मोहनगड - सचिन जोशी चे आभार
13.1.2018
पुणे - भोर - वरंध घाट - दुर्गाडी फाटा
भोर च्या जवळ राजघर नावाचे गाव आहे . तिथे मी आणि माझा काही मित्रांनी एक छोटेसे Container House उभे करायचे नियोजन केले आहे. त्यामुळे भोर ला जाणे हे नित्याचे झाले. धरणाच्या काठावर एक सुंदर जागा मिळाली आहे. आणि गम्मत म्हणजे या आमच्या जागेवरून, भाटघर धरणाच्या पलीकडे राजगडाचे दर्शन होते. भारी. मागे गेलो तर तोरणा आहे, अलीकडे रोहिडा आणि घाटातून खाली उतरलात की शिवथरघळ.
कामाचे निमित्त फक्त, भोर भटकंती चालू.
आजूबाजूचे किल्ले बघायची आमची मोहीम चालू झाली. मोहनगड हा किल्ला तसा कोणाला माहित नाही कारण तो नुकताच सापडला आहे. trekshitiz वर बघत असतांना मला मोहनगड दिसला. सचिन जोशी नी हा किल्ला शोधून काढला आहे. त्या बद्दलचे उल्लेख त्यानी काही पुरातन काळातल्या लिखाणा मध्ये शोधले. त्याच्याच आधारे त्यांनी हा किल्ला शोधला. तेव्हा उपेंद्र नावाच्या मित्राची बायको केतकी, जी एक उत्तम ट्रेकर आहे, ती आणि इतर गँग पण शोध मोहिमेत सचिन बरोबर सहभागी झाले होते. त्यांचा ग्रुप गेले किती तरी वर्ष गड किल्ले करत हिंडत आहेत. सचिन चा संपर्क झाला आणि माहिती मिळाल्यावर ठरलं की हाच किल्ला करायचा. या ट्रेक ला चेतन देशमुख उर्फ चड्डी अन ढेरे उर्फ बिडी सह ऋषिकेश पाटील उर्फ पिंटू पण आला होता. चेतन आणि भूषण यांना जरा इतिहास नामक गोष्टीची आवड आहे आणि त्यांचे वाचन पण बरे आहे. त्यामुळे त्यांच्या गप्पांमधून माझी आणि पिंटू ची छान करमणूक आणि शिक्षण, असे दोन्ही होते. मला फारसा काही इतिहासाचा गंध नसल्यामुळे जे काही खरं खोटं सांगतात ते आपले ऐकायचे. मग वाद होतातच. चर्चा आणि वाद नाही, तर कसला आलाय पुणेकर. नंतर त्याच त्यावर चर्चा करत दोन दोन घोट मारायचे. यामध्ये पिंटू खोड्या काढत असतो, हे सांगायला नको.
हेच
सर्व
करत
करत
कधी
वर
पोचतो
कळत
नाही.
वर
म्हणजे
डोंगरावर. अर्थात
हेच
करत
वर
पण
पोचणार
आहे
त्यात
वाद
नाही.
कोणाचाच. मोहनगड ला पोचण्याआधीच पोटपूजा झाली
होती.
त्यामुळे पोचल्यावर न वेळ घालवता वाट
शोधत
आम्ही
लगेच किल्ला चढायला सुरु केले. या
किल्ल्याला दुर्गाडीचा किल्ला
असे
पण
म्हणाले जाते.
दुर्गाडी पासून एक रस्ता मंदिराकडे जातो. तिथे पर्यन्त गाडी जाते. मंदिरा पाशी गाडी लावून रस्ता निवांतपणाने वर किल्ल्या पर्यन्त जातो, चुकलो नाहीत तर. आम्ही भयंकर चुकलो. एक वळण miss झाले आणि मग लंबी दुरी. एक महत्वाचे लक्षात ठेवा की मळलेली वाट आहे आणि ती गडाच्या डावीकडून / सोंडेवरून थेट गडमाथ्यावर जाते. कुठेही झाडाझुडपात कठीण मार्गानी ही वाट जात नाही. वर जायला लागलो की साधारण १० मी मधेच एक वाट सरळ जाते. ती पण मळलेलीच आहे. पण चुकीची आहे. तिथे डावीकडे एक वीरगळ दिसेल. तिथून सरळ जाऊ नका. ती चुकीची वाट आहे. त्याआधी डावीकडे वळून वाट वर जाते. एक छोटासा बाण दाखवला आहे तिथे. आम्ही चुकलो आणि सरळ गेलो. मला वाटतं दोन किल्ले चढले असतील. वाट दिसेल तसे आणि काहीही नं विचार करता किल्ल्याच्या दिशेनी आम्ही चालत होतो. जंगलातून आणि उंच गवतातून वाट काढत होती. अंगावर काट्यांचे आणि इतर असे अनेक वार झाले. पण सहन करण्याशिवाय काही उपाय नव्हता. वर जात राहिलो आणि नंतर अचानक सोंडेवर जाऊन पाहतो तर राजमार्ग सापडला. मस्त छान वाट आहे वर जायला हे तेव्हा कळले. ठीक आहे हो, एव्हडा काही नसत. पिंटू ला Vertigo आहे. इथे जंगल असल्यानी त्याला खोलीची काही जाण नव्हती. त्यामुळे टुणटुण उद्या मारत वर जाणे चालू होते. सोंडेवर पोचलो आणि डावी कडे दरी चे दर्शन झाले. आणि गडी गार पडला. हे त्याचे चमत्कारिक वागणे बघून अशक्य हसायला येते आम्हाला. आमच्यातला एक शिरीष नावाचा डाकू त्याचे ह्या परिस्थिती मध्ये फोटो आणि VDO काढत असतो. असो. पण सर्व नाटक तमाशे होऊन पिंटू माथा मात्र गाठतो. रस्ता मिळाला आणि शेवटचे काही क्षण आमचे त्यामुळे छान गेले. वर पोचल्यावर शेवटचा टप्पा जरा कठीण आहे. काळजी घ्यावी लागते. या किल्लयावर मंदिर आणि पाण्याचे टाके याखेरीस काही दिसले नाही. ना तटबंदी आहे ना दरवाजा, ना पूर्वीची राहण्याची काही सोय ना काही वाड्याचे अवशेष. उंच असल्यानी दृश्य खूपच छान आहे मात्र. त्या मंदिरात ७ ते ८ लोकांची छान राहायची सोय होऊ शकेल. तिथे बसून थोडेसे खालले आणि परतीच्या वाटेवर आम्ही निघालो.
ट्रेकिंग असो व आयुष्य, वाट काढत पुढे जायचे ----- वगरे वगरे उगाच तत्वज्ञान. पण ट्रेकिंग करत असतांना पर्याय नसतो त्यामुळे वाट काढावीच लागते. आयुष्यात तसा नाही. निघते. होतं. इतके पर्याय असतात की बघू नंतर काय होते ते, असे म्हणून आजचे मरण उद्यावर टाकतो. पण इथे तसे नाही. आजचे मरण आजच. कदाचित माझा स्वभाव, म्हणून तसा झाला आहे. मी निर्णय घेऊन मोकळा होतो. चूक बरोबर काळ ठरवते. काही लोक तेच नाही करत आणि नंतर लोकांना दोष देतात. ट्रेकिंग करत असतांना धीर द्यायला इथे कोणी नसते, स्व वर विश्वास असेल आणि निसर्गाला समर्पित Surrender करण्याची ताकद असेल तर जगता नाही तर मरता.
हे जरा मी अतीच लिहिले आहे. इतके काही भयानक नसते. सांगायचं उदेष्य म्हणजे जगायला स्व वर विश्वास ठेवा बाकी गेलं चुलीत. कोणीही कधीही मदत कराया येत नाही. मोहनगडावर चुकलो. हा अनुभव छान आहे. पण चुकलोच नसतो तर अनुभव कसला.
मोहनगड उतरलो आणि तिथून समर्थांचे दर्शन घ्यावे असे ठरले. शिवथरघळ जवळ असल्यानी तिथे गेलो. शिवथरघळी मी खूप लहान असतांना आलो होतो. तेव्हा फारसा काही बाजार नव्हता तिथे. आता मात्र खूप सारं बांधकाम आणि एकंदरीत बरीच प्रगती झाली आहे. छान केले आहे. समर्थांच्या समोर शांत पणे बसलो आणि सर्व शीण दूर झाला.
आजोबांनी लहान असतांना शिकवलेला एक श्लोक त्यांची आठवण करून गेला 'मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥.












दुर्गाडी पासून एक रस्ता मंदिराकडे जातो. तिथे पर्यन्त गाडी जाते. मंदिरा पाशी गाडी लावून रस्ता निवांतपणाने वर किल्ल्या पर्यन्त जातो, चुकलो नाहीत तर. आम्ही भयंकर चुकलो. एक वळण miss झाले आणि मग लंबी दुरी. एक महत्वाचे लक्षात ठेवा की मळलेली वाट आहे आणि ती गडाच्या डावीकडून / सोंडेवरून थेट गडमाथ्यावर जाते. कुठेही झाडाझुडपात कठीण मार्गानी ही वाट जात नाही. वर जायला लागलो की साधारण १० मी मधेच एक वाट सरळ जाते. ती पण मळलेलीच आहे. पण चुकीची आहे. तिथे डावीकडे एक वीरगळ दिसेल. तिथून सरळ जाऊ नका. ती चुकीची वाट आहे. त्याआधी डावीकडे वळून वाट वर जाते. एक छोटासा बाण दाखवला आहे तिथे. आम्ही चुकलो आणि सरळ गेलो. मला वाटतं दोन किल्ले चढले असतील. वाट दिसेल तसे आणि काहीही नं विचार करता किल्ल्याच्या दिशेनी आम्ही चालत होतो. जंगलातून आणि उंच गवतातून वाट काढत होती. अंगावर काट्यांचे आणि इतर असे अनेक वार झाले. पण सहन करण्याशिवाय काही उपाय नव्हता. वर जात राहिलो आणि नंतर अचानक सोंडेवर जाऊन पाहतो तर राजमार्ग सापडला. मस्त छान वाट आहे वर जायला हे तेव्हा कळले. ठीक आहे हो, एव्हडा काही नसत. पिंटू ला Vertigo आहे. इथे जंगल असल्यानी त्याला खोलीची काही जाण नव्हती. त्यामुळे टुणटुण उद्या मारत वर जाणे चालू होते. सोंडेवर पोचलो आणि डावी कडे दरी चे दर्शन झाले. आणि गडी गार पडला. हे त्याचे चमत्कारिक वागणे बघून अशक्य हसायला येते आम्हाला. आमच्यातला एक शिरीष नावाचा डाकू त्याचे ह्या परिस्थिती मध्ये फोटो आणि VDO काढत असतो. असो. पण सर्व नाटक तमाशे होऊन पिंटू माथा मात्र गाठतो. रस्ता मिळाला आणि शेवटचे काही क्षण आमचे त्यामुळे छान गेले. वर पोचल्यावर शेवटचा टप्पा जरा कठीण आहे. काळजी घ्यावी लागते. या किल्लयावर मंदिर आणि पाण्याचे टाके याखेरीस काही दिसले नाही. ना तटबंदी आहे ना दरवाजा, ना पूर्वीची राहण्याची काही सोय ना काही वाड्याचे अवशेष. उंच असल्यानी दृश्य खूपच छान आहे मात्र. त्या मंदिरात ७ ते ८ लोकांची छान राहायची सोय होऊ शकेल. तिथे बसून थोडेसे खालले आणि परतीच्या वाटेवर आम्ही निघालो.
ट्रेकिंग असो व आयुष्य, वाट काढत पुढे जायचे ----- वगरे वगरे उगाच तत्वज्ञान. पण ट्रेकिंग करत असतांना पर्याय नसतो त्यामुळे वाट काढावीच लागते. आयुष्यात तसा नाही. निघते. होतं. इतके पर्याय असतात की बघू नंतर काय होते ते, असे म्हणून आजचे मरण उद्यावर टाकतो. पण इथे तसे नाही. आजचे मरण आजच. कदाचित माझा स्वभाव, म्हणून तसा झाला आहे. मी निर्णय घेऊन मोकळा होतो. चूक बरोबर काळ ठरवते. काही लोक तेच नाही करत आणि नंतर लोकांना दोष देतात. ट्रेकिंग करत असतांना धीर द्यायला इथे कोणी नसते, स्व वर विश्वास असेल आणि निसर्गाला समर्पित Surrender करण्याची ताकद असेल तर जगता नाही तर मरता.
हे जरा मी अतीच लिहिले आहे. इतके काही भयानक नसते. सांगायचं उदेष्य म्हणजे जगायला स्व वर विश्वास ठेवा बाकी गेलं चुलीत. कोणीही कधीही मदत कराया येत नाही. मोहनगडावर चुकलो. हा अनुभव छान आहे. पण चुकलोच नसतो तर अनुभव कसला.
मोहनगड उतरलो आणि तिथून समर्थांचे दर्शन घ्यावे असे ठरले. शिवथरघळ जवळ असल्यानी तिथे गेलो. शिवथरघळी मी खूप लहान असतांना आलो होतो. तेव्हा फारसा काही बाजार नव्हता तिथे. आता मात्र खूप सारं बांधकाम आणि एकंदरीत बरीच प्रगती झाली आहे. छान केले आहे. समर्थांच्या समोर शांत पणे बसलो आणि सर्व शीण दूर झाला.
आजोबांनी लहान असतांना शिकवलेला एक श्लोक त्यांची आठवण करून गेला 'मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥.












No comments:
Post a Comment