इंद्राई
सातमाळ डोंगर रांगेत हा अजून एक बलाढ्य किल्ला. इंद्राई. चांदवड करून आम्ही मारुती मंदिरात आसऱ्याला आलो. रात्री मंदिरात छान झोप लागली. लोकांची इंजिन्स चालू होती, घोरण्याची. मंदिरात मारुतीच्या पायाशी एक दिवा मिणमिणत होता. त्या प्रकाशात रात्र निघाली. चेतन ला घोरण्याचा आवाज काही सहन झाला नाही आणि तो परत गाडीत जाऊन झोपला. सकाळी मी उठलो तेव्हा ५.३० वाजले होते आणि शेजारची जागा रिकामी होती. इतर मंडळी पण जागी होऊ लागली आणि काही वेळातच तिथे आवराआवर चालू झाली. वाघ आणि जोशी यांनी पाणी तापवायला घेतले आणि सर्वांना आपापली भांडी आणायला सांगितली.
सकाळ सकाळ फक्कड चहा मिळाला. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आम्ही आलो तेव्हा जसा स्वछ होता तसेच जातांना करून तिथून गडाकडे निघायचे ठरवले. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. वाघ्या एकट्यानेच हा किल्ला केला असल्याने, पण वडबारे मार्गानी न केल्याने ही वाट सर्वानाच नवीन होती. गावाच्या डाव्याबाजजूनी टाकी च्या शेजारून एक छान मोठा रस्ता आहे, गाडी जाऊ शकेल इतका. खूप खडबडीत आहे अर्थात. हा रस्ता पकडून सरळ जावे.

किल्ला दिसायला जरा वेळ लागतो. डावी कडे बांध दिसतात आणि वर साडेतीन ऱ्होडगं नावाचा एक डोंगर आहे. त्या पठारावर धनगराचे एकमेव घर आहे. तिथल्या आजी बरोबर वार्तालाभ करून आम्ही पुढे निघालो. समोर लांब वर पठारावर एक मंदिर दिसते. गडावर जाण्याचा रस्ता उजवीकडून आहे. तसे अंदाजानी वर चढायला सुरु केलं. पण नंतर वाट सापडली. एका डोंगरावरून रस्ता गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. माची म्हणा हवं तर. तिथे एक सुंदर मारुतीची मूर्ती आहे. सोंडेवरून वर चढता कातळात कोरलेल्या पाहिर्यांपाशी जाऊन पोचतो. खूपच मोठा गड आहे, यात काही वाद नाही.
मी आणि चेतन, सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघालो. खाली उतरतांना थोडेसे चुकलो. डोक्यावर ऊन येऊन पोचले होते. रस्ता चुकल्याने पायपीट जरा जास्तच झाली. गावात येऊन त्याच टाकी वर हाथ पाय धून आम्ही पुण्याकडे यायला निघालो. दोघेही तसे दमलो होतो. २२५ - २४० km चा प्रवास करून आणि मंचर राजगुरूनगर चाकण भोसरी सारख्या आत्यंतिक भयंकर ट्रॅफिक मधून जाण्याच्या कल्पनेनी अंगावर काटा आला. संगमनेर च्या अलीकडे वेगात असतांना एका वळणावर Harrier चे पुढचे tire burst झाले. फुटले. सुदैवानी गाडी वर ताबा ठेऊन आम्ही कडेला आलो आणि पहिले तर Tire च्या चिथड्या उडाल्या होत्या. दुसरे Tire काढून fit करून तिथून आम्ही निघालो. हवा भरायला थांबलो तेव्हा तिथला मराठी अण्णा म्हणाला की तुम्ही जिवंत कसे ? अहो या वळणावर खूप सारे अपघात झाले आहेत आणि माणूस मारतोय की. मी त्याला म्हणालो आम्ही आहोत जिवंत. भूत नाही. हवा भर. तिथल्याच बारक्याला आवाज दिला आणि हवा भरून तिथून निघालो. मला वाटतं राजगुरूनगर हुन नाशिक ला जायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ राजगुरूनगर हुन पुण्याला यायला लागतो. तुम्ही पाहिले आहे का नाही मला माहित नाही पण या रस्त्यावर तिथे Intersections आहेत त्याच्या अलीकडे नाही तर पलीकडे Flyover केले आहेत ज्याचा घसरगुंडी सोडून काहीच उपयोग नाहीये. Flyover उतरला की आला चौक. १. ३० pm ला निघालेलो ५ च्या सुमारास मंचर ओलांडले. तिथून घरी पोचे पर्यन्त ८. ३० वाजले होते.
इंद्राई ला परत जाणे गरजेचे आहे. तिथे एक रात्र राहूनच तिथली मजा लुटली पाहिजे. नाशिक आजूबाजूचे किल्ले आणि त्यांच्या बद्दल मला असलेला कुतूहल दिवसेन दिवस वाढत चालेले आहे. या प्रवासाला आत्ताशी सुरुवात झाली आहे. इथे असलेले सर्व किल्ले एक एक करत पूर्ण करायचे स्वप्न आहे.
No comments:
Post a Comment