Tuesday, 29 May 2018

लोहगड

लोहगड

बाकी काही लिहिण्य आधी मला वाटतं एक माझी आठवण तुम्हाला सांगावी. मी भूषण घोरपडे उर्फ वाष्ट्या, आमोद गद्रे उर्फ जाड्या, आशुतोष भडभडे उर्फ तोष, कौस्तुभ देशमुख उर्फ कौस्त्या आणि स्व. अतुल वैद्य उर्फ आतल्या असे जिवाभावाचे मित्र, शाळेत असतांना या ठिकाणी आलो होतो. लोकल नी  मळवली  ला उतरून चालत भाजा च्या लेण्यात राहून हे दोन किल्ले केले होते. लोहगड आणि विसापूर. मला वाटतं मी तेव्हा ८ मध्ये  होतो. आमचा मुलांचा एकटे जाण्याचा पहिलाच ट्रेक. जाड्याचे वडील काही त्याला सोडत नव्हते, म्हणून त्यांना पटवायला मला नेले होते. हा ट्रेक नसून ट्रिप आहे, व आम्ही तिथे एक धर्मशाळेत राहणार आहोत जिथे माझे एक ओळखीचे आहेत. ते आमची सोय करणार आहेत आणि जेवण व राहणं त्यांच्या  कडे लागलं  आहे. आत्मविश्वास काय असतो हे तेव्हा मला कळले. कदाचित बरेच वेळेला बऱ्याच विषयात इंजिनीरिंग ला नापास होऊन एकदाही orals मध्ये नापास झालो नाही हे त्याचमुळे . आमोद नी त्यामुळे येतांना कामाची चे बूट एक बॅग व काही छान  कपडे  बरोबर आणले होते. तुफान पाऊस होता आणि त्याचे बूट फाटले व बॅग तुटली. अर्थातच हा ट्रेक होता तेव्हा. ट्रिप नाही. दर क्षणी आम्ही इतर मित्र त्याला हसत होतो आणि आज पण तो ट्रेक उर्फ ट्रिप चा विषात निघाला कि हसू येते. तेव्हा त्या लेण्यां मध्ये खूप वटवागूळ  होती आणि त्यांनी रात्री सर्वांना रंगवलं  होतं . तिथे छान शेकोटी केली होती आणि खिचडी शिजवली होती. आता सर्व बंद केला आहे तिथे. काही करू देत नाही आणि राहू पण देत नाहीत. अर्थात काही समाज कीटकांनी घाण करून टाकली आहे. यांना बापाचा राज्य आहे असे वाटते आणि त्यामुळे कुठेही काहीही करू शकतील हा आत्मविश्वास आला आहे. पुढाऱ्यांचे तट्टू नाही तर किरकोळ अक्कल असलेल्या आणि काही दिवस भाई म्हणून राबणाऱ्या कुठल्यातरी गल्लीतले छोटे गुंड. किंवा याच्याशी ओळख आहे, तो भाऊ आहे म्हणून दम देणारे छक्के इतके वाढले आहेत की यांची स्वच्छता करणे खूप गरजेचे झाले आहे. महाराज म्हणायचं आणि इथेच येऊन घाण करायची. गडाखाली गाडी वर मोठं  महाराजांचा चित्र, आणि गडावर येऊन हागणाऱ्या  ह्या लोकांनी सर्वत्र घाण केली आहे. माफ करा. माझा संताप तुम्हाला कळेल जर तुम्ही या पवित्र ठिकाणी पोचलात तर. असो.
तर असे हे दोन किल्ले . लोहगड आणि विसापूर.
लोहगड बद्दल सांगायचं तर भारतीय पुरातत्व विभागाने अत्यंत उत्तम असे काम केले आहे. गडावर जाण्यासाठी नीट पाहिऱ्या, वर जातांना नकाशा, स्वछता, वर सर्वत्र कचराकुंड्या ठेवल्या आहेत. तरी सुद्धा हे न वापरणारी काही मूर्ख माणसं  दिसतात. मग त्यांना नम्र भाषेत जमलं तर सांगावे. नाही ऐकलं तर काठीने बदडून काढावे.  लोहगडावर बघण्या सारखे खूप काही आहे. त्यातील काही फोटो खाली आहेत. पण तिथे जाऊनच अनुभव घ्यावा. सहल म्हणून आता लोहगडावर आता सहज जाता  येते. खाली गाडी लावावी आणि वर जावे. पार्वती इतका चढायला आहे. वर पाहायला खूप आहे आणि साधारण २ तास जातात. विंचूकाट्या पर्यन्त आता नीट रस्ता केला आहे. किरकोळ ट्रेकिंग चा अनुभव घेता येतो. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे सुंदर चार दरवाजे आहेत. तटबंदी अजून शाबूत आहेत. अप्रतिम दगडांनी बांधलेला हा किल्ला खूप देखणा आहे. इथे आलो की कळतं  किंवा अंदाज येतो कि इतर किल्ले कसे असतील. शान, श्रीमंती, ताकद काय असेल ते इथे आलं की  कळतं. इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. अंगावर काटा येतो. या किल्ल्यांची खूप वेगवेगळे राजे महाराजे पहिले आहेत. दगडादगडावर नीट पहिले तर सर्व उमटलेले दिसेल. रक्तपात दिसेल.
 कान लावाल तर घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतील. लोहगड काही औरच आहे.

इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. (Ref - Trekshitiz)


 































Sunday, 20 May 2018

बिरवाडी

बिरवाडी

रोहा च्या आजूबाजूस चार किल्ले आहेत. त्यात बिरवाडी, अवचितगड, तळा आणि घोसाळगड असे किल्ले आहेत. नीट नियोजन केले तर हे सर्व किल्ले दोन दिवसात बघून होतात. या खेपेला बिरवाडी आणि अवचित करायच ठरवलं.

बिरवाडी किल्ला रोहा पासून १८ कि मी वर आहे. बिरवाडी नावाचं गाव आहे. तिथे  एक खूप मोठा भवानी मातेचा मंदिर आहे. तिथूनच रस्ता गडावर जातो. गाडी पायथ्यापाशी लावता येते. एक रस्ता मंदिराच्या डाव्या बाजूनी, म्हणजे न पायऱ्या चढता खालूनच पुढे जातो. जातांना एक खूप मोठा झाड लागेल. तो रस्ता पकडून, गडाचा डाव्याबाजूनी वर जाण्याचा मार्ग आहे. तिथे मळलेली वाट आहे आणि सहज ३० मी मध्ये वर पोचता येते. आम्हाला ही वाट माहित नव्हती त्यामुळे उतरतांना ही वाट वापरली.

भवानी मातेच्या मंदिरा कडून गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. तिथे महाराजांचा एक पुतळा आहे. त्यामागून वर जायला रस्ता आहे. चढ आहे. बुरुज पाशी पोहचल्यावर डाव्या बाजूनी रस्ता थेट किल्ल्याच्या महादर्वाज्या पाशी नेतो. या गडावर बऱ्याच टाक्या आहेत आणि काही वाड्याचे अवशेष बघायला मिळतील. सात बुरुज आहेत.

उन्हाळा होता आणि त्यात दुपारी १. ३० ची वेळ. पाणी बरोबर ठेवावे.

इतिहास :
इ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
ref - trekshitiz

Both Avachit and Birwadi happened. We had decided to do these treks a month ago, but for some or another reason it was not happening. We had a great time. Stamina testing. Karnataka elections were just happened and BJP had won maximum seats. They had to prove the majority and we came to know towards the end of the day that they could'nt. So the discussions were based on politics and India, progress and governance etc. Since BD was there, Maharaj and the discussions with stories is always a part of the trek. Its interesting what you can know about people when you travel.

On the way to Birawadi, just after you leave Roha and turn left near the bridge, within less than a KM, there is a small place, eatery of a Muslim couple. We stopped there after the Avchit trek to have a bite. IF you like food and understand taste, you should eat at this spot. I enjoyed the food, freshly cooked and hot. Try it. Traveling in Konkan is a treat in itself. The beautiful nature, amazing food and the language. Konkani language.

More later.
















अवचितगड


अवचितगड

मागच्या आठवड्यात आजारी पडल्यामुळे मी काही ट्रेक ला जाऊ शकलो नाही. पण टीम गेली होती. त्यांचा सुधागड राहिला होता. त्यामुळे ट्रेक मध्ये खंड पडला नाही याचा आनंद. In trekking even if one person makes it to the summit the team wins. Cause for the one to reach the top, the whole team is supporting. Same way, as decided that we will be trekking for 52 weekends, there has not been a single lost weekend. Just something the whole team looks forward to. चड्डी या प्रथेला 'रुह की खुराख' म्हणतो ते काही वावगं नाही.
मी, उप्या आणि बरेच दिवसांनी आलेला बिडी असे तीन तीगाडा निघालो. या ट्रेक ला पनवती लागली होती. खूप दिवस झाले ठरून पण या ना त्या कारणाने होत नव्हता. ताम्हिणी घाट ओलांडून कुंडलिनी नदीच्या  तीरावर हे किल्ले उभे आहेत. रोहा पासून साधारण ५ - ८ किमी च्या  अंतरावर. तिथून बिरवाडी साधारण १८ कि मी वर आहे. दोन्ही किल्ले एक दिवसात छान  पाहून होतात.

आम्ही मेढा मार्गे अवचितगडला पोचलो. गड चढायला अव्हगड नाही. साधारण ४५ मी मध्ये माथ्यावर पोचता येते.



मस्त विहीर आहे खाली. रस्ता  तिथून चालू होतो. वाटेमध्ये डाव्याबाजूला काही वीरगळी दिसतील. हा किल्ला जंगला तून असल्यामुळे इथे उन्हाचा तडाखा जरा कमी बसला. 



महादरवाजा आणि तटबंदी अजून काही प्रमाणात शाबूत आहे. वर गेल्यावर बघण्यासारखे खूप काही आहे. सुंदर किल्ला आहे. 



दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे एक शरभशिल्प आहे. 










There is huge water reservoir. Nicely crafted steps will take you to the waterline. 



महादेव मंदिर. 






सात टाक्यांमध्ये पिण्याचा पाण्याची सोय आहे. मंदिरामागून रस्ता आहे. 








किल्ल्यावर एक शिलालेख आहे असे म्हणतात. पण आम्हाला काही तो दिसला नाही. 
गडावर पोचलो असता तिथे दोन मुलं काही तरी काम करतांना दिसली. शिव शंभू प्रतिष्ठान चे ते कार्यकर्ते होते. त्यांनी गडावर झाडं लावायचं  काम हाती घेतलं होतं. गड नीट नेटका केला आहे. त्यांच्या कष्टानी बरेच काही नीट पाहता येतं. उन्हात निस्वार्थीपणे काम करत होते. बिडी नी विचारलं  की  तुम्ही काही देणगी स्वरूपात घेता का ? पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. एकंदरीत हा गड नक्कीच पाहण्या सारखा आहे. वरील बांधकाम, पाण्याच्या टाक्या आणि मंदिर खूप प्रसन्न आहे. 

मंदिरापाशी आम्ही थोडी विश्रांती घेतली, जवळ असलेलं थोडं खालले आणि त्या मावळ्यांना पण दिले. इथून बिरवाडी ला जायचे होते. त्यामुळे गड बघून आम्ही खालच्या वाटेला लागलो. 

शंभो !!!









महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...