Monday, 2 July 2018

सिह्गड - कल्याण दरवाजा



सिह्गड - कल्याण दरवाजा 

पुणेरी लोक म्हणतील की वेडा झाला का हा ? गडाबद्दल काय BLOG लिहितोय. गडाबद्दल म्हणजे सिहगडाबद्दल. पण हो. लिहावेसे वाटत आहे. अनुभव म्हणून लिहावेसे वाटत आहे.  गडाचे  प्रेम खूप लहानपणी  पासून. मला वाटतं दादा बरोबर मी दुसरी तिसरी मध्येच पहिल्यांदा गेलो असीन  गडावर . कधी ते नेमके  आठवत नाही आता. पण ट्रेकिंग ची आवड निर्माण करायला गड कारणीभूत आहे. नंतर माझ्या मावशीचे घर पायथ्याशी असल्यानी शाळेत असतांना अनेक वेळा तिथे जायचा योग आला. मग सकाळ झाली की गडावर जाऊन दत्ता कडे भजी, पिठलं भाकरी आणि ताक दही ओरपून परत. पहिल्यांदा मी आणि कौस्त्या जेव्हा सायकल वर गेलो तेव्हा वर जायचा रस्ता झाला नव्हता. त्यामुळे दीदी कडे सायकल लावून आम्ही वर गेलो होतो. मला वाटतं  आठवीत असू. आणि वर गेलो तेव्हा परत यावंसं वाटत नव्हतं . म्हणून तिथल्या TV Tower मध्ये जाऊन, पोट दुखायचे आणि ताप आल्याची नाटकं करून घरी फोन केला होता. "आई, मी श्रीरंग ------- हं बोल. आई अगं पोचलोय  गडावर. -----------------मग. वातावरण खूपच छान आहे, तर कदाचित इथेच राहतो आता, कौस्त्या च्या घरी कळव -----------------ढप  - फोन बंद." साधारण तेव्हा पासून गडावर आम्ही जाऊन आलो की  आई पुढचे ५ दिवस किमान माझाशी बोलायची नाही. "जेवण ठेवलं  आहे, पासून ते तुला काय हवे ते कर" पर्यन्त गाडी रुळावरून घसराची.  तेव्हा तरी, बाकी काही सवई नव्हत्या. अर्थात हे आता ऐकलं की फालतू वाटतं . पण खिशात रु १० असतांना जग भराची  मजा कशी घेणार - चला गडावर. तेव्हा पासून ते काल पर्यन्त हा गड बदलतांना पहिला आहे. त्यात आम्ही पण. गडावर गाडी घेऊन जाऊन रात्री ९ ला वरच्या बंगल्यात आम्ही पण रात्र रात्र गाणी गायली आहेत. तिथे बाहेरच्या व्हरांड्यात बसून ढग आत आलेले पहिले आहेत. किती तरी वेळा वेगवेगळे अंदाज चुकले आहेत आणि रात्री १२ वाजता खाली येऊन त्या चुकलेल्या अंदाजाची भरपाई केली आहे. गडावर जातांना घाटामध्ये कडेला एखादी दुचाकी दिसली, की  समजायचे इथे खाली डाकू डाव चालू आहे. जातांना शिट्ट्या मारून नाही तर वरून लहान दगडं मारून त्यांना त्रास देऊन पळून जायाचं. त्या खट्याळपणात पण एक गोड  मजा असायची. तीन वर्षयांपूर्वी एकदा करण तन्वी आणि माझ्या भाचे आणि पुतणे मंडळींना घेऊन गडावर चालत गेलो होतो. बरेच पोरं पहिल्यांदा येत होती. वर आल्यावर परत तोच भजी ताक कार्यक्रम झाला. "काय ताई  किती पैसे झाले" - "रु २१५० फक्त झाले दादा". जाऊदे अजून काही मी बोलत नाही. 
घाट चालू झाला तसे आमचे पण वय वाढले. ढु  खाली बुलेट अली. YAMAHA अली चड्डी ची. कौस्त्यानी KAWASAKI घेतली होती. रोहित ला घरून सोडायचे नाही. त्याच्याकडे मला वाटतं कायनेटिक होती. तो रात्री चोरून आमच्या बरोबर यायचा. बाकी पप्या कडे बुलेट होती. असे साधारण १० ते १२ लोकांची जायची सोय झाली होती. तेव्हा कोणीच पैसे कमवायचे नाहीत. त्यामुळे जे खिशात असायचे ते उडवायचे. तेव्हा हिशोब पेग चा होता. तिथे वाटेकरी मीच. कारण तेव्हा तू पैसे घे पण मला माझा पेग दे वगरे व्हायच. त्यामध्ये निखिल सारखा कोणी तरी अचानक यायचा. पप्या जग मित्र आणि नेहमी उशिरा येणार. आज पण वेळेवर जायचे म्हणाले की  हा बुलेट वर वेगळा उशिरा येतो. असो, तेव्हा येतांना कोणाला तरी आणायचा. निख्याची आमची भेट तेव्हा झाली. आज पण होते. पण ओळख नाही विसरणार कारण त्यांनी तिथे येऊन २ पेग ढोसले. भयंकर मापात पाप झाले आणि निख्या आठवणीत राहिला. बुंद से गयी वो हौद से नाही अति .... तेव्हा कळलं काय असते ते. वरच्या बंगल्यावर एक रात्र गेलो असता तिथे कळले की  अजून एक ग्रुप आला आहे. आम्ही एकीकडे आणि ते एकीकडे असे ढोसायला बसलो. खर तर गाणी म्हणायला बसलो असं म्हणा. काही वेळानी विमानं हवेत जशी उडायला लागली तसे आवाज वाढत गेले. खूप मोठ्यांनी गाणी. शेवटी जाऊन त्या पोरांना सांगितले की भाऊ एकतर एकत्र गाऊ नाही तर तुम्ही निघा पाहू. वैशाली च्या समोरच्या गल्लीत बसणारी आपलीच पोरं निघाली. ८ चा ग्रुप १६ झाला आणि छान मित्र मिळाले. सुदर्शन मराठे, दिग्या, अंड्या, पर्या, सम्य, पाटील,  ..... FB वर बघाल तर सर्व आहेत आज पण. त्या रात्री पासून आज वर. " काहा  खो गये सारे अपने , वो यादों के रंगी नजारे " अंड्या न म्हणालेल गाणं अजून आठवणीत आहे. मी चड्डी गुलाब पाप्या सुम्या कौस्त्या आणि बरेच मित्र असायचो. गडावर गर्दी नसायची. रात्री वाऱ्याच्या टोकावर जाऊन लोकांचे त्या वाऱ्यात सिगारेट कशी मी पेटवू शकतो या बद्दल अभिमान वाटायचा. तिथे बसून मग वेडात मराठे वीर दौडले सात, शूर आम्ही सरदार आणि त्या सारखी गाणी वह्यांची. आवाज आणि सूर ह्या खेरीच तेव्हा सर्व परफेक्ट असायचा. पण वाटायचे की क्या बात है. गाणं झाले की मिठी मारायची आणि मावळ्यांना वंदना. गाड्या आल्या, तसे आमचे गडावर जाणे अजून वाढले. पण गाड्या आमच्या नसून तीर्थरुपांच्या असल्यानी त्यांच्या झोपेची वाट पाहत बसावी लागायची. ते झोपले की, ते म्हणजे कोणाचेही तीर्थरूप की  गाडी काढून पल काढायचो. मोबाइल, whatsaap group वगरे फालतूपणे नव्हते तेव्हा. त्यामुळे विश्वास, जो आजच्या जगातील फालतूपणा समजला जातो, तो त्यावेळी होता. तो आज पण आमच्यातच राहतो आहे. भांडण आज पण असतं, आणि ते पण समोर समोर. असो. त्यामुळे इतके वर्ष झाली पण गडावरचं प्रेम काहीं कमी झाला नाही. शनिवारी दुपारी गड चढायला आत्ता पर्यन्त जाणे होते. पुण्यात काही लोक गेले २०० वर्ष गड चढत आले आहेत हे सांगायला नको. म्हणजे आपण म्हणाले की काल मी गडावर गेलो होतो. की समोरचा म्हणणार की त्यात काय आम्ही दर रविवारी जातो. आपण म्हणलं कि मी दर रविवारी जातो की तो म्हणणार मी आठवड्यातून २ वेळा जातो. असे करत करत शेवट - आमच्या ७ पिढ्या दररोज गडावर जातात पर्यन्त म्हणणारी माणसे तुम्हाला भेटतील. फक्त पुण्यात. यातून एकच कळतं की लोकांचं गडावर किती प्रेम आहे. मध्यंतरी मी खूप सायकलींग करत होतो. ८ वर्षांपूर्वी, लेह ची लाट पुण्यात यायच्या आधी, आम्ही अचानक ठरवून मनाली लेह हा प्रवास सायकल  वर केला होता. तेव्हा प्रॅक्टिस साठी गडावर सायकल नी  जायचो. खूप फाटायची. गड अव्ह्गड आहे. अंगावर येतो. 
अजून एक प्रश्न नुकताच समोर आला तो म्हणजे किती वेळ लागतो तुम्हाला गड चढायला. मी मनात विचार करतो की इथे पण पुणेरी पब्लिक 'मला पहा आणि फुले वाहा ' करायला येतात का काय. तर किती वेळ लागला. मला ६० मी लागतात वर जायला. बर बर, तुम्हाला किती - ३८. ५८,  मी - वाह क्या बात है. तुमचे  परवा सकाळ मध्ये नाव आले  होता काय हो ? झालं मिळवलं - सिहंगड स्पर्धेत अमुक तमुक पहिला आला. ७७ वर्ष + मध्ये अप्पासाहेब साठे, किंवा बंडोपंत गोखले, नानासाहेब पेंढारकर वगरे पहिले आले. चेष्टा बाजूला. लोकांची आयुष्य वाढवून, त्यांना निरोगी ठेवण्यात पण गडाचा हात आहे. काही वर्षे झाले, जसे IT पुण्यात वाढत गेले तसे तसे बाहेरील जनता येऊन पुणे घाण करायला लागली. इथल्या कशा का असेना संस्कृतीत त्यांचे असणे म्हणजे दुधात माशी. पैसा  आला, मोठे रस्ते आले, उड्डाण पूल आले. कोथरूड अनेक्स आणि ONDH (औंध ) सारखी छोटी शहरं निर्माण झाली. सिहंगड रस्ता जो एकेकाळी सुंदर झाडांनी सजलेला होता तिथे आता नांदेड सिटी अली. त्यापुढे घाणच आहे अजून. तो प्रश्न निराळा आहे. तिथे महाराज नसून साहेब आहेत. असो. तर हे सर्व बाहेरून आलेली जनता आता खडावासाला पर्यन्त पोचली. आधी झाडाखाली कपडे ठेऊन पाण्यात उड्या  मारायचो तिथे आता चौपाटी झाली आहे. साधारण १०० गाड्या लागतात आणि १००० लोक तिथे गर्दी करतात. काही हरकत नाही. पण तिथूनच रात्री चक्कर मारा, म्हणजे कळेल की तिच घाण खाली पाण्यात आणि तिथे पडलेली दिसते. आम्ही नाही अस केलं कधी. खरंच नाही केलं. मजा केली पण घाण पणा नाही केला. खडवासला सोडून पुढे गाडी आता थेट गडावर पोचली आहे. गाड्यांच्या धुरांनी सायकलवर वर जाणं मला नको झालं आहे. आता त्यात पण आम्ही कसे वर जातो असे म्हणणारे आणि त्याचा अभिमान बाळगणारी पुणेरी भेटतीलच. पण मला नको वाटत. कार पार्किंग मध्ये गाड्यांचा ढीग. आता  तिथले गावकरी पण धंदेवाईक झाले आहेत. हिंदी बोललो की तेच दही रु ६० ला. करा धंदा, पण लुबाडू नका. अर्थात ते काय वेगळं  करतात जे इथे शहरात लोक करत नाही. पण तिथे गेलं  की   एक वाटतं की  इथे सर्व पवित्र आहे. इथे खोटेपणा नाही. इथे माणुसकी असेल . इथे आनंद आहे. अर्थात म्हणूनच आपण तिथे ओढले जातो ना. त्यामुळे तिथे काही विचित्र दिसले की  मन मोडतं. अरेरे इथे पण असेच चालू झाले वाटतं . गडावर काही दुष्ट लोकांनी जेव्हा धुड गुस घातला, दारू पिऊन धिंगाणा घातला, मारामारी, मुलींना त्रास देणे वगरे केले तेव्हा गडावर रात्री जाणे बंद केले. या भिकार अधाशी आणि खरकट्या लोकांमुळे ७ नंतर गडावर बंदी आणली. अर्थात आम्हाला कोणी थांबवू शकणार नाही ते तितकच खरं . कारण चालत जायला बंदी नाही. गडाचे किस्से आणि कथा खूप आहेत. त्यामुळे मित्र एकत्र आलेत. पराकोटीची भांडणं झाली तरी गड मध्ये घालून लोकांना परत एकत्र आणलं  आहे. गड एक धागा आहे, आमच्या मधला, सर्व ट्रेकिंग करणाऱ्या लोकांमधला. कात्रज सिहंगड असो,वा  राजगड सिहंगड, सिहंगड तोरणा असो व अजून काही. याच्या मध्ये जादू आहे. वाचून उत्साहानी आत्ता जाऊ नका बराका. विकृत लोकांनी आणि समाजकीटकांनी गडाला घाण केले आहे. आपली नावे लिहून आणि कचरा करून त्याचे रूप विद्रुप केले आहे. ही लोक गाड्या घेऊन येतात  आणि त्यांचा मागे जगदंब पण लिहिलेलं  दिसते. आपल्या वागणुकीने ते आमच्या महाराजांचा अपमान करतात असे मला वाटते.  पण आज हे लिहिण्याचे कारण काही वेगळेच आहे. ३५ वर्ष झाली पण काल जे घडले ते कधी नाही. 
सिहंगड, काल, मी आणि आमच्या टोळीने कल्याण दरवाज्याकडून वर चढला. वर लिहिलेलं पूर्ण सांगायचे, ते हे कारण. एकाबाजूला माणसांच्या गर्दी आणि घाणीने विद्रुप दिसणारा गड, या बाजूनी मात्र इतिहास काळात जगत आहे. पुण्याहून कात्रज घाट ओलांडून एक रस्ता कोंढणपूर कडे जातो. गडाची मागची बाजू आहे. तिथून एक रस्ता कल्याण गावाकडे जातो. त्याच गावाकडून गडावर जाता येते. कल्याण दरवाज्यापाशी. रविवारी या बाजूस आमच्या बरोबर वर जायला कोणी नव्हते. पलीकडे ट्रॅफिक अडकलेला दिसत होता. आणि या बाजूस फक्त आम्हीच. बाकी कोणी नाही. अशक्य वातावरण होतं आणि गड या बाजूनी किती सुंदर दिसतो हे आता  कळलं. वामन निघणार होता काही दिवसात. आमच्यातील NRI . पिंटू आणि उप्या आले नव्हते. तरी एक नवीन गडी / काका/ आजोबा जे म्हणायचे ते म्हणा, शामिल झाला होता. सारंग कानडे. त्याला कांडे, थेरडॉक्स, काका वगरे संबोधले जाते. आमच्यात तो सर्वात वयानी मोठा आहे. पण तरी फिट काका आहे. त्याला विचारलं की  कॅसेट चालू करतो की हे कसे रोज सकाळी उठल्यावर १ लीटर पाणी प्यायल्या मुले झाले आहे. जे काही कारण असो, तो सर्वात उत्साही आणि अत्यंत नाठाळ माणूस आहे. कानडे आडनावाला तो exception आहे. म्हणजे कोकणस्थि नाही, येव्हडेच सांगायचा उद्देश. बाकी समजून घ्या. तो आल्याने  मजा आली. काही वेगळे विषय आणि इतर गप्पा झाल्या. जातांना आणि येतांना आम्ही बरोबर होतो. गडावर पोचलो ४० मी मध्ये हे इथे सांगणे गरजेचे आहे. वर जाऊन चहा भजी मग परत चहा आणि मग शेवटचा चहा झाला. पप्या ला चहा आवडला. दुसरा. पहिल्यात साखर जास्त होती म्हणे. आजूबाजूला मुलं मुलींचे कोंडाळे, आणि १५००० लोक selfie घेणारे घुटमळत होते. जिथे दिसेल तिथे लगे राहो चालू होते. एकंदरीत नकोसे झाले आणि आम्ही परत इतिहासातल्या गडाकडे निघालो. गडावर खूप काही पाहण्यासारखे आहे. मी खूप वर्षात गड पहिला गेलो नाही आता. वर चढून आलो की  दरवाज्याला शिवून परत जायचे. असा माझा आगळा वेगळा ट्रेक एका माझ्याच आवडत्या ठिकाणी नवीन वाटेनी झाला. 



कल्याण गाव 



तो बघा TOWER उजवीकडे, डावीकडे नाही. 


खाली वाकत होता म्हणून शिरीष ला ओरडलो. 


चहा पिऊन पप्पू गाणी गुणगुणतांना 


कॉमन ची हाताची घडी. NRI going  back. 


टोळी 



या माउलींना प्रार्थना केली की बिडी साठी कोणी तरी बघा. त्या म्हणाल्यात की  कोणी तरी दही वाली देते लग्नाची. चला दही फुकट नाही तरी स्वस्त नक्की मिळेल. 




















No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...