Tuesday, 10 July 2018

सागरगड / खेडदुर्ग

सागरगड / खेडदुर्ग

पाण्यात भिजायला आणि पावसात खेळायला वयाची अट नाही. हा ट्रेक खरा पावसाळी ट्रेक झाला. कोकणातला पाऊस तो, नुसते भिजवत नाही तर झोडपून काढतो.
शेवटचे अलिबाग ला गेलो ते म्हणजे मी पप्या आणि परेश सायकल वर. भर उन्हाळ्यात आम्ही पुण्याहून अलिबाग ला गेलो होतो. ७ तास लागले होते. खूप छान ट्रिप झाली होती. थळ नावाच्या गावी आम्ही प्रसाद कडे राहिलो. त्याच रस्त्यावरून थोडे पुढे, अलिबाग च्या अलीकडे डावीकडे खंडाळा नावाचे गाव आहे. तिथे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता व पाटी  लावलेली आहे. तो रस्ता पायथ्याशी नेतो. डावीकडे एक साधा रस्ता दिसला. तिथेच गाडी लावून आम्ही वर जाण्यासाठी सुरुवात केली. मी शिरीष आणि उपेंद्र. तिघेच होतो या वेळी.
हा किल्ला दोन भागात आहे. पायथ्या पासून सागरगड माची गावापर्यन्त आणि तिथून गडावर. खूप पाऊस होता आणि सर्व कडे हिरवेगार. ओढे भरलेले. खेकडे सैरा वैरा धावत होते. वेगवेगळ्या रंगांचे. इथे जंगल खूप घनदाट आहे. आणि हरवणं शक्य आहे. माची पर्यंत वाट मळलेली आहे. जातांना अप्रतिम धबधब्याचे दर्शन होते.


धोंदाणे धबधबा
उजवीकडे पाहाल तर धोंदाणे धबधबा दोन टप्यात खाली पडतांना दिसतो. अशक्य दृश्य ते. पायथ्यापासून माची पर्यन्त जायला साधारण ३० min लागतात. The walk is beautiful and serene. This is one such fort where, even during the monsoons, you wont find a lot of people. This is not a tourist spot but actual trek. Once you reach the base village there is a beautiful temple on the right hand side. The waterfall is near the temple. सागरगडमाची हेच गावाचे नाव आहे. तिथे औरंगाबाद हुन बजाज ची मंडळी आली होती. ते पण आमच्या बरोबर गडावर येत होते. माची वरून गडावर जायची वाट नीट विचारा नाही तर एक वाटाड्या बरोबर घ्या. पावसाळ्यात ही वाट चुकला नाहीत तरच नवल आहे. 
कालच माउली पुण्यात पोचले. संध्याकाळी त्यांचे सुंदर दर्शन घडले. या वेळी ट्रेक मुळे, मी पुणे सासवड वारी, जी दरवर्षी करत आलो आहे ती करू नाही शकलो. पुण्यात पण, काही वर्ष, वारी चं वारं सुटलं होतं, तेव्हा जो कोण आहे नाही तो वारी ला जाऊन येत होता. चांगलच आहे. मग कसे मन भरून येते आणि कसे ते अध्यामिक अनुभव येतात पासून सर्व selfie सकट social media वर झळकत असे. या वेळी जास्त काही नाही दिसले. पाऊस होता असे म्हणू का त्यातले glamour नाहीसे झाले. कदाचित दोन्ही असेल. वारकऱ्यांची ही सुट्टी पण असते आणि भ्रमंती पण. रस्ते  बंद होतात आणि FC road रांगोळ्यांनी नटून जातो. मुक्ताबाईंची  पालखी आधी जाते, मग तुकोबांची आणि मग माऊलींची. मला वाटतं अजून पण खूप पालख्या जातात बरोबर. इतके वर्ष झाली तरी तीच परंपरा तेच वारकरी आणि तोच विठ्ठल. जगात असे कुठे पहिला मिळत असेल असे मला वाटत नाही. वारीत सर्व एक. तिथे कमी कोण जास्त कोण, जात पंथ, काही नाही. सगळे माउली. २०१९ ला elections  असल्यामुळे सर्व वारकऱ्यांची काळजी जास्त घेतली जात होती असा मला भास तरी नक्कीच झाला. दर ५ वर्षांनी त्यांची काळजी घेतली जाते, नीट. असो. तर आम्ही माचीवर पोचलो. 
माची वर पोचून सुद्धा गडाचा पत्ताच नव्हता. एक तर ढग उतरले होते त्यामुळे २० फुटावरचे पण काही दिसत नव्हते आणि दुसरे गड कुठे आणि कुठला हेच माहित नव्हते. Bajaj  gang  नी वाटाड्या घेतला होता, त्याचा मागे मागे आम्ही गेलो. इथून तरी १ तास नक्कीच लागला असेल . खाली जिथे आम्ही गाडी park  केली तो रस्ता इथे माची पर्यन्त येतो. गाडी वर येऊ शकत असेल असे वाटत नाही. THAR  येऊ शकेल नक्की. शेवटचा टप्पा जरा चढ आहे, पण बाकी चालायला खूप आहे. वर पोहचलो आणि मग कळलं की हाच तो गड. डावीकडे एक पडका  दरवाजा आहे, तोच प्रमुख दरवाजा असावा. गडावर पाण्याच्या टाक्या, पडक्या वाड्यांचे अवशेष, महाराजांचे स्मारक, शंकराचे मंदिर व एक खालपासून वर आलेला सुळका ज्याला वानरटोक असे म्हणतात, बघण्यासारखे आहे. तिथे काही अवशेष आणि भिंती आहेत. दर्शन घेऊन आल्यावर बाहेर बसून आम्ही eggs खालली आणि तिथून पुढे निघालो. बाकी लोकं वरच थांबली होती व स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती. पुण्यापासून इथे येण्याचा रस्ता अत्यंत खराब असल्यानी पोचायला ४ तास लागले. तसेच जातांना होणार हे गृहीत धरून आम्ही उतरायला लागलो. अर्थात म्हणाल्या प्रमणे माची पासून गडावरचा रस्ता दिसतच नाही. माहिती नसेल तर नक्की चुकणार. चुकलोच आणि जंगलात पोचलो. खाली उतरत एक दिशा ठरवून त्या दिशेनी सुटलो. खूप पाऊस आणि ढग असल्यामुळे काही दिसत नव्हतं. काही वेळानी एक पठार आलं आणि तिथून लांबवर माची वरील कौलारू घरं दिसली. त्या दिशेनी जाऊन माची पर्यन्त पोचलो. तिथे संदीप पाटील यांचे घरातच हॉटेल आहे. तिथे चहा प्यायला व पुढे निघालो. पाटील यांचा नंबर खाली चित्रा मध्ये दिसेलच. We were drenched. It was getting cold and tiring. We left the place and started descending. This time instead of walking through the trail, we decided to go via road. Or so called road. Its was a 4.5 km walk to the car. उप्या चं शंभो ऐकत आम्ही उतरलो. गाडी पाशी पोचून पहिले धपाटे हाणले आणि पोट पूजा केली. आम्ही बाकी सर्व साथीदारांना खूप miss  केले. कारण हा ट्रेक खरंच ट्रेक होता आणि पाऊसाची मजा घेण्यासाठीच होता. किल्ल्यावर बघण्यासारखे खूप आहेच पण पाऊसात भिजायची, चिखलात खेळायची आणि किल्ल्यावर पोचण्याचा रस्ता हा ट्रेक फारच भारी करतो. येतांना अभंगवाणी ऐकत थकवा कधी नाहीसा झाला हे कळलंच नाही.... 
इतिहास :
सागरगड कोणी व केव्हा बांधला हे अज्ञात आहे. इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरुन खांदेरी - उंदेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिध्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.

संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला.

छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती.



महादेव मंदिर 


वानरटोक 


अवशेष 






पडलेला प्रमुख दरवाजा आणि त्या समोरील राजमार्ग 


तटबंदी 



गोमुखातून येणारं पिण्याचा पाणी 






माची वरील जेवायची सोय. तिथे राहता पण येऊ शकतं 


माची वर जाण्याचा रस्ता 
























No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...