
सुधागड
18.11.2017
दर शनिवार दुपार साधारण १ -२ च्या सुमारास गडावर जाणे आता नित्याचे झाले आहे. अशाच एका शनिवारी भूषण ढेरे नावाचा मित्र माझा बरोबर आला. त्याला पण ट्रेकिंग ची तितकीच आवड जितकी मला. वर चढत असतांना, गप्पा टप्पा चालू होत्या आणि मी त्याला विचारलं, बिडी, चालू करायचे का ? काय - तो म्हणाला.
चालू करू परत किल्ले, करूया सर्व. दर weekend ला जायचे. १ वर्ष नियमित. येतोस का. बिडी नी लगेच होकार दिला आणि एका प्रथेला सुरुवात झाली. आता पुढे काय होणार काय नाही माहित नाही, पण चालू करायचे. ट्रेकिंग ची आणि हिंडायची आवड असल्यामुळे हे शक्य होणार त्यात मला काही शंका नव्हती. सुधागड हा पहिला गड ठरला आणि आम्ही निघालो. १८/११/२०१७.
पाली च्या बाप्पा पाशी दोन गड आहे. सरसगड आणि सुधागड. दोन्ही किल्ले मस्त आहे.
गणपती मंदिर, पालीचे, डावीकडे ठेऊन रस्ता ठाकूरवाडी नावाच्या गावापाशी जातो. ५ कि मी सुद्धा नसेल. Main रोड वर पाटी लावलेली दिसेल. किल्ल्याकडे रस्ता तिथून जातो. रस्ता सरळ आणि मळलेला आहे त्यामुळे चुकायचा काही विषय नाही. निवांत चालत, गप्पा मारत मी आणि बिडी १. १५ तासात गडावर पोचलो. वर जातांना शिडी लागते आणि तिथून वाट डाव्याबाजूनी पुढे गडावर जाते. आहे, बऱ्यापैकी चढायला आहे.

सुंदर बांधकाम आहे आणि आत पाच पन्नास माणसांची राहायची सोय सहज होऊ शकते. आम्हाला तिथे राम मोरू शिंदे नावाचा माणूस भेटला - 8793571876, 9270263928. राहण्याचा बेत असेल तर नक्कीच फोन करून जा म्हणजे छान जेवणाची सोय होईल. आम्ही पोचलो आणि थेट वाड्यात गेलो. बऱ्यापैकी ऊन होते आणि त्यामुळे जाऊन जरा आडवे पडलो. बाहेर असलेल्या रखरखत्या उन्हाचा त्या वाड्यात काहीच परिणाम होत नव्हता. आत इतका गार आणि शांत होतं की क्षणभरत डोळा लागला. अर्ध्या पाऊण तासानी किल्ला पाहायला आम्ही बाहेर पडलो. वाड्याच्या बाहेरच एक आजी राहते. तिला विचारले जेवणाचे आणि हो म्हणल्यावर तिला भाकर पिठलं करायला विचारले. त्याला पण होकार आला. चला पॉट भागले.
वीरगळी
जातांना सर्व शिधा घेऊन जा. तिथे भांडी आहेत आणि सर्व काही छान शिजवता येते.
सुधागड माझ्या लाडक्या किल्ल्यांमधला एक किल्ला झाला.
मला दर वेळी वाटतं ते आत्ता पण वाटलं. की त्या काळात इथे काय होत असेल, कसे असेल, किती ते अप्रतिम असे बांधून ठेवले आहे. आज आपल्या कडे सर्व प्रकारे development झाली आहे. deisgn पासून ते materials पर्यन्त क्रांती झाली झाली आहे. पण तरी, लोकांना मोहून टाकेल, attract करेल, किंवा लोकं तिकीट काढून एखादी इमारत बघायला जातील असे काही नाही. जे आहे ते इंग्रजांनी केलेले नाही तर महाराजांनी.
शक्यतो ह्या किल्ल्यावर ट्रेकिंग करणारे, निसर्ग जपणारे आणि खरे महाराज भक्त असणारे यांनीच यावे. नुसतं जगदंब पाठीवर आणि गाडीवर लिहून यायचे आणि कल्ला करून जायचे. अर्थात आता गडावर दारू वगरे चुकून पण नेली / प्यायली तर गावकरी व आमच्या सारखे इतर तुडवतात हे बऱ्याच लोकांना माहित झाले आहे.
Sudhagad – A must go trek for everyone.
इतिहास - याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली."
शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.
सुधागड अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड-पाली तालुका असे आहे.Ref: trekshitiz
शक्यतो ह्या किल्ल्यावर ट्रेकिंग करणारे, निसर्ग जपणारे आणि खरे महाराज भक्त असणारे यांनीच यावे. नुसतं जगदंब पाठीवर आणि गाडीवर लिहून यायचे आणि कल्ला करून जायचे. अर्थात आता गडावर दारू वगरे चुकून पण नेली / प्यायली तर गावकरी व आमच्या सारखे इतर तुडवतात हे बऱ्याच लोकांना माहित झाले आहे.
Sudhagad – A must go trek for everyone.
इतिहास - याला पहिले भोरपगड असेही म्हणत. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की "साखरदऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकाद्सिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली."
शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश आहे. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती.
सुधागड अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड-पाली तालुका असे आहे.Ref: trekshitiz
No comments:
Post a Comment