लोहगड
बाकी काही लिहिण्य आधी मला वाटतं एक माझी आठवण तुम्हाला सांगावी. मी भूषण घोरपडे उर्फ वाष्ट्या, आमोद गद्रे उर्फ जाड्या, आशुतोष भडभडे उर्फ तोष, कौस्तुभ देशमुख उर्फ कौस्त्या आणि स्व. अतुल वैद्य उर्फ आतल्या असे जिवाभावाचे मित्र, शाळेत असतांना या ठिकाणी आलो होतो. लोकल नी मळवली ला उतरून चालत भाजा च्या लेण्यात राहून हे दोन किल्ले केले होते. लोहगड आणि विसापूर. मला वाटतं मी तेव्हा ८ मध्ये होतो. आमचा मुलांचा एकटे जाण्याचा पहिलाच ट्रेक. जाड्याचे वडील काही त्याला सोडत नव्हते, म्हणून त्यांना पटवायला मला नेले होते. हा ट्रेक नसून ट्रिप आहे, व आम्ही तिथे एक धर्मशाळेत राहणार आहोत जिथे माझे एक ओळखीचे आहेत. ते आमची सोय करणार आहेत आणि जेवण व राहणं त्यांच्या कडे लागलं आहे. आत्मविश्वास काय असतो हे तेव्हा मला कळले. कदाचित बरेच वेळेला बऱ्याच विषयात इंजिनीरिंग ला नापास होऊन एकदाही orals मध्ये नापास झालो नाही हे त्याचमुळे . आमोद नी त्यामुळे येतांना कामाची चे बूट एक बॅग व काही छान कपडे बरोबर आणले होते. तुफान पाऊस होता आणि त्याचे बूट फाटले व बॅग तुटली. अर्थातच हा ट्रेक होता तेव्हा. ट्रिप नाही. दर क्षणी आम्ही इतर मित्र त्याला हसत होतो आणि आज पण तो ट्रेक उर्फ ट्रिप चा विषात निघाला कि हसू येते. तेव्हा त्या लेण्यां मध्ये खूप वटवागूळ होती आणि त्यांनी रात्री सर्वांना रंगवलं होतं . तिथे छान शेकोटी केली होती आणि खिचडी शिजवली होती. आता सर्व बंद केला आहे तिथे. काही करू देत नाही आणि राहू पण देत नाहीत. अर्थात काही समाज कीटकांनी घाण करून टाकली आहे. यांना बापाचा राज्य आहे असे वाटते आणि त्यामुळे कुठेही काहीही करू शकतील हा आत्मविश्वास आला आहे. पुढाऱ्यांचे तट्टू नाही तर किरकोळ अक्कल असलेल्या आणि काही दिवस भाई म्हणून राबणाऱ्या कुठल्यातरी गल्लीतले छोटे गुंड. किंवा याच्याशी ओळख आहे, तो भाऊ आहे म्हणून दम देणारे छक्के इतके वाढले आहेत की यांची स्वच्छता करणे खूप गरजेचे झाले आहे. महाराज म्हणायचं आणि इथेच येऊन घाण करायची. गडाखाली गाडी वर मोठं महाराजांचा चित्र, आणि गडावर येऊन हागणाऱ्या ह्या लोकांनी सर्वत्र घाण केली आहे. माफ करा. माझा संताप तुम्हाला कळेल जर तुम्ही या पवित्र ठिकाणी पोचलात तर. असो.
तर असे हे दोन किल्ले . लोहगड आणि विसापूर.
लोहगड बद्दल सांगायचं तर भारतीय पुरातत्व विभागाने अत्यंत उत्तम असे काम केले आहे. गडावर जाण्यासाठी नीट पाहिऱ्या, वर जातांना नकाशा, स्वछता, वर सर्वत्र कचराकुंड्या ठेवल्या आहेत. तरी सुद्धा हे न वापरणारी काही मूर्ख माणसं दिसतात. मग त्यांना नम्र भाषेत जमलं तर सांगावे. नाही ऐकलं तर काठीने बदडून काढावे. लोहगडावर बघण्या सारखे खूप काही आहे. त्यातील काही फोटो खाली आहेत. पण तिथे जाऊनच अनुभव घ्यावा. सहल म्हणून आता लोहगडावर आता सहज जाता येते. खाली गाडी लावावी आणि वर जावे. पार्वती इतका चढायला आहे. वर पाहायला खूप आहे आणि साधारण २ तास जातात. विंचूकाट्या पर्यन्त आता नीट रस्ता केला आहे. किरकोळ ट्रेकिंग चा अनुभव घेता येतो. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे सुंदर चार दरवाजे आहेत. तटबंदी अजून शाबूत आहेत. अप्रतिम दगडांनी बांधलेला हा किल्ला खूप देखणा आहे. इथे आलो की कळतं किंवा अंदाज येतो कि इतर किल्ले कसे असतील. शान, श्रीमंती, ताकद काय असेल ते इथे आलं की कळतं. इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. अंगावर काटा येतो. या किल्ल्यांची खूप वेगवेगळे राजे महाराजे पहिले आहेत. दगडादगडावर नीट पहिले तर सर्व उमटलेले दिसेल. रक्तपात दिसेल.
कान लावाल तर घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतील. लोहगड काही औरच आहे.
बाकी काही लिहिण्य आधी मला वाटतं एक माझी आठवण तुम्हाला सांगावी. मी भूषण घोरपडे उर्फ वाष्ट्या, आमोद गद्रे उर्फ जाड्या, आशुतोष भडभडे उर्फ तोष, कौस्तुभ देशमुख उर्फ कौस्त्या आणि स्व. अतुल वैद्य उर्फ आतल्या असे जिवाभावाचे मित्र, शाळेत असतांना या ठिकाणी आलो होतो. लोकल नी मळवली ला उतरून चालत भाजा च्या लेण्यात राहून हे दोन किल्ले केले होते. लोहगड आणि विसापूर. मला वाटतं मी तेव्हा ८ मध्ये होतो. आमचा मुलांचा एकटे जाण्याचा पहिलाच ट्रेक. जाड्याचे वडील काही त्याला सोडत नव्हते, म्हणून त्यांना पटवायला मला नेले होते. हा ट्रेक नसून ट्रिप आहे, व आम्ही तिथे एक धर्मशाळेत राहणार आहोत जिथे माझे एक ओळखीचे आहेत. ते आमची सोय करणार आहेत आणि जेवण व राहणं त्यांच्या कडे लागलं आहे. आत्मविश्वास काय असतो हे तेव्हा मला कळले. कदाचित बरेच वेळेला बऱ्याच विषयात इंजिनीरिंग ला नापास होऊन एकदाही orals मध्ये नापास झालो नाही हे त्याचमुळे . आमोद नी त्यामुळे येतांना कामाची चे बूट एक बॅग व काही छान कपडे बरोबर आणले होते. तुफान पाऊस होता आणि त्याचे बूट फाटले व बॅग तुटली. अर्थातच हा ट्रेक होता तेव्हा. ट्रिप नाही. दर क्षणी आम्ही इतर मित्र त्याला हसत होतो आणि आज पण तो ट्रेक उर्फ ट्रिप चा विषात निघाला कि हसू येते. तेव्हा त्या लेण्यां मध्ये खूप वटवागूळ होती आणि त्यांनी रात्री सर्वांना रंगवलं होतं . तिथे छान शेकोटी केली होती आणि खिचडी शिजवली होती. आता सर्व बंद केला आहे तिथे. काही करू देत नाही आणि राहू पण देत नाहीत. अर्थात काही समाज कीटकांनी घाण करून टाकली आहे. यांना बापाचा राज्य आहे असे वाटते आणि त्यामुळे कुठेही काहीही करू शकतील हा आत्मविश्वास आला आहे. पुढाऱ्यांचे तट्टू नाही तर किरकोळ अक्कल असलेल्या आणि काही दिवस भाई म्हणून राबणाऱ्या कुठल्यातरी गल्लीतले छोटे गुंड. किंवा याच्याशी ओळख आहे, तो भाऊ आहे म्हणून दम देणारे छक्के इतके वाढले आहेत की यांची स्वच्छता करणे खूप गरजेचे झाले आहे. महाराज म्हणायचं आणि इथेच येऊन घाण करायची. गडाखाली गाडी वर मोठं महाराजांचा चित्र, आणि गडावर येऊन हागणाऱ्या ह्या लोकांनी सर्वत्र घाण केली आहे. माफ करा. माझा संताप तुम्हाला कळेल जर तुम्ही या पवित्र ठिकाणी पोचलात तर. असो.
तर असे हे दोन किल्ले . लोहगड आणि विसापूर.
लोहगड बद्दल सांगायचं तर भारतीय पुरातत्व विभागाने अत्यंत उत्तम असे काम केले आहे. गडावर जाण्यासाठी नीट पाहिऱ्या, वर जातांना नकाशा, स्वछता, वर सर्वत्र कचराकुंड्या ठेवल्या आहेत. तरी सुद्धा हे न वापरणारी काही मूर्ख माणसं दिसतात. मग त्यांना नम्र भाषेत जमलं तर सांगावे. नाही ऐकलं तर काठीने बदडून काढावे. लोहगडावर बघण्या सारखे खूप काही आहे. त्यातील काही फोटो खाली आहेत. पण तिथे जाऊनच अनुभव घ्यावा. सहल म्हणून आता लोहगडावर आता सहज जाता येते. खाली गाडी लावावी आणि वर जावे. पार्वती इतका चढायला आहे. वर पाहायला खूप आहे आणि साधारण २ तास जातात. विंचूकाट्या पर्यन्त आता नीट रस्ता केला आहे. किरकोळ ट्रेकिंग चा अनुभव घेता येतो. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे सुंदर चार दरवाजे आहेत. तटबंदी अजून शाबूत आहेत. अप्रतिम दगडांनी बांधलेला हा किल्ला खूप देखणा आहे. इथे आलो की कळतं किंवा अंदाज येतो कि इतर किल्ले कसे असतील. शान, श्रीमंती, ताकद काय असेल ते इथे आलं की कळतं. इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. अंगावर काटा येतो. या किल्ल्यांची खूप वेगवेगळे राजे महाराजे पहिले आहेत. दगडादगडावर नीट पहिले तर सर्व उमटलेले दिसेल. रक्तपात दिसेल.
कान लावाल तर घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतील. लोहगड काही औरच आहे.
इतिहास : | |
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. (Ref - Trekshitiz) |
No comments:
Post a Comment