Tuesday, 12 June 2018

कोथळीगड / पेठ चा किल्ला


कोथळीगड
वामन माईणकर. चेतन चा शाळेतला मित्र. आणि त्यामुळे स्वाभाविक माझापण मित्र. मी त्याला common म्हणतो, काही त्याला वाम म्हणतात तर काही अजून काही. अमेरिकेत राहतो. कालच सकाळी पोचला भारतात. मला वाटलं की  हा येणार नाही, पण आला. ५ चे ६ झाले. नंतर शिरीष पण म्हणाला मी येतो. त्याला कर्जत ला गाठला आणि ६ चे ७ जण  झाले. खूप मजा आली. बी डी ची गाडी हा एक खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता. त्यांनी गाडी घेऊन तब्बल दोन वर्ष झाली तरी गाडी पाहायला मिळाली नव्हती. ती आज मिळाली. Highway वर tire  burst झाले आणि ट्रेक चा शुभारंभ झाला. Thar घेतली होती. त्यात सर्व लोक कोंबून बसलो आणि कोथळीगडा कडे निघालो. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती आणि सर्वत्र हिरवेगार होते. उन्हाळ्यातून काळे होऊन आम्ही सर्व पावसाळ्यात भिजायला तयार झालो. कोथळीगड इतिहास खूप मोठा आणि तिथे अनेक युद्ध झाले. रक्तपात झाला. गड बघायला खूप मोठा आहे, असे नाही पण तिथे जे आहे ते कुठे नाही हे गेल्यावर कळलं. असं  खरं  म्हणाल तर सर्वच गडांविषयी आपण म्हणू शकतो. पण इथे काही तरी  विशेष आहे. तिथे पण गर्दी होती. मुंबई ची खूप लोक तिथे आले होते. कर्जत हुन आंबिवली नावाच्या गावी गेलो. तिथून साधारण ४ कि मी चालत जाऊन पेठ नावाचे गाव आहे. तिथून किल्ला साधारण ४५ मी आहे. आंबिवली ला पोचलो तेव्हा साधारण ९ वाजले होते. तिथे parking मध्ये आधीच काही गाड्या व दुचाकी आणि एक बस असे उभे होते. तेव्हाच कळलं की इथे गर्दी आहे. या गावातून पेठ कडे जायला खूप खडबडीत रस्ता आहे. पण Thar असल्यामुळे आम्ही ठरवलं की चला. THAR घेऊन त्या रस्त्यावर निघालो. वर खाली डोकी आपटत पुढे मागे होत, THAR पेठ पर्यन्त वर चढवली. हा रस्ता खूप कंटाळवाणा आहे. १ तास जातो पोचे पर्यन्त. जातांना आधी पोचलेले लोक चालतांना दिसत होते. चालायचेच. त्यात काही सुबक ठेंगण्या पण असल्यानी  मुलांना चेव चढला होता. चाळिशीतले सर्व चोर बरोबर जमले की परत कॉलेज मध्ये पोचतात. अर्वाच्य शिव्या आणि आत्यंतिक घाण बोलणं. नंतर हसवून आणि हसून आनंद लुटणं. आहे काय त्यात. न पैसे  पडतात ना काही. निखळ आनंद मात्र. पेठ ला पोचलो आणि गाडी पार्किंग केली ( मराठीत park केली असं  नसून parking  केली असे म्हणतात). "तिथे करा ना jeep parking" जेवण ज्याच्या बरोबर केलं तो गावकरी म्हणाला. त्याला आलोच सांगितले व आम्ही तयार हुन किल्ल्या कडे निघलो. रस्ता मस्त जंगलातून आहे. खूप सुंदर आहे. चढण थोडंसं अंगावर येते पण विशेष काही नाही. उपेंद्र कालच गडावर जाऊन आला होता. त्यांनी ट्रेक ची तयारी चालू केली होती. मी पण या आठवड्यात चालू करणार आहे. पावसाच्या सरी येत जात होत्या आणि त्यामुळे शीण अजिबात जाणवत नव्हता. वाट मळलेली आहे. खाली इतिहास आणि काही फोटो आहेत ते जरूर बघा. हा किल्ला कर्जत भागातील किल्ल्या मधला पहिला किल्ला. आता इथले किल्ले सुरु करायचे. लोणावळा खंडाळा कर्जत माथेरान चालू. कोथळीगड - नाव पण काय विशेष आहे. किल्ला उरकून आम्ही खाली पोचलो. मित्रानी मस्त गरम गरम तांदूळ भाकरी आणि पिठलं केला होता. ते खाऊन तृप्त झालो. उतरतांना मात्र खूप पाऊस होता. संपूर्ण भिजलो होतो. पण तसेच पुढे निघालो. एक  गुहा आणि भिवगड करायचा होता. चड्डी नि extra socks आणले होते, good idea. Next time onward this will happen. The whole experience was as usual very beautiful. This is now every weekend thing that is happening since last 7 months and not a single sole wants to stop anywhere. This is something we all look forward to. Some aim in life, short term, might be, but so be it. At times, come Wednesday we start discussing about the weekend trek and then we all are in the zone. Travelling gives you experiences that none can compete with. In this journey or towards the end you can say, there is more than enough learnt. Enjoy the blog and do comment, good or bad.

इतिहास :
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.

दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.

गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता. ( ref - trekshitiz)
थोडे वर गेल्यावर उजवी कडच्या बुरुजाकडून एक वाट वर जाते आणि दुसरी दरवाज्या कडे जाते, डावीकडून. चुकण्यासारखा काही नाही. आम्ही बुरुजाकडून वर गेलो.
या बुरुजाकडून किल्ल्याकडे जाऊ शकता. तिथे एक छोटीशी गुहा आहे. त्यात साधारण ८ ते १० लोक राहू शकतात. पुढच्यावेळी नक्कीच तिथे राहण्याचा बेत आहे.



देवीचे मंदिर 


भैरोबा  ची गुहा 


कातळातल्या कोरलेल्या पाहिऱ्या 








गडाचा विस्तार तास छोटा आहे. हा किल्ला एक watch tower म्हणून उपयोगात असावा असे वाटते. 



भैरोबा 




















2 comments:

  1. अशक्य धमाल आली आणि खूपच मस्त अनुभव :)

    ReplyDelete

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...