Monday, 25 June 2018

पेब चा किल्ला / विकटगड - नभ मेघांनीं आक्रमिलें


पेब चा किल्ला / विकटगड
नभ मेघांनीं आक्रमिलें । तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥

उन्हाने तापलेली, करपलेली आणि वाळून सुकून उभी असलेली झाडं,जेव्हा खुद कन हसतात, वर पाहून मेघांना धन्यवाद देतात तो पण क्षण अनुभवायला एक वेळ असते. हिच ती. नेरळ माथेरान मार्गानी, त्या छोट्या रेल्वे रुळावरून चालत एका खिंडीत पोचता, त्याच खिंडी पलीकडे विकटगडाचे उजवीकडे दर्शन होते. ढगात लपलेला एक निसर्ग रम्य किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई पुण्याचे हौशी कलाकार इथे खूप बघायला मिळतात. ट्रेक व ट्रिप या दोन्ही गोष्टी साध्य होतात. मस्त पाऊसात भिजायची मजा लुटता येते. तरुण मुलं मुलींचा सुळसुळाट असतो. त्यामुळे आमच्यातल्या काही तरुणांना " काका जपून उतरा, काका मला आधी वर येऊ द्या म्हणजे तुम्हाला जागा होईल" वगरे सूचना ऐकायला लागल्या. त्यावरून पुढे त्या आमच्या मधल्या काकाचे काय झाले असेल याची कल्पना करू शकाल. :-) या वेळी पण ७ जणं जमलो आणि गेलो. या किल्ल्यावर जाण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत. माथेरान, पेब गाव etc. साधारण इथून १ ते १. १५ तास लागला गडावर पोचायला. सकाळी गर्दी कमी होती. पण परत येत असतांना खूप गर्दी झाली होती.

रुळावरून चालत चालत आपापल्या विचारांच्या दुनियेत हरवून आम्ही सर्व धुक्यात नाहीशे झालो. मधूनच जाग येत होती तेव्हा आवाज देऊन कुठे कोण ते कळत होत. निसर्गात गेलात की शक्ती चा अनुभव येतो, काही लोक त्याला देवाचा किंवा अध्यात्मिक किंवा इतर काही म्हणत असतात. मला तर, मी शोधण्यातच आयुष्य जाणार दिसतंय, काय आहे, कोण आहे, काय करायचं आणि काय नाही. विचारांची ओझी आणि काहीसं  Guilt घेऊन थोडा वेळ जातो. पण ते विचार नाहीसे होतात त्या धुक्यासारखेच, एका सूर्यकिरणानी. मग खरं मंथन चालू होते. आणि त्यामध्ये काही क्षण रमायला, इथे यायचे. Sorry जरा जास्तच मनातलं लिहितोय आणि ते सुद्धा काही तरी कवितात्मक. घ्या गोड मानून नाही तर द्या सोडून आपला मराठी माणूस आहे असे म्हणून. उपेंद्र महादेव भक्त आहे आणि त्यामुळे तो तेच ऐकत प्रवास करत असतो. त्यामध्ये तो विलीन झाला असतो. चेतन सुंदर फोटो काढण्यात आणि निसर्गाचं कौतुक करून त्यात निवांत असतो. भूषण आपल्या वेगळ्याच जगात, कदाचित महाराजांच्या काळात गेलेला असतो - तो वर्तमानात नसतोच. एकतर भूतं नाही तर भविष्यात रमलेला असतो. पिंटू आमचा स्वछंदी आहे. एकतर घाबरलेला असतो नाही तर खोड्या काढत लहानमुले करतात तसा सैर वैर करत असतो. शांत नक्कीच नाही. 'पपा - ट्रेक नाव - पुरुजीत पूर्ण वेळ, कामाचे विचार, वकिली, चूक बरोबर, आणि लोकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा, कटकटी, आणि भांडणं ऐकण्यात आणि मग सोडवण्यात घालवतो. मधूनच भयंकर आवाज काढून आणि तेच तेच बोलून त्रास देतो. आयुष्यभर चहाच्या तहानेने बुडलेला पण ट्रेकिंग मध्ये मुरलेला खेळाडू आहे. तो असला की मला कुठलीही चिंता नसते. काळजी नसते. शिरीष त्याच्याच विश्वात असतो, कारण त्याला आमच्या विश्वाशी काहीच घेणे देणे नसते. तो ट्रेक साठी येतो आणि ट्रेक करून जातो. मी याला 'break from the routine' वगरे काही म्हणून त्याचे महत्व घालवणार नाही. आमच्यासाठी हेच आहे, आणि हीच आवड आहे. बाकी प्रपंच आहे म्हणून नाही तर सर्व जण असेच कुठे ना कुठे तरी भटकंती करत आयुष्य जगलो  असतो, त्यात आयुष्य केलं असतं . नित्या जोशी सारखं, नाही तर अजून काही आमच्या मित्रांसारखे. असो. अजून वेळ गेली नाही.

इतिहास :

या किल्ल्याचे मूळ नाव "पेब" हे नाव पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. ref - trekshitiz





तर रुळावरील प्रवास.










खिंडीतून पुढे येऊन उजवीकडे किल्ला आहे. रुळावरून तसेच पुढे जावे. गणपती मंदिराची छोटी कमान आहे. तिथून रस्ता गडावर जायला उतरतो.









छोटे गणपती मंदिर.








पहिली शिडी












वरून दिसणारा कड्यावरचा बाप्पा





प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, चंदेरी ताहुली डोंगररांगा दिसू शकतात








पहिला दरवाजा म्हणा याला.








दुसऱ्या शिड्या. या आहेत म्हणून वर जाणं सोपं झाला आहे.








बुरुज अजून शाबूत आहेत.












दत्ता मंदिराकडे जाण्याचा रस्ता
















पादुका












शिव मंदिर



















विकटगडाचा विस्तार तसा मोठा आहे आणि पूर्ण गड पहिला २ तास सहज जातील. गुहे च्या वाटेनी आम्ही आलो नाही पण तरी खाली उतरून गुहेचं दर्शन घेतलं. वर येणारी गर्दी बघता आम्ही तिथून पळ काढायचं ठरवलं. दत्ता मंदिराकडून खाली उतरून गडाला चक्कर मारून परत मठापाशी आलो. तिथे येऊन बघतो तर जत्रा भरली होती.


खूप लोकं अली होती. बिडी  मारत काही तर काही आपापल्या girlfriend बरोबर कोपऱ्यात / बुरुजावर ashique करत होते. काही वेडेचाळे नव्हते करत. मजा लुटत होते त्या वातावरणात. एकंदरीत आनंदी दृश्य होतं. बुरुजावर श्री छत्रपती शिवाजी महाराज घोषणा झाली आणि आम्ही निघालो.














Monday, 18 June 2018

वसंतगड - सदाशिवगड

वसंतगड सदाशिवगड



मित्र म्हणाले की भांडण आलंच. हे ट्रेकिंग चालू केल्या पासून बरेच  अनुभव आले. जसा जसा ग्रुप वाढत जात आहे तसे तसे बरेच काही किस्से घडत आहेत. त्यात काही विशेष नाही पण असच मनात आलं  म्हणून लिहीत आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. कुठे जायचं  पासून ते कसे पोचायचे पर्यन्त कल्ला  चालू असतो. माझा स्वभाव काही लोकांना आवडत नाही. काय आवडत नाही ते काही मला नीट  सांगितलं नाही पण एकंदरीत असे झाले आहे. त्यात आता Goechala  ची तयारी चालू केली आहे. आत्ता  तरी सर्व गॅंग येणार असे आहे. पुढे काय होता ते कळेलच. पण स्वभावाला औषध नाही. त्यामुळे मला असे वाटतं कि मित्रांमध्ये एकमेका विषयी जर का काही तक्रारी असतील तर त्या लगेच बोलून मिटवून टाकाव्यात. एकदा मित्र म्हणाल म्हणजे चांगले वाईट सर्व आलेच त्या बरोबर. जसे आहे तसे.
वसंतगड सदाशिवगड आणि दातेगड जायचं  ठरलं . पावसाळा छान चालू झाला होता. अर्थात नावाला. हवा तसा पाऊस नव्हता. वसंतगड हा किल्ला कराड च्या  जवळ आहे. तळबीड नावाचा गाव आहे खाली. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या  समाधी मुले प्रसिध्द आहे. एक रस्ता तिथून गडावर जातो. आम्ही वसंतगड गावाच्या रस्त्यानी गेलो. वाट पूर्णपणे मळलेली आहे. किल्ला खूप मोठा आहे फिरायला . बघायला पण खूप काही आहे.
यावेळी पण ७ जण  होतॊ. ७ मित्र आणि त्याबरोबर सर्व हेवेदावे आणि इतर गर्दी. येतांना असते आणि जातांना काही तरी नवीन बरोबर घेऊन जातात. खूप आठवणी. या वेळी माझं  कारण काही तरी वेगळच होतं . मी एकटा होतो. खूप विचार चालू होते आणि मला शांतपणे मार्ग शोधायचा होता. ट्रेक चा नाही. त्यामध्ये मी खूप गुंतलो होतो. नाही मिळला नीटसा मार्ग. भारतात आलो तेव्हा एक बावळट माणूस, नोकरदार वर्गातील एक प्रामाणिक माणूस म्हणून आलो होतो. पण परिस्थिती आणि इथल्या पद्धतीमुळे पूर्ण मेलो. अर्थात हे पण खोटं आहे. पण दोष तर द्यायला हवा ना कुणाला तरी.
असो.
इथून काही अंतरावर सदाशिवगड आहे. साधारण १००० पाहिऱ्या आहेत. वर एक महादेवाचं मंदिर आहे. बाकी विशेष काही नाही.
वसंतगड इतिहास :
या किल्ल्याची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ठेवले ‘किली द फतेह’ म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. नंतर १७०६ मध्ये मराठ्यांनी परत हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
तर, वसंतगड गावातून वर जायला ४५ मिन खूप झाली. जातांना घळीमधला एक देव आहे. छोटेसे मंदिर आहे.


घळीमधले मंदिर 

वर पोचल्यावर एक सुंदर बाप्पाच मंदिर आहे. या गडाचं  महत्व काही वेगळा असावं . इथे तशी बाया माणसांची गर्दी होती. वर एक मंदिर आहे. तिथे कदाचित नवस वगरे बोलायला लोक येत असावीत. पूजा अर्चा चालू होत्या. गडाची तटबंदी खूप शिल्लक आहे. खूप मोठा विस्तार आहे आणि इथे राहायला यायला नक्कीच आवडेल. 




दरवाजा 


वर गेल्यावर डावीकडे मारुती आहे 





दुसरा दरवाजा - हा प्रमुख दरवाजा असावा 













सदाशिवगड 








महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...