मृगगड
श्रावण जवळ आल्याची चाहूल लागली. पावसाच्या सरींनी आणि वातावरणातल्या बदलांनी या ट्रेक ची मजा काही वेगळीच होती. लोणावळा खंडाळा परिसरात जिथे या वेळी तुडुंब गर्दी असते, त्याच वेळी त्याच परिसरात असलेल्या या मृगगडावर मात्र फक्त आमचीच गर्दी होती. Tiger Valley परिसरात हा एक लपलेला किल्ला. मी उपेंद्र आणि चेतन जरा निवांतच निघालो. अभंगवाणी आणि त्यानंतर J Krishnamurthy lectures ऐकत ऐकत १० - १५ km रस्ता चुकलो. खोपोली हुन पाली कडे जाणाऱ्या रस्त्यावर जांभुळपाडा नावाचे गाव आहे, तिथूनच रस्ता पुढे भेलीव नावाच्या गावी जातो. हेच ते पायथ्याचे गाव. गावातल्या शाळेपाशी गाडी लावून तिथल्या एक गावकऱ्याला घेऊन आम्ही किल्ल्यावर जायला निघालो. वाटाड्या नक्की हवा. इथे जंगल आहे आणि हरवायला होते.
किल्ला वर जाई पर्यन्त तसा सोपा आहे. पण शेवटचा टप्पा कठीण आहे आणि काळजी घ्यावी. वजनदार माणसांनी तर नक्कीच. माझ्या सारख्या.
पावसाळ्यात ट्रेकिंग म्हणजे जितकी मजा असते तितकीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. खूप घसरडे असते आणि नक्की आपटण्याचा धोका असतो. एकदा तरी पृष्ठभाग शेकून निघतो. इथे risk जास्त आहे कारण पडले तर वर जायची शक्यता नाकारता येणार नाही. आमच्याबरोबर दळवी म्हणून गृहस्त आले होते, सांगत होते की मागील आठवड्यात एकाचे डोके फुटले. असो . काळजी घ्या.
ट्रेक खूप छान झाला. बाप्पा मोरया.
श्रावण जवळ आल्याची चाहूल लागली. पावसाच्या सरींनी आणि वातावरणातल्या बदलांनी या ट्रेक ची मजा काही वेगळीच होती. लोणावळा खंडाळा परिसरात जिथे या वेळी तुडुंब गर्दी असते, त्याच वेळी त्याच परिसरात असलेल्या या मृगगडावर मात्र फक्त आमचीच गर्दी होती. Tiger Valley परिसरात हा एक लपलेला किल्ला. मी उपेंद्र आणि चेतन जरा निवांतच निघालो. अभंगवाणी आणि त्यानंतर J Krishnamurthy lectures ऐकत ऐकत १० - १५ km रस्ता चुकलो. खोपोली हुन पाली कडे जाणाऱ्या रस्त्यावर जांभुळपाडा नावाचे गाव आहे, तिथूनच रस्ता पुढे भेलीव नावाच्या गावी जातो. हेच ते पायथ्याचे गाव. गावातल्या शाळेपाशी गाडी लावून तिथल्या एक गावकऱ्याला घेऊन आम्ही किल्ल्यावर जायला निघालो. वाटाड्या नक्की हवा. इथे जंगल आहे आणि हरवायला होते.
किल्ला वर जाई पर्यन्त तसा सोपा आहे. पण शेवटचा टप्पा कठीण आहे आणि काळजी घ्यावी. वजनदार माणसांनी तर नक्कीच. माझ्या सारख्या.
पावसाळ्यात ट्रेकिंग म्हणजे जितकी मजा असते तितकीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. खूप घसरडे असते आणि नक्की आपटण्याचा धोका असतो. एकदा तरी पृष्ठभाग शेकून निघतो. इथे risk जास्त आहे कारण पडले तर वर जायची शक्यता नाकारता येणार नाही. आमच्याबरोबर दळवी म्हणून गृहस्त आले होते, सांगत होते की मागील आठवड्यात एकाचे डोके फुटले. असो . काळजी घ्या.
भेलीव नावाचे हे एक छान गाव आहे. ५० तरी घरे असतील. तिथल्या शाळेत आजूबाजूकडचे सर्व धरून ६० विद्यार्थी आहेत. Typical Indian Village. ३ बाजूला डोंगर रांगा आणि मध्ये हे गाव. तिथे बसलो चहा पीत तेव्हा घरातल्या स्त्रिया व मुलं काही ना काही काम करत होत्या. कपडे, भांडी घासणे, लहान मुलांना जेवण देणे ..... हे सर्व चालू असतांना एकमेकांशी गप्पा चालू होत्या...असा वाटत होतं की हे सर्व एक मोठे कुटुंब आहे. खूप छान वाटलं. पुण्यात दुकानात चटणी मागितली की आधी हाथ पुढे करतात. पैसे द्या म्हणून. हा संधर्भ जरा जुना आहे. लक्षुमी रस्तावर एक जनसेवा नावाचे खूप जुने दुकान होते. अर्थात तिथे जे काही खाणे मिळायचे ते उत्तम चवीचे होते. पण तिथले वेटर आणि मालक महा मझुर्डे. तेव्हाच एकदा तिथे सामोसा का काही तरी खायला गेलो असतांना चटणी चा विषय झाला. अर्थात निघतांना पुणेरी भाषेत अपमान करून निघालो. काही वर्षात दुकान बंद पडले हे ऐकण्यात आले. असो. तर त्या गावात चहा पितांना धपाटे खात होतो तर त्या काकूंनी आपणहून लसूण चटणी आणून दिली. 'माणुसकीचे औंश आज कुठ टिकून असतील, तर ते खेडयांत...(पु ल). पण इथे कोणी सुबक ठेंगणी दिसली नाही. ' :-) :-). सांगायचे तात्पर्य म्हणजे हे गाव सुंदर होते. वीज अली होती, पण नव्हती ते सांगायला नको. पण एक कळले की इथे अपघात झाला तर काही वैद्यकीय सेवा नाही. अशा वेळी काय करायचं. आपण एक पाहुणे, पण इथे राहणाऱ्या लोकांनी काय करायचं. आमच्या मनात एक विचार येऊन गेला की आपण या बद्दल काही तरी करावे. एक Medical Kit असावे. तिथे ठेवावे आणि दर काही दिवसानी refill करावे. नुसते तिथे नाही तर किल्ल्यांवर सुद्धा काही एक जागा असावी जिथे हे kit ठेवले जाऊ शकेल. साधे पण उपयोगी. अर्थात चोरी होऊन सुद्धा, त्याचा औषध / उपचार या शिवाय काहीही उपयोग नसल्याने त्यांनी पण कुणाला तरी फायदाच होणार आहे. जर तुमच्या पैकी कोणी या संधर्बात काही माहिती, सल्ला देऊ इच्छितो तर नक्की द्यावा.
गडावर गेल्यावर भवानी मातेच्या बहिणीचे मंदिर आहे. हे पहिल्यांदाच पहिला.ट्रेक खूप छान झाला. बाप्पा मोरया.
भवानी मातेची बहीण
जोड गोळी.
No comments:
Post a Comment