Saturday, 26 January 2019

कळसुबाई - उंच आभाळातली

कळसुबाई  

कालचा दिवस स्वर्गीय पार पडला. पायांना पण ते जाणवत होते. रतनगड वर निवांत वेळ घालवून संपूर्ण पाहून साधारण १६ कि मी चालणे झाले होते. ट्रेकिंग झाले होते. अमृतेश्वर मंदिर पाहून खरंच मन भरले. ट्रेक करून आम्ही कॅम्पिंग करायचे ठरवले होते, आणि तशी सर्व तयारी पण केली होती. भंडारदरा, काठाशी कॅम्प लावून छान संध्याकाळ पाण्या शेजारी सूर्यास्त बघत घालवावी, असा विचार मनात होते. रतनवाडी हुन निघालो आणि भंडारदरा काठाशी पोचलो. डावीकडे पहिला तर साधारण १०० एक tents आधीच लागली होती. music चालू होते आणि तिथे Watersports  वगरे activities  चालू होत्या. एकंदरीत बाजार भरला होता. बसेस, गाड्या अश्या असंख्य वाहनांनी ती जागा पूर्ण भरून गेली होती. तिथला आनंद घेणे अशक्य होते. त्यामुळे तिथून निघालो आणि एक सामान्य हॉटेल मध्ये येऊन टेकलो. आवराआवर करून एक समाधान नावाच्या छोट्याश्या पण अत्यंत चविष्ठ अशा ठिकाणी जाऊन जेवलो. तिथे गेलात तर समाधान मध्ये नक्की जेवण करा, अप्रतिम आहे. तिथले वेटर काका मध्येच english मध्ये बोलत होते. का माहित नाही. जेवण करून आम्ही सर्व गाड झोपी गेलो. 
सकाळी ६ ला निघायचा बेत होता. तसे उठून चहा पाणी करून आम्ही साधारण ६. ३० ला निघालो आणि ७ ला कळसुबाई च्या पयाथयशी पोचलो. Geography मध्ये महाराष्ट्र शिकत असतांना हे नाव आले होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कुठले तर कळसुबाई. तिथे गेल्यावर हा काय प्रकार आहे हे नक्कीच कळले. उजाडत होते आणि वर दिव्यां चा प्रकाश हलताना दिसत होता. खूप लोक तिथे वर आहेत याची जाणीव झाली. खूप म्हणजे नंतर कळले की साधारण १००० लोक तरी असतील सहज. आम्ही निघालो. चालायला सुरु केले आणि वाटेवर वेगवेगळ्या टपऱ्या लागत होत्या. सर्व प्रकार चे अन्न मिळत होते. टप्प्या टप्प्यात, सपाटीवर ही  सर्व हॉटेल्स छान बसली होती. चढायला लागलो की कळत नाही की हा डोंगर किती मोठा आहे. एका टप्प्यावर आलातकी  पुढचा दिसतो आणि पुढचा टप्पा तेव्हडाच मोठा आहे हे तेव्हा कळते. २ तास न थांबता एका वेगानी आम्ही चढत वर पोचलो. वरच्या टप्प्यात शिड्या आहेत. आणि इथेच प्रचंड गर्दी होते. 
माथ्याच्या पायथ्याशी सर्व सुखसोई आहेत. राहायची सोय आहे. तिथे साधारण रु ७०० per  head  घेऊन tent  लावून देतात. जेवण छान मिळते आणि एक विहीर आहे त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम नाही. त्याच हॉटेल / टपऱ्यांमध्ये आदल्या दिवशी आनेक  ट्रेकिंग club ची पोरं पोरी आल्या होत्या. मुंबई आणि त्या भागातील मंडळी जास्त होती. एकंदरीत वातावरण, दृश्य :-) सुंदर होते. असे काही असेल याची कल्पना नव्हती त्यामुळे पोरांचा शीण क्षणात निघून गेला. 
कळसुबाई चे मंदिर माथ्यावर आहे. तिथून अलंग मदन कुलंग चे दृश्य खूप सुंदर दिसते. त्या किल्ल्यावर कधी जायचा योग येईल माहित नाही. 
मानसिक आहे, पण कळसुबाई केल्यावर एक वेगळाच आनंद मिळाला. इथे तुमच्या स्टॅमिना ची नक्कीच कसोटी आहे. तुमचा fitness नक्कीच टेस्ट होतो. अर्थात सर्वात मोठे शिखर आहे, महाराष्ट्रातले. वर एक तासभर थांबून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. गाडी पाशी विहिरीवर almost  पोरांनी अंघोळी केल्या, खादाडी केली आणि गाडीत  बसून परतीच्या मार्गावर आम्ही निघालो. नारायगाव ला भुजबळ बंधूंचे  एक हॉटेल आहे श्रीराज नावाचे. तिथे मटण भाकरी आणि मासवाडी चेपली आणि घराकडे निघालो. आमचा ट्रेक छान झाला. पुढच्या weekend चा काय प्लॅन यावर चर्चा सुरु होईलच.





































2 comments:

  1. Ata AMK kara plan...
    Ekatra nahi,each fort seperate seperate...

    ReplyDelete
    Replies
    1. Nakki karu...akatra pan try karu, kadachit jamel pan...

      Delete

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...