Tuesday, 17 July 2018

कोर्लई





कोर्लई 

किल्ले ३ प्रकारात आहेत. एक ज्याला गिरिदुर्ग म्हणतात, भुई किल्ले आणि समुद्र किनाऱ्यावरील किल्ले. महाराष्ट्रात ३५० हुन अधिक किल्ले आहेत हे मला भ्रमंती सुरु झाल्यावर कळलं. हे सर्व किल्ले विविध काळातले आहेत. वेगवेगळ्या राजांनी बांधलेले, आमच्या महाराजांनी बांधलेले, मुघलांनी हरलेले आणि इंग्रजांनी मोडलेले. या मध्ये काही किल्ले हे पोर्तुगी लोकांनी बांधलेले आहेत. US हुन परत भारतात आलो तेव्हा New Year ला मी आणि अनेक लोक आम्ही अलिबाग ला गेलो होतो. तिथे एक वाडी होती मित्राची तिथे मस्त ३ दिवस राहिलो होतो. खूप छान अनुभव होता. त्यावेळी तिथे एक १७६४ साली बांधलेले कणकेश्वर मंदिर बघायला गेलो. अप्रतिम मंदिर आहे आणि जरूर पाहायला जावे. 
या वेळी अलिबाग हे खूपच वेगळ्या नजरेतून पहिलं. 
पुणे - पेण - अलिबाग असे जातांना गेलो. पहिला किल्ला कोलाबा, जो समुद्र किनाऱ्यावर आहे. तिथे जायला ओहोटीची वाट पाहावी लागते. पोचलो तेव्हा इतका जबरदस्त पाऊस होता आणि समुद्र पेटला होता. रागावला होता. त्यामुळे लांबून त्या किल्ल्याचे दर्शन घेतले व तिथून निघालो. 
अलिबाग जवळ अनेक किल्ले आहेत, कोर्लई, रेवदंडा, उंदेरी, खांदेरी, मुरुड जंजिरा, सागरगड. त्यामुळे इथे येऊन हे सर्व किल्ले ४ दिवसात नीट नियोजन केले तर होऊ शकतात. या वेळी मी चेतन आणि उपेंद्र असे तिघेच निघालो. मला एक मंदिर बघायचे होते. आणि ते पहिले. अलिबाग शहर आता खूपच मोठे झाले आहे. जिकडे तिकडे हॉटेल झाली आहेत, आणि घरा घरात राहायची सोया होऊ शकते. तिथे Bread & Breakfast हा सरकार चा उपक्रम चांगला राबवला आहे. अलिबाग हुन साधारण १५ कि मी वर रेवदंडा तर तिथून ७ ते ८ कि मी वर कोर्लई किल्ला आहे. कोर्लईच्या light house  पाशी गाडी लावून आम्ही हे काय प्रकरण आहे हे पाहायला निघालो. पुढे जायच्या आधी थोडासा इतिहास वाचा. 

इतिहास :
१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्‍हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत…:च एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्‍या बुर्‍हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्‍या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले. (Ref - trekshitij)


कोर्लई किल्ला आम्ही मधून चढला. म्हणजे, मुख्य दरवाजा नेमका दुसऱ्या बाजूला आहे. Google maps च्या मदतीने रस्ता light  house  ला नेतो आणि तिथून एक वाट वर जाते. 

गडावर दोन बाजू आहेत. डावीकडील बाजू थेट समुद्र किनारी नेते तर उजवीकडील बाजू गडाच्या माथ्यावर. त्यामुळे समुद्र सपाटी पासून जो किल्ला चालू होतो तो थेट माथ्यावर जाऊन थांबतो. हा किल्ला पोर्तुगी लोकांनी बांधला आहे. याचे बांधकाम or Architecture to be precise is very different than what we have seen till now. The way the doors are built, the steps and in general the use of space and locations of the important places are very well defined. A church right in the middle of the fort stand tall. This place is very beautiful. Sea on one side and mountains on the other makes this place one of the most scenic location that I  have visited. 




You can see Chetan and Upendra walking towards  the sea.  



या बाजूला प्रत्येक level  ला जिथे बुरुज तत्सम आहे, तिथे तोफा बघायला मिळतील. खूप तोफा आहेत. बघूनच भारी वाटतं. माझ्या  मनात आलं की या उडवताना काय वाटत असेल. समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी हा किल्ला किती महत्वाचा ठरला असेल. त्याच्याचमुळे या किल्ल्यावर खूप जणांनी राज्य केले आहे. 


उजवीकडे जातांना एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. खूप शुद्ध पाणी आहे आणि ४० फुटी टाकी बांधलेली आहे. Rain Water Harvesting or similar technique can be seen here. 




Shambo temple is very close to this place. पुरातत्व विभागाचे काम या किल्ल्यावर चालूं  आहे. किल्ला खूप स्वच्छ ठेवला आहे. इथे दोन माणसं काम करत होती. निसर्ग रम्य ठिकाण आणि गावापासून दूर. त्यामुळे इथे जोडपी खूप येतात. पण त्यांना आता इथे येऊन ashique करायला बंदी आहे. गडाचे पावित्र्य  वगरे शब्द आता आपल्या देशाच्या Dictionary मध्ये यायला सुरुवात झालेली पाहून मन भरून आले. त्यामुळे हे माणसं इथे काम आणि राखण असे दोन्ही करतात. पाऊस असल्यानी गड लखलखीत दिसत होता. हिरवेगार सर्वकडे आणि दगडं जणू पुसून काढून ठेवली आहेत असे वाटतं होते. 


इथून थोडे पुढे गेलं असता एक church आहे. आणि त्याच्या मागे पसरलेला अजून गड आहे. एकंदरीत गड दिसायला छोटा असला तरी पाहायला बराच मोठा आहे. हा किल्ला माझा list  मध्ये खूपच वर गेला आहे. 













































Tuesday, 10 July 2018

सागरगड / खेडदुर्ग

सागरगड / खेडदुर्ग

पाण्यात भिजायला आणि पावसात खेळायला वयाची अट नाही. हा ट्रेक खरा पावसाळी ट्रेक झाला. कोकणातला पाऊस तो, नुसते भिजवत नाही तर झोडपून काढतो.
शेवटचे अलिबाग ला गेलो ते म्हणजे मी पप्या आणि परेश सायकल वर. भर उन्हाळ्यात आम्ही पुण्याहून अलिबाग ला गेलो होतो. ७ तास लागले होते. खूप छान ट्रिप झाली होती. थळ नावाच्या गावी आम्ही प्रसाद कडे राहिलो. त्याच रस्त्यावरून थोडे पुढे, अलिबाग च्या अलीकडे डावीकडे खंडाळा नावाचे गाव आहे. तिथे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता व पाटी  लावलेली आहे. तो रस्ता पायथ्याशी नेतो. डावीकडे एक साधा रस्ता दिसला. तिथेच गाडी लावून आम्ही वर जाण्यासाठी सुरुवात केली. मी शिरीष आणि उपेंद्र. तिघेच होतो या वेळी.
हा किल्ला दोन भागात आहे. पायथ्या पासून सागरगड माची गावापर्यन्त आणि तिथून गडावर. खूप पाऊस होता आणि सर्व कडे हिरवेगार. ओढे भरलेले. खेकडे सैरा वैरा धावत होते. वेगवेगळ्या रंगांचे. इथे जंगल खूप घनदाट आहे. आणि हरवणं शक्य आहे. माची पर्यंत वाट मळलेली आहे. जातांना अप्रतिम धबधब्याचे दर्शन होते.


धोंदाणे धबधबा
उजवीकडे पाहाल तर धोंदाणे धबधबा दोन टप्यात खाली पडतांना दिसतो. अशक्य दृश्य ते. पायथ्यापासून माची पर्यन्त जायला साधारण ३० min लागतात. The walk is beautiful and serene. This is one such fort where, even during the monsoons, you wont find a lot of people. This is not a tourist spot but actual trek. Once you reach the base village there is a beautiful temple on the right hand side. The waterfall is near the temple. सागरगडमाची हेच गावाचे नाव आहे. तिथे औरंगाबाद हुन बजाज ची मंडळी आली होती. ते पण आमच्या बरोबर गडावर येत होते. माची वरून गडावर जायची वाट नीट विचारा नाही तर एक वाटाड्या बरोबर घ्या. पावसाळ्यात ही वाट चुकला नाहीत तरच नवल आहे. 
कालच माउली पुण्यात पोचले. संध्याकाळी त्यांचे सुंदर दर्शन घडले. या वेळी ट्रेक मुळे, मी पुणे सासवड वारी, जी दरवर्षी करत आलो आहे ती करू नाही शकलो. पुण्यात पण, काही वर्ष, वारी चं वारं सुटलं होतं, तेव्हा जो कोण आहे नाही तो वारी ला जाऊन येत होता. चांगलच आहे. मग कसे मन भरून येते आणि कसे ते अध्यामिक अनुभव येतात पासून सर्व selfie सकट social media वर झळकत असे. या वेळी जास्त काही नाही दिसले. पाऊस होता असे म्हणू का त्यातले glamour नाहीसे झाले. कदाचित दोन्ही असेल. वारकऱ्यांची ही सुट्टी पण असते आणि भ्रमंती पण. रस्ते  बंद होतात आणि FC road रांगोळ्यांनी नटून जातो. मुक्ताबाईंची  पालखी आधी जाते, मग तुकोबांची आणि मग माऊलींची. मला वाटतं अजून पण खूप पालख्या जातात बरोबर. इतके वर्ष झाली तरी तीच परंपरा तेच वारकरी आणि तोच विठ्ठल. जगात असे कुठे पहिला मिळत असेल असे मला वाटत नाही. वारीत सर्व एक. तिथे कमी कोण जास्त कोण, जात पंथ, काही नाही. सगळे माउली. २०१९ ला elections  असल्यामुळे सर्व वारकऱ्यांची काळजी जास्त घेतली जात होती असा मला भास तरी नक्कीच झाला. दर ५ वर्षांनी त्यांची काळजी घेतली जाते, नीट. असो. तर आम्ही माचीवर पोचलो. 
माची वर पोचून सुद्धा गडाचा पत्ताच नव्हता. एक तर ढग उतरले होते त्यामुळे २० फुटावरचे पण काही दिसत नव्हते आणि दुसरे गड कुठे आणि कुठला हेच माहित नव्हते. Bajaj  gang  नी वाटाड्या घेतला होता, त्याचा मागे मागे आम्ही गेलो. इथून तरी १ तास नक्कीच लागला असेल . खाली जिथे आम्ही गाडी park  केली तो रस्ता इथे माची पर्यन्त येतो. गाडी वर येऊ शकत असेल असे वाटत नाही. THAR  येऊ शकेल नक्की. शेवटचा टप्पा जरा चढ आहे, पण बाकी चालायला खूप आहे. वर पोहचलो आणि मग कळलं की हाच तो गड. डावीकडे एक पडका  दरवाजा आहे, तोच प्रमुख दरवाजा असावा. गडावर पाण्याच्या टाक्या, पडक्या वाड्यांचे अवशेष, महाराजांचे स्मारक, शंकराचे मंदिर व एक खालपासून वर आलेला सुळका ज्याला वानरटोक असे म्हणतात, बघण्यासारखे आहे. तिथे काही अवशेष आणि भिंती आहेत. दर्शन घेऊन आल्यावर बाहेर बसून आम्ही eggs खालली आणि तिथून पुढे निघालो. बाकी लोकं वरच थांबली होती व स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती. पुण्यापासून इथे येण्याचा रस्ता अत्यंत खराब असल्यानी पोचायला ४ तास लागले. तसेच जातांना होणार हे गृहीत धरून आम्ही उतरायला लागलो. अर्थात म्हणाल्या प्रमणे माची पासून गडावरचा रस्ता दिसतच नाही. माहिती नसेल तर नक्की चुकणार. चुकलोच आणि जंगलात पोचलो. खाली उतरत एक दिशा ठरवून त्या दिशेनी सुटलो. खूप पाऊस आणि ढग असल्यामुळे काही दिसत नव्हतं. काही वेळानी एक पठार आलं आणि तिथून लांबवर माची वरील कौलारू घरं दिसली. त्या दिशेनी जाऊन माची पर्यन्त पोचलो. तिथे संदीप पाटील यांचे घरातच हॉटेल आहे. तिथे चहा प्यायला व पुढे निघालो. पाटील यांचा नंबर खाली चित्रा मध्ये दिसेलच. We were drenched. It was getting cold and tiring. We left the place and started descending. This time instead of walking through the trail, we decided to go via road. Or so called road. Its was a 4.5 km walk to the car. उप्या चं शंभो ऐकत आम्ही उतरलो. गाडी पाशी पोचून पहिले धपाटे हाणले आणि पोट पूजा केली. आम्ही बाकी सर्व साथीदारांना खूप miss  केले. कारण हा ट्रेक खरंच ट्रेक होता आणि पाऊसाची मजा घेण्यासाठीच होता. किल्ल्यावर बघण्यासारखे खूप आहेच पण पाऊसात भिजायची, चिखलात खेळायची आणि किल्ल्यावर पोचण्याचा रस्ता हा ट्रेक फारच भारी करतो. येतांना अभंगवाणी ऐकत थकवा कधी नाहीसा झाला हे कळलंच नाही.... 
इतिहास :
सागरगड कोणी व केव्हा बांधला हे अज्ञात आहे. इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरुन खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिध्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.

संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.

छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.



महादेव मंदिर 


वानरटोक 


अवशेष 






पडलेला प्रमुख दरवाजा आणि त्या समोरील राजमार्ग 


तटबंदी 



गोमुखातून येणारं पिण्याचा पाणी 






माची वरील जेवायची सोय. तिथे राहता पण येऊ शकतं 


माची वर जाण्याचा रस्ता 
























महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...