
मागच्या आठवड्यात खंड पडला. ट्रेक काही होऊ शकला नाही. बाबांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले होते.
माझ्या घरातले नेहमी मला म्हणतात की तुझी first priority तुझे मित्र / काम आहे, मग हिंडणे आणि नंतर वेळ झाला तर आम्ही. आता त्यात तथ्य आहे का नाही हे मला माहित नाही. पण इतकच की ज्या वेळी जे करायचे ते त्यावेळी केले की झालं. आता हे का सांगत आहे ती बडबड ऐका. बुधवार होता आणि नेहमी सारखे संध्याकाळी हुंदडायला निघालो. बुधवार कानडे चा वार म्हणून प्रसिद्ध आहे. CarOBar करत करत गाणी ऐकत मैफिल रंगत होती. रानजाई नावाच्या ठिकाणी मटण भाकरी खायला पोचलो तोच चेरी चा फोन आला की घरी पोच . बाबांना जोशी हॉस्पिटल मध्ये न्यायचे आहे. मला जरा गंभीर वाटलं त्यामुळे तिथून निघताच मी राहुल ला फोन केले. हा माझा सर्वात लाडका भाऊ आहे. मित्र आहे. थोडा येडा आहे पण तसे आम्ही सर्वच आहोत. त्यानी बाबांना लगेच - म्हणजे वेळेवर म्हणा जोशी हॉस्पिटल मध्ये नेले. तोवर आम्ही सर्व पोचलोच तिथे. उपचार चालू करून त्यांना ICU मध्ये हलवलं. नव्हती त्यांची परिस्थिती चांगली त्यामुळे मी जरा गडबडून गेलो होतो. खाली औषधं आणायला आलो तर गाडीत होते ते ३, आणि इतर ५ असे ८ मित्र खाली जमले होते. गौतम अवधूत स्वानंद माझे भाऊ जमले होते. त्यांना बघून मात्र मला खूप धीर आला. त्याच वेळी मी गीता ला फोन केला आणि म्हणालो की तू आलीस तर बरं होईल. ती पण nz हुन लगेच निघाली. रात्री ११. ३० च्या सुमारास तिथे ही सर्व गर्दी जमली होती. कोणी काय काय केले हे मी लिहिणार नाही. पण वेळ निभावून नेली हे खरं. त्या दिवशी पासून, ते बाबा ICU मधून बाहेर येई पर्यन्त हे सर्व मित्र संध्याकाळी ६ पासून ते दुसऱ्या दिवशी ५ वाजे पर्यन्त तिथे एकमेकांची हसत खेळत करमणूक करत माझ्या पाठीशी उभे होते. मित्रांना काहीच नसतं. ते असतात - संपला विषय. अर्थात तसे मित्र मिळवायला भाग्य लागतं आणि तुम्ही पण तसेच असावे लागता. त्या लायकीचे. ज्यांना मित्र नाहीत ते माझ्या दृष्टींनी खरंच गरीब आहेत. या सर्व मध्ये आई आणि चेरी मात्र खंबीर होत्या. असो. बाबा घरी आले आणि आमचे परत ट्रेकिंग चालू झाले.
अवचित बिरवाडी मानगड, विश्रामगड / कुर्डूगड मानगड, असे बरेच वेळा झाले, पण सर्व झाले मानगड नाही. उप्या म्हणाला कोणी नाही तर मी आहे. मी जाणार मानगड ला. मानगड सर्वांना करायचा होता, मग काही लोकांना जमत नव्हतं आणि तरी आम्ही गेलो त्यामुळे वादविवाद सुरु झाले. पण मला त्याचे पण कौतुक आहे. माझ्या शिवाय हा गड झालाच कसा मध्ये सुद्धा भारीपणा आहे. त्या गडाबद्दल म्हणा नाही तर मित्रांच्या बद्दल आणि हिंडायचे म्हणा, एक छुपे प्रेम आहे. अर्थात ते प्रेम फक्त शिव्या घालून आणि whatsaap वर खूप त्रास झाला तर group सोडून वगरे व्यक्त केले जाते आज काल. समोर येऊन फारशी भांडणं होत नाहीत. कारण मी म्हणालो तसे ती प्रेमाची असतात. असो. त्यामुळे मी आणि उप्या वेळेवर निघालो आणि ताम्हिणी वाटे मानगड ला पोचलो. निजामपूर अलीकडे मस्जिदवाडी पाशी हा एक छोटासा किल्ला आहे. किल्ला बघून वाटलं की त्याच वेळी सहज झाला असता आणि ही भांडणं टळली असती.
किल्ले मानगड
विंझाई माता मंदिर
अवशेष
छान बुरुज
प्रमुख दरवाजा. एक चोर दरवाजा पण आहे. नीट दिसला नाही आम्हाला.
जय बजरंगबली
पाण्याच्या टाक्या शेजारी एक छान गुहा आहे. तिथे २० जन सहज राहू शकतील.
गड पायथ्याशी एक शंकराचे खूप जुने पडलेले मंदिर आहे. त्या काळात या मंदिराचे काही वेगळेच आणि भव्य रूप असेल याची जाणीव झाल्या शिवाय राहत नाही.
मानगड झाला. आम्ही वेळेवर घरी पोचलो. ताम्हिणीतून जायचे होते आणि पाऊस पण खूप पडत होता. अन्या गण्या पक्या ईज्या बंड्या जनता बनियान वर full tight , टांगा पलटी घोडे फरार, दिसेल त्या पाण्यात घाण करत होती. पण आम्ही वाचलो, कारण traffic jam ची सुरुवात नुकतीच झाली होती. येतांना Paradise मध्ये जेवलो आणि घराकडे परत निघालो. आज मन नाही लागलं गड किल्ला बघतांना. घराची ओढ, जी मला कधीच नसते ती आज मात्र त्रास देऊन जात होती. मृगगड करायचा plan होता पण नको वाटलं. बाबाच्या आठवणी आल्या डोळ्या समोर आणि क्षण सरलेले स्पर्श करून गेले. आज त्यांना माझी गरज आहे, ही भावना नसून, मला त्यांची आहे आणि त्यामुळे मी परत गेलो. आज पण मी आई बाबांच्या घरी राहतो. ते माझ्या घरी नाही राहत. आज पण कधी तरी बाहेर जातांना मी त्यांच्या कडे पैसे मागतो. माझे ATM आहेत ते प्रेमाचे आणि अर्थात अर्थाचे पण :-).
No comments:
Post a Comment