कोर्लई
किल्ले ३ प्रकारात आहेत. एक ज्याला गिरिदुर्ग म्हणतात, भुई किल्ले आणि समुद्र किनाऱ्यावरील किल्ले. महाराष्ट्रात ३५० हुन अधिक किल्ले आहेत हे मला भ्रमंती सुरु झाल्यावर कळलं. हे सर्व किल्ले विविध काळातले आहेत. वेगवेगळ्या राजांनी बांधलेले, आमच्या महाराजांनी बांधलेले, मुघलांनी हरलेले आणि इंग्रजांनी मोडलेले. या मध्ये काही किल्ले हे पोर्तुगी लोकांनी बांधलेले आहेत. US हुन परत भारतात आलो तेव्हा New Year ला मी आणि अनेक लोक आम्ही अलिबाग ला गेलो होतो. तिथे एक वाडी होती मित्राची तिथे मस्त ३ दिवस राहिलो होतो. खूप छान अनुभव होता. त्यावेळी तिथे एक १७६४ साली बांधलेले कणकेश्वर मंदिर बघायला गेलो. अप्रतिम मंदिर आहे आणि जरूर पाहायला जावे.
या वेळी अलिबाग हे खूपच वेगळ्या नजरेतून पहिलं.
पुणे - पेण - अलिबाग असे जातांना गेलो. पहिला किल्ला कोलाबा, जो समुद्र किनाऱ्यावर आहे. तिथे जायला ओहोटीची वाट पाहावी लागते. पोचलो तेव्हा इतका जबरदस्त पाऊस होता आणि समुद्र पेटला होता. रागावला होता. त्यामुळे लांबून त्या किल्ल्याचे दर्शन घेतले व तिथून निघालो.
अलिबाग जवळ अनेक किल्ले आहेत, कोर्लई, रेवदंडा, उंदेरी, खांदेरी, मुरुड जंजिरा, सागरगड. त्यामुळे इथे येऊन हे सर्व किल्ले ४ दिवसात नीट नियोजन केले तर होऊ शकतात. या वेळी मी चेतन आणि उपेंद्र असे तिघेच निघालो. मला एक मंदिर बघायचे होते. आणि ते पहिले. अलिबाग शहर आता खूपच मोठे झाले आहे. जिकडे तिकडे हॉटेल झाली आहेत, आणि घरा घरात राहायची सोया होऊ शकते. तिथे Bread & Breakfast हा सरकार चा उपक्रम चांगला राबवला आहे. अलिबाग हुन साधारण १५ कि मी वर रेवदंडा तर तिथून ७ ते ८ कि मी वर कोर्लई किल्ला आहे. कोर्लईच्या light house पाशी गाडी लावून आम्ही हे काय प्रकरण आहे हे पाहायला निघालो. पुढे जायच्या आधी थोडासा इतिहास वाचा.
इतिहास : | |
१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत :च एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्या बुर्हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले. (Ref - trekshitij) |
कोर्लई किल्ला आम्ही मधून चढला. म्हणजे, मुख्य दरवाजा नेमका दुसऱ्या बाजूला आहे. Google maps च्या मदतीने रस्ता light house ला नेतो आणि तिथून एक वाट वर जाते.
गडावर दोन बाजू आहेत. डावीकडील बाजू थेट समुद्र किनारी नेते तर उजवीकडील बाजू गडाच्या माथ्यावर. त्यामुळे समुद्र सपाटी पासून जो किल्ला चालू होतो तो थेट माथ्यावर जाऊन थांबतो. हा किल्ला पोर्तुगी लोकांनी बांधला आहे. याचे बांधकाम or Architecture to be precise is very different than what we have seen till now. The way the doors are built, the steps and in general the use of space and locations of the important places are very well defined. A church right in the middle of the fort stand tall. This place is very beautiful. Sea on one side and mountains on the other makes this place one of the most scenic location that I have visited.
You can see Chetan and Upendra walking towards the sea.
या बाजूला प्रत्येक level ला जिथे बुरुज तत्सम आहे, तिथे तोफा बघायला मिळतील. खूप तोफा आहेत. बघूनच भारी वाटतं. माझ्या मनात आलं की या उडवताना काय वाटत असेल. समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी हा किल्ला किती महत्वाचा ठरला असेल. त्याच्याचमुळे या किल्ल्यावर खूप जणांनी राज्य केले आहे.
उजवीकडे जातांना एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. खूप शुद्ध पाणी आहे आणि ४० फुटी टाकी बांधलेली आहे. Rain Water Harvesting or similar technique can be seen here.
Shambo temple is very close to this place. पुरातत्व विभागाचे काम या किल्ल्यावर चालूं आहे. किल्ला खूप स्वच्छ ठेवला आहे. इथे दोन माणसं काम करत होती. निसर्ग रम्य ठिकाण आणि गावापासून दूर. त्यामुळे इथे जोडपी खूप येतात. पण त्यांना आता इथे येऊन ashique करायला बंदी आहे. गडाचे पावित्र्य वगरे शब्द आता आपल्या देशाच्या Dictionary मध्ये यायला सुरुवात झालेली पाहून मन भरून आले. त्यामुळे हे माणसं इथे काम आणि राखण असे दोन्ही करतात. पाऊस असल्यानी गड लखलखीत दिसत होता. हिरवेगार सर्वकडे आणि दगडं जणू पुसून काढून ठेवली आहेत असे वाटतं होते.
इथून थोडे पुढे गेलं असता एक church आहे. आणि त्याच्या मागे पसरलेला अजून गड आहे. एकंदरीत गड दिसायला छोटा असला तरी पाहायला बराच मोठा आहे. हा किल्ला माझा list मध्ये खूपच वर गेला आहे.