Monday, 18 June 2018

वसंतगड - सदाशिवगड

वसंतगड सदाशिवगड



मित्र म्हणाले की भांडण आलंच. हे ट्रेकिंग चालू केल्या पासून बरेच  अनुभव आले. जसा जसा ग्रुप वाढत जात आहे तसे तसे बरेच काही किस्से घडत आहेत. त्यात काही विशेष नाही पण असच मनात आलं  म्हणून लिहीत आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. कुठे जायचं  पासून ते कसे पोचायचे पर्यन्त कल्ला  चालू असतो. माझा स्वभाव काही लोकांना आवडत नाही. काय आवडत नाही ते काही मला नीट  सांगितलं नाही पण एकंदरीत असे झाले आहे. त्यात आता Goechala  ची तयारी चालू केली आहे. आत्ता  तरी सर्व गॅंग येणार असे आहे. पुढे काय होता ते कळेलच. पण स्वभावाला औषध नाही. त्यामुळे मला असे वाटतं कि मित्रांमध्ये एकमेका विषयी जर का काही तक्रारी असतील तर त्या लगेच बोलून मिटवून टाकाव्यात. एकदा मित्र म्हणाल म्हणजे चांगले वाईट सर्व आलेच त्या बरोबर. जसे आहे तसे.
वसंतगड सदाशिवगड आणि दातेगड जायचं  ठरलं . पावसाळा छान चालू झाला होता. अर्थात नावाला. हवा तसा पाऊस नव्हता. वसंतगड हा किल्ला कराड च्या  जवळ आहे. तळबीड नावाचा गाव आहे खाली. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या  समाधी मुले प्रसिध्द आहे. एक रस्ता तिथून गडावर जातो. आम्ही वसंतगड गावाच्या रस्त्यानी गेलो. वाट पूर्णपणे मळलेली आहे. किल्ला खूप मोठा आहे फिरायला . बघायला पण खूप काही आहे.
यावेळी पण ७ जण  होतॊ. ७ मित्र आणि त्याबरोबर सर्व हेवेदावे आणि इतर गर्दी. येतांना असते आणि जातांना काही तरी नवीन बरोबर घेऊन जातात. खूप आठवणी. या वेळी माझं  कारण काही तरी वेगळच होतं . मी एकटा होतो. खूप विचार चालू होते आणि मला शांतपणे मार्ग शोधायचा होता. ट्रेक चा नाही. त्यामध्ये मी खूप गुंतलो होतो. नाही मिळला नीटसा मार्ग. भारतात आलो तेव्हा एक बावळट माणूस, नोकरदार वर्गातील एक प्रामाणिक माणूस म्हणून आलो होतो. पण परिस्थिती आणि इथल्या पद्धतीमुळे पूर्ण मेलो. अर्थात हे पण खोटं आहे. पण दोष तर द्यायला हवा ना कुणाला तरी.
असो.
इथून काही अंतरावर सदाशिवगड आहे. साधारण १००० पाहिऱ्या आहेत. वर एक महादेवाचं मंदिर आहे. बाकी विशेष काही नाही.
वसंतगड इतिहास :
या किल्ल्याची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ठेवले ‘किली द फतेह’ म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. नंतर १७०६ मध्ये मराठ्यांनी परत हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
तर, वसंतगड गावातून वर जायला ४५ मिन खूप झाली. जातांना घळीमधला एक देव आहे. छोटेसे मंदिर आहे.


घळीमधले मंदिर 

वर पोचल्यावर एक सुंदर बाप्पाच मंदिर आहे. या गडाचं  महत्व काही वेगळा असावं . इथे तशी बाया माणसांची गर्दी होती. वर एक मंदिर आहे. तिथे कदाचित नवस वगरे बोलायला लोक येत असावीत. पूजा अर्चा चालू होत्या. गडाची तटबंदी खूप शिल्लक आहे. खूप मोठा विस्तार आहे आणि इथे राहायला यायला नक्कीच आवडेल. 




दरवाजा 


वर गेल्यावर डावीकडे मारुती आहे 





दुसरा दरवाजा - हा प्रमुख दरवाजा असावा 













सदाशिवगड 








No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...