिन नी आम्हाला आजूबाजूला असणारे किल्ले दाखवले. उंदेरी, सागरगड, कुणकेश्वर मंदिर आणि काय काय. थोडा वेळ तिथे थांबून दुर्बिणीतून काही दिसते का पाहून आम्ही खाली उतरलो. 

सूर्यास्त जवळ येऊ लागला होता. Navy चे हेलिकॉप्टर उतरायला छोटीशी जागा केली आहे. तिथे सर्व जाऊन बसलो. पिंटू आणि बिडी काही अंतरावर एका बुरुजावर जाऊन टेकले. २० मिनिटे शांतपणे त्या, न टोपीवाल्या दिनकरावांना झोपी जातांना पहिले. अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त. चला दिवस मावळला. 

















दुसरीकडे ते ख्रिस्ती कोळी तो त्यांचा क्रॉस वर चढवून बसवण्यात व्यस्त होते. दिवस भर काम करून त्यांनी तो क्रॉस उभा केला आणि मग जल्लोष चालू झाला. खालच्या एका बांधलेल्या शेड मध्ये काही काळातच गाणी चालू झाली. सध्या ती गाणी Live नव्हती. मला वाटतं  जशी जशी त्यांची बोट हवेत उडायला लागली तशी तशी कोळी मंडळी नाचायला लागली आणि काही काळात Live Band नी जोरदार असा परफॉर्मन्स चालू केला. फुल कोळी गीते. धम्माल चालू होती आणि आम्ही लांबवरून ते सर्व ऐकत गप्पा मारत होतो. सचिन नी या किल्ल्याचा इतिहास सांगितला  आणि बरेच काही अजून उलगडे केले. आपण त्याच्या बरोबर गप्पा मारू तेव्हा तो सांगेलच सर्व. तिथून निघून आम्ही परत मांडव्याला आलो आणि तिथेच मुक्कामी राहिलो. रात्री लोक काही टेन्ट मध्ये तर काही चक्क  लांबलचक पुलावर - Peer वर वाऱ्यात आणि चंद्राच्या लक्ख प्रकाशात कधीच घोरायला लागली होते. 

सकाळी उठून समुद्र काठी बर्फाचा गोळा खाणे झाले. शहाळी आणि ताडगोळे झाले. परत येतांना संदीप आमच्या गाडीत होता. या माणसानी अनेक किल्ले केले आहेतच पण त्याच बरोबर अनेक सुळक्यावर क्लाइंबिंग केले आहे. Rescue mission मध्ये भाग घेतला आहे. येतांना त्याचे किस्से आणि अनुभव ऐकत ४ तास कसे गेले याचे भानच उरले नाही. तसे झाले नसते तर मी तर अशक्य बोर झालो असतो गाडी चालवून. Long Weekend ची गर्दी काही केल्या संपत नव्हती. १ मे ची सुट्टी होती त्यामुळे अलिबाग कडे येणाऱ्या हजारो गाड्यांनी रस्ता भरलेला होता. हटके ट्रेक / ट्रिप झाली होती. 

खांदेरीतून निघालो तेव्हा,आम्ही इथे आलो होतो, याची तिळमात्र खूण न सोडता सुखरूप पुण्य नगरीत परत आलो. 












No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...