Tuesday, 20 February 2018

सुधागड - 18.11.2017


सुधागड
18.11.2017

दर शनिवार दुपार साधारण १ -२ च्या सुमारास गडावर जाणे आता नित्याचे झाले आहे. अशाच एका शनिवारी भूषण ढेरे नावाचा मित्र माझा बरोबर आला. त्याला पण ट्रेकिंग ची तितकीच आवड जितकी मला. वर चढत असतांना, गप्पा टप्पा चालू होत्या आणि मी त्याला विचारलं, बिडी, चालू करायचे का ? काय - तो म्हणाला.
चालू करू परत किल्ले, करूया सर्व. दर weekend ला जायचे. १ वर्ष नियमित. येतोस का. बिडी नी लगेच होकार दिला आणि एका प्रथेला सुरुवात झाली. आता पुढे काय होणार काय नाही माहित नाही, पण चालू करायचे. ट्रेकिंग ची आणि हिंडायची आवड असल्यामुळे हे शक्य होणार त्यात मला काही शंका नव्हती. सुधागड हा पहिला गड ठरला आणि आम्ही निघालो. १८/११/२०१७.

पाली च्या बाप्पा पाशी दोन गड आहे. सरसगड आणि सुधागड. दोन्ही किल्ले मस्त आहे. 

गणपती मंदिर, पालीचे, डावीकडे ठेऊन रस्ता ठाकूरवाडी नावाच्या गावापाशी जातो. ५ कि मी सुद्धा नसेल. Main  रोड वर पाटी लावलेली दिसेल. किल्ल्याकडे रस्ता तिथून जातो. रस्ता सरळ आणि मळलेला आहे त्यामुळे चुकायचा काही विषय नाही. निवांत चालत, गप्पा मारत मी आणि बिडी १. १५ तासात गडावर पोचलो. वर जातांना शिडी लागते आणि तिथून वाट डाव्याबाजूनी पुढे गडावर जाते. आहे, बऱ्यापैकी चढायला आहे.


10.30 च्या सुमारास आम्ही वर पोचलो. आता हा किल्ला अजून किल्ला म्हणायला हरकत नाही कारण इथे वर चालत जाण्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे बाप्पा कडे बुद्धी मागणारी गर्दी इथे निर्बुद्धपणे घाण करायला आले नाहीत. या किल्ल्यावर मात्र एक दिवस पण कमी पडेल. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे. बघण्यासारखे खूप आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राहायची उत्तम सोय आहे. खुद्द पंत सचिवांचा वाडा दिमाखात उभा आहे.




सुंदर बांधकाम आहे आणि आत पाच पन्नास माणसांची राहायची सोय सहज होऊ शकते. आम्हाला तिथे राम मोरू शिंदे नावाचा माणूस भेटला - 8793571876, 9270263928. राहण्याचा बेत असेल तर नक्कीच फोन करून जा म्हणजे छान जेवणाची सोय होईल. आम्ही पोचलो आणि थेट वाड्यात गेलो. बऱ्यापैकी ऊन होते आणि त्यामुळे जाऊन जरा आडवे पडलो. बाहेर असलेल्या रखरखत्या उन्हाचा त्या वाड्यात काहीच परिणाम होत नव्हता. आत इतका गार आणि शांत होतं की क्षणभरत डोळा लागला. अर्ध्या पाऊण तासानी किल्ला पाहायला आम्ही बाहेर पडलो. वाड्याच्या बाहेरच एक आजी राहते. तिला विचारले जेवणाचे आणि हो म्हणल्यावर तिला भाकर पिठलं करायला विचारले. त्याला पण होकार आला. चला पॉट भागले.


तिथून मग आम्ही मंदिराच्या दिशेनी निघालो. शिव मंदिर वाड्याच्या मागेच आहे. तिथे काही मंडळी अली होती. पूजा आर्च्या चालू होत्या. आम्हाला म्हणाले की प्रसादासाठी नक्की या. दुर्दैवाने त्यांचा प्रसाद दुपारी ३ वाजता होता आणि आम्ही काही इतका वेळ थांबू शकलो नाही.


या किल्ल्याला भोराई चा डोंगर पण म्हणतात. इथे भोराई मातेचे मंदिर आहे. गडावर पोचलो तेव्हा समोरून  साधारण १५ - २० माणसं, बाया आणि पोरं येतांना दिसली. हा संसार घेऊन येत होते. त्यांना विचारले की तुम्ही इथे राहता का काय. तर ते म्हणले की नाय देवीच्या पूजेला आलो. इथेच ३ दिवस वर राहिलो आणि आता निघालोय. सुंदर मंदिर आहे. तिथेच आजूबाजूला खूप वीरगळी दिसतील.


वीरगळी 

आता या मंदिराकडून मागे गेलात की जे काही अशक्य दृश्य दिसते ते इथे सांगून तुमची मजा घालवणार नाही. कारण माझा कडे तास शब्दकोश कमीच आणि त्यात ते वर्णन करण्याची क्षमता पण तेव्हडीच. तिथे पोचलो तेव्हा खूप रणरणतं ऊन होतं. मंदिरात पोचलो आणि खूप छान वाटलं. काही तरी वेगळीच शांतता होती तिथे. मंदिरात मी आणि बिडी ध्यान लाउन बसलो. म्हणजे काय हे मला माहित नाही. पण दमलो होतो त्यामुळे ध्यानच म्हणायचं. मंदिराकडूनच पुढे जाऊन महादरवाजा आहे. तो जरूर पहा.  गडाच्या सर्व बाजूंना छान कडे आहेत. त्यांना टकमक टोक म्हणा नाही तर बोलते कडे. जे आहे ते खूपच सुंदर आहे. गडावर पाणी आहे. पण आपलं नेणे कधीपण चांगले. इथे यायचे असेल तर एक रात्र राहायला यायचे असे मी आणि बिडी नी ठरवले. 
जातांना सर्व शिधा घेऊन जा. तिथे भांडी आहेत आणि सर्व काही छान  शिजवता येते. 
सुधागड माझ्या लाडक्या किल्ल्यांमधला एक किल्ला झाला. 

मला दर वेळी वाटतं ते आत्ता पण वाटलं. की त्या काळात इथे काय होत असेल, कसे असेल, किती ते अप्रतिम असे बांधून ठेवले आहे. आज आपल्या कडे सर्व प्रकारे development झाली आहे. deisgn पासून ते materials पर्यन्त क्रांती झाली झाली आहे. पण तरी, लोकांना मोहून टाकेल, attract करेल, किंवा लोकं तिकीट काढून एखादी इमारत बघायला जातील असे काही नाही. जे आहे ते इंग्रजांनी केलेले नाही तर महाराजांनी. 
शक्यतो ह्या किल्ल्यावर ट्रेकिंग करणारे, निसर्ग जपणारे आणि खरे महाराज भक्त असणारे यांनीच यावे. नुसतं  जगदंब पाठीवर आणि गाडीवर लिहून यायचे आणि कल्ला करून जायचे. अर्थात आता गडावर दारू वगरे चुकून पण नेली / प्यायली तर गावकरी व आमच्या सारखे इतर तुडवतात हे बऱ्याच लोकांना माहित झाले आहे. 

Sudhagad – A must go trek for everyone.

इतिहास - याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली." 

शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.

सुधागड अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड-पाली तालुका असे आहे.
Ref: trekshitiz























No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...