Thursday, 22 February 2018

चंदन वंदन

चंदन वंदन 
23.12.2017
Me and Bhushan

सातारा व त्या आजूबाजूचे किल्ले बघून संपवायचे असा विचार केला होता. त्यामुळे चंदनगड वंदनगड अशा दोन जोड किल्ल्याचा नंबर लागला. सातारा रस्त्यावर भुईंज नावाचे गाव आहे. महाबळेश्वर फाट्या नंतर, पुण्याकडून जात असतांना. तिथून साधारण १८ - २० किमी वर किकली नावाचे गाव आहे. तिथून रस्ता बेलमाची ला जातो. खलजी आणि वरची अशा दोन बेलमाची आहेत. आम्ही खालच्या का वरच्या कुठल्या तरी माची वर THAR लावून गड चढायला सुरु केला. कुठलं चंदन आणि कुठला वंदन हे काही माहिती नव्हते. दोन्ही किल्ले शेजारीच आहेय आणि हि वाट दोन्ही किल्ल्याच्या मध्ये नेऊन पोचवते. अर्थात आम्ही वाट दिसेल तसे गेलो आणि वंदन च्या माथ्यावर पोचलो. किल्ल्यावर फारशी झाडी नाही. गवत मात्र प्रचंड वाढले होते आणि माझा हातापायावर वार होत होते. 
गडमाथ्यावर पोचल्यावर समोर एक दर्गा दिसली. वाड्यांचे अवशेष दिसले. उत्तरे कडे या बुरुज आहे आणि कुणाचीही तरी एक समाधी आहे. मारुतीची मूर्ती आहे. मी आणि ढेरे इथे थोडा काळ सुखावलो. ऊन वाढत होते. 
गड फिरायला तास भर खूप झाला. ना सापडलेल्या वाटेचा शोध घेत आम्ही दोन्ही किल्ल्यांच्या मधल्या टप्यात , खिंडीत पोचलो. वंदन वरून चंदन ला जाणारा रस्ता शोधायला लागलो. गवतात सर्व पाऊलवाट लपल्या होत्या. उजवीकडून चालायला सुरु केले. वाट अशक्य निमुळती आहे. आज का माहित नाही पण ढेरे ची खूपच फाटली होती. चक्कर वगरे येत होती असे काही तरी म्हणाला. एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दारी आणि वाट जेमतेम पाऊल मावेल इतकीच. चंदनगडाला पूर्व वळसा मारून समोरील बाजूस आलो आणि बघतो तर तिथे चक्क पाहिऱ्या होत्या. त्या झटकन चढून आम्ही किल्ल्यावर पोचलो. 
चंदन वर पण एक मोठे मस्जिद आहे. त्याच्या बाजूस एक प्रचंड वादाचे झाड आहे. पाच वड मिळून एक झालेलं. आम्ही इथून निघून शिव मंदिरात गेलो. तिथे सॅक काढली आणि निवांत पडलो. थोडेफार काही खायला आणले होते ते संपवले. इथे माकडे खूप आहेत आणि त्यांच्या पासून काळजी घेणे गरजेचे आहे. मंदिरामध्ये मला झोप लागली आणि त्याच वेळात एक माकड आत शिरले आणि सॅक पळवायचा प्रयत्न झाला. ढेरे ला जग अली आणि बचावलो. महत्वाचे म्हणजे त्या मध्ये माझा चष्मा होता. बाकी काही विशेष नाही. उतरतांना वांदे झाले असते. 

गप्पा टाकत आम्ही खाली उतरलो. चढतांना जिथून वर गेलो होतो ते गाव इथून ५ km लांब होते. उन्हाचा तडाखा अशक्य होता. खाली एक गणपती मंदिर दिसले आणि आम्ही आत शिरलो. मी थोडे पाणी पिऊन बाहेर रस्त्यावर लिफ्ट मागण्यासाठी उभा राहिलो. गावात गेलात आणि जर का गाडीत जागा असेल किंवा दुचाकी वर एकटेच असाल तर शक्यतो लोकं थांबतात आणि पुढे पोचवतात. शहरात लोकांना एक तर patience कमी आणि आयुष्यभर धावपळ. त्यामुळे lift  मागणारे कदाचित दिसत पण नसतात उभे असलेले. आणि दिसले तरी थांबू असे नाही. 
एका दत्ता नावाच्या व्यक्तीनी त्याच्या जुन्या हिरो होंडा वर मला बसवून आमच्या गाडी पाशी सोडले. गाडी घेऊन मी परत बाप्पा कडे गेलो आणि ढेरे ला उचलले. 
तिथे पोचलो तेव्हा उशाशी सॅक घेऊन एका वडाखाली हा इसम घोरत पडला होता. 

इतिहास :
इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदनवंदन येथे असणार्‍या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाइवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. Ref - trekshitiz























No comments:

Post a Comment

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम

महाकुंभ: सनातन सभ्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम -  ॐ नमः शिवाय गेले काही महिने social media वर एक मोठा ट्रेंडिंग शब्द 'महाकुंभ' आव...